शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

जिल्हा पाणी टंचाईच्या सावटात

By admin | Updated: November 29, 2015 01:57 IST

चंद्रपूर जिल्ह्यावर सध्या पाणी टंचाईचे सावट दिसून येत आहे. यावर्षी पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील धरणामधील जलसाठा नोव्हेंबरमध्येच चिंताजनक स्थितीत पोहचला आहे.

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यावर सध्या पाणी टंचाईचे सावट दिसून येत आहे. यावर्षी पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील धरणामधील जलसाठा नोव्हेंबरमध्येच चिंताजनक स्थितीत पोहचला आहे. शेतकऱ्यांसमोर आतापासून सिंचनाचा प्रश्न उभा ठाकला असला तरी उद्योगांकडून पाण्याचा उपसा सुरूच असल्याची माहिती आहे. त्यामुळे पुढे जिल्ह्यात पाणी प्रश्न तोंडचे पाणी पळविणार आहे.यावर्षी खरीप हंगामावर शेतकऱ्यांच्या आशा होत्या. मात्र अत्यल्प पाऊस पडल्याने अनेकांना पेरणी करता आली नाही. तर ज्यांनी पेरणी केली त्यांची पिके पाण्याअभावी करपून गेली. धान पट्ट्यात अनेकांना रोवणी करता आली नाही. तर ज्यांनी केली त्यांची पिकेही शेवटच्या पाण्यासाठी अखेरची घटका मोजत आहेत. त्यामुळे खरिप हंगामात यावर्षी उत्पन्न घटल्याचे दिसून आले. खरिप हंगामात शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. उत्पादन खर्चही निघणार की नाही, याची शंका अनेकांना आहे. आता तरी रबी हंगामात पेरणी करून खरिपात झालेले कर्ज फेडण्याचे अनेक शेतकरी विचार करीत होते. त्यामुळे धान, सोयाबीन, कापूस आदी पिके अंतिम टप्प्यात असून रबी पीक पेरणीसाठी बियाणे जुळवाजुळव शेतकऱ्यांनी सुरू केलीे. असे असले तरी यावर्षी रबी हंगामात सिंचनाचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. अत्यल्प पाऊस झाल्यामुळे यावेळी सिंचन प्रकल्पातही मुबलक जलसाठा होऊ शकला नाही. खरीप हंगामातच शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला. धानाला पाणी देण्यासाठी नदी-नाल्यात पाणी नाही. अनेक शेतकऱ्यांच्या शेताजवळ नदी-नालेही नाही. खरीप पिकांचीच ही अवस्था आहे तर रबी पिकांना सिंचनासाठी पाणी कुठून मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. यंदा अत्यल्प पाऊस पडल्याने जिल्ह्यातील धरणातही पाण्याची साठवणूक होऊ शकली नाही.नोव्हेंबर महिन्यातच या धरणातील जलसाठा चिंताजनक स्थितीत पोहचला आहे. एरवी हिवाळ्याला प्रारंभ होतो तेव्हा जिल्ह्यातील जलाशयात बऱ्यापैकी जलसाठा राहतो. मात्र यावेळी पाऊसच पडला नसल्याने बहुतांश जलाशय चिंताजनक स्थितीत आहेत. आसोलामेंढा प्रकल्पात केवळ १४.७२ टक्के पाणी आहे. घोडाझरी प्रकल्पात १८.७१ टक्के जलसाठा आहे. नलेश्वर प्रकल्प तर कोरडे होण्याच्या मार्गावर आहे. या प्रकल्पात केवळ ४.३९ टक्के पाणी आहे. चंदई प्रकल्पात १३.४४ टक्के पाणी आहे तर चारगाव प्रकल्पातही केवळ ४१.३१ टक्के जलसाठा आहे. दिना प्रकल्पात तर ठणठणाट आहे. प्रकल्पाच्या या स्थितीमुळे पाण्याची पातळी खालावली असून उन्हाळ्यात भिषण जिल्हा प्रशासनाने आतापासून पाण्याचे व्यवस्थित नियोजन केले नाही तर पुढे जिल्हाभर पाण्याचे मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. (शहर प्रतिनिधी)