शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

विनापरवाना दुकाने उघडू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 05:01 IST

चंद्रपूर जिल्ह्यात अद्याप एकही पॉझिटिव्ह रूग्ण नाही. मात्र, नागपूर व यवतमाळ जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रूग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या. कोणीही प्रवेश केल्यास १४ दिवस क्वारंन्टाईन केले जात आहे. त्यामुळे यातल्या प्रत्येक नागरिकांनी प्रशासनासोबत डोळ्यात तेल घालून यामध्ये एकही चूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

ठळक मुद्देकुणाल खेमनार । ३ मे पर्यंत लॉकडाऊन काटेकोर पाळा अन्यथा कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यामध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह नाही. केंद्रीय गृह विभागाने काही सूचना दिल्यामुळे लॉकडाऊनमध्ये शिथिलता आली असे समजायचे कारण नाही. राज्य शासनाकडून अधिकृत आदेश आल्याशिवाय व ज्यांना लिखित परवानगी दिली नाही अशा कोणत्यांनी दुकानदारांनी पुढील आदेशापर्यंत दुकाने उघडू नये. जिल्ह्यातील लॉकडाऊन ३ मेपर्यंत कायम आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली.चंद्रपूर जिल्ह्यात अद्याप एकही पॉझिटिव्ह रूग्ण नाही. मात्र, नागपूर व यवतमाळ जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रूग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या. कोणीही प्रवेश केल्यास १४ दिवस क्वारंन्टाईन केले जात आहे. त्यामुळे यातल्या प्रत्येक नागरिकांनी प्रशासनासोबत डोळ्यात तेल घालून यामध्ये एकही चूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी. गावामध्ये अचानक साथ उद्भवल्यास काय करायचे, कशा पद्धतीने व्यवस्था करायची, यासाठी शनिवारी शहरातील तीन प्रभाग व जिल्ह्याच्या विविध भागात मॉकड्रिल अर्थात रंगीत तालीम करण्यात आली. यामुळे शहरातील अनेक भाग सील करण्यात आले होते. मात्र शहरात रुग्णांची वाढ झाल्याची अफवा काहींनी पसरवली असून अशा व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी स्पष्ट केले.धान्यकिट वाटपचे अधिकार मनपाकडेशासनामार्फत निराश्रित, निराधार लोकांना जेवण पुरविल्या जाते. शिवभोजन योजना सुरू आहे. सोबतच आता केशरी शिधाकार्डधारकांना अन्नधान्य पुरविल्या जात आहे. मात्र, तयार अन्न किंवा अन्नधान्याची किट वाटप करण्याचे अधिकार फक्त महानगर पालिकेला शहरात दिले. अन्य ठिकाणी राज्य शासनाचे कर्मचारी याबाबत काम करीत आहे. त्यामुळे कोणत्याही स्वयंसेवी संस्थेने यासाठी गोंधळ घालू नये. शहरात संचारबंदी सुरू आहे. संचारबंदीचे नियम तोडल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.८ नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा२५ एप्रिल रोजी कोरोना संशयित म्हणून ९६ नागरिकांची नोंद झाली. यातील ८८ स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले. त्यापैकी ८० नमुने निगेटिव्ह तर ८ नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. आतापर्यंत ३२ हजार १३ नागरिक विदेशातून, राज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आले. यापैकी २ हजार ५३५ नागरिक निगराणीखाली आहेत. २९ हजार ४७९ नागरिकांनी होम क्वारंन्टाईन पूर्ण केले. १०६ नागरिक संस्थात्मक विलगीकरणात आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत दिली.१३ लाखांचा दंड वसूलकोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २३६ प्रकरणात एकूण १३ लाख ५ हजार ७७० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला तर ५८ नागरिकांना अटक झाली. शनिवारपर्यंत ७४१ वाहने जप्त करण्यात आली आहेत. जिल्ह्यात या काळातील विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याचेही त्यांनी सांगितले. कोरोना आजार संपर्कातून येतो त्यामुळे शारीरिक दूरी ठेवणे अनिवार्य आहे. त्यादृष्टीने सण उत्सव साजरे करताना लक्ष ठेवावे. ३ मेपर्यंत लॉकडाऊन पर्यंत सहकार्य करण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी