शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

विनापरवाना दुकाने उघडू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 05:01 IST

चंद्रपूर जिल्ह्यात अद्याप एकही पॉझिटिव्ह रूग्ण नाही. मात्र, नागपूर व यवतमाळ जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रूग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या. कोणीही प्रवेश केल्यास १४ दिवस क्वारंन्टाईन केले जात आहे. त्यामुळे यातल्या प्रत्येक नागरिकांनी प्रशासनासोबत डोळ्यात तेल घालून यामध्ये एकही चूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

ठळक मुद्देकुणाल खेमनार । ३ मे पर्यंत लॉकडाऊन काटेकोर पाळा अन्यथा कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यामध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह नाही. केंद्रीय गृह विभागाने काही सूचना दिल्यामुळे लॉकडाऊनमध्ये शिथिलता आली असे समजायचे कारण नाही. राज्य शासनाकडून अधिकृत आदेश आल्याशिवाय व ज्यांना लिखित परवानगी दिली नाही अशा कोणत्यांनी दुकानदारांनी पुढील आदेशापर्यंत दुकाने उघडू नये. जिल्ह्यातील लॉकडाऊन ३ मेपर्यंत कायम आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली.चंद्रपूर जिल्ह्यात अद्याप एकही पॉझिटिव्ह रूग्ण नाही. मात्र, नागपूर व यवतमाळ जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रूग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या. कोणीही प्रवेश केल्यास १४ दिवस क्वारंन्टाईन केले जात आहे. त्यामुळे यातल्या प्रत्येक नागरिकांनी प्रशासनासोबत डोळ्यात तेल घालून यामध्ये एकही चूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी. गावामध्ये अचानक साथ उद्भवल्यास काय करायचे, कशा पद्धतीने व्यवस्था करायची, यासाठी शनिवारी शहरातील तीन प्रभाग व जिल्ह्याच्या विविध भागात मॉकड्रिल अर्थात रंगीत तालीम करण्यात आली. यामुळे शहरातील अनेक भाग सील करण्यात आले होते. मात्र शहरात रुग्णांची वाढ झाल्याची अफवा काहींनी पसरवली असून अशा व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी स्पष्ट केले.धान्यकिट वाटपचे अधिकार मनपाकडेशासनामार्फत निराश्रित, निराधार लोकांना जेवण पुरविल्या जाते. शिवभोजन योजना सुरू आहे. सोबतच आता केशरी शिधाकार्डधारकांना अन्नधान्य पुरविल्या जात आहे. मात्र, तयार अन्न किंवा अन्नधान्याची किट वाटप करण्याचे अधिकार फक्त महानगर पालिकेला शहरात दिले. अन्य ठिकाणी राज्य शासनाचे कर्मचारी याबाबत काम करीत आहे. त्यामुळे कोणत्याही स्वयंसेवी संस्थेने यासाठी गोंधळ घालू नये. शहरात संचारबंदी सुरू आहे. संचारबंदीचे नियम तोडल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.८ नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा२५ एप्रिल रोजी कोरोना संशयित म्हणून ९६ नागरिकांची नोंद झाली. यातील ८८ स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले. त्यापैकी ८० नमुने निगेटिव्ह तर ८ नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. आतापर्यंत ३२ हजार १३ नागरिक विदेशातून, राज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आले. यापैकी २ हजार ५३५ नागरिक निगराणीखाली आहेत. २९ हजार ४७९ नागरिकांनी होम क्वारंन्टाईन पूर्ण केले. १०६ नागरिक संस्थात्मक विलगीकरणात आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत दिली.१३ लाखांचा दंड वसूलकोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २३६ प्रकरणात एकूण १३ लाख ५ हजार ७७० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला तर ५८ नागरिकांना अटक झाली. शनिवारपर्यंत ७४१ वाहने जप्त करण्यात आली आहेत. जिल्ह्यात या काळातील विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याचेही त्यांनी सांगितले. कोरोना आजार संपर्कातून येतो त्यामुळे शारीरिक दूरी ठेवणे अनिवार्य आहे. त्यादृष्टीने सण उत्सव साजरे करताना लक्ष ठेवावे. ३ मेपर्यंत लॉकडाऊन पर्यंत सहकार्य करण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी