शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

महाराजस्व अभियानात विविध २३ हजार दाखल्यांचे वाटप

By admin | Published: November 08, 2015 1:20 AM

शासकीय कार्यालयातील जनतेशी निगडित असलेले कामकाज जे नियमानुसार नियमितपणे सुरू असते.

चंद्रपूर : शासकीय कार्यालयातील जनतेशी निगडित असलेले कामकाज जे नियमानुसार नियमितपणे सुरू असते. तेच कामकाज जलदगतीने करण्यासाठी महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे. सदर अभियानाला मिळणारा प्रतिसाद व फलश्रुती विचारात घेऊन सदर अभियान नेहमीसाठी राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात महाराजस्व अभियानात या वर्षात वय, राष्ट्रीयत्व, अधिवास प्रमाणपत्र, जातीचे दाखले, नॉन क्रिमीलेयर व उत्पन्नाचे दाखले असे विविध २३ हजार १९४ दाखले वाटप करण्यात आले. ८०६ किलोमीटर लांबीचे ४०४ अतिक्रमित रस्ते मोकळे करण्यात आले असून फेरफार अदालतीद्वारे १६ हजार ९११ फेरफार निकाली काढले तर एक हजार ६० गावात चावडी वाचनातून जनतेच्या समस्या निकाली काढण्यात आल्या.या अभियानांतर्गत नागरिकांच्या समस्या दूर झाल्या नसतील किंवा त्यांची वेळेवर कामे पूर्ण होत नसतील तर नागरिकांना कार्यालयात येऊन तक्रार करण्याचीसुद्धा गरज भासत नाही. यासाठी जिल्हा प्रशासनाने आॅनलाईन तक्रार नोंदविण्यासाठी ९९७०००१३१२ हा क्रमांक सुरू केलेला असून यावर एसएमएस करण्यासाठी कुठलाही कालावधी दिलेला नाही. त्यामुळे नागरिक केव्हाही आणि कुठूनही घरबसल्या एसएमएस करून आपली तक्रार नोंदवू शकतात. तसेच या कार्यालयाकडून राबविण्यात येणाऱ्या योजना कोणत्या अधिकाऱ्यांकडून किती दिवसात कोणते कागदपत्रे जोडल्यास मिळतात, याची माहिती देण्यासाठी १८००३०००८८९८ हा टोल फ्री क्रमांक सुरू केलेला आहे.विविध दाखले देण्याकरिता शिबिरे आयोजित करणे, गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते, पांदण रस्ते, शेतरस्ते, शिवरस्ते, शिवाररस्ते मोकळे करणे. एक महिन्याचेवर प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे त्याकरिता मंडळ मुख्यालयी फरफार अदालत घेणे. चावडी वाचन, आदिवासी जमीनधारकांच्या जमिनीबाबत नोंदी करणे, आदिवासी जमिनी परत करण्याची मोहीम हाती घेणे इत्यादी कामे या अभियानात करण्यात येतात. समाधान योजनेंतर्गत महसूल अधिकाऱ्यांकडील अर्धन्यायिक प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी महसूल अदालतीचे आयोजन करण्यात येते. कमी जास्त पत्रकाच्या आधारे जमीन अभिलेख अद्ययावत करण्याचे कामही या अभियानात केल्या जाते. विद्यार्थी व नागरिकांना लागणारे सर्व दाखले मिळविणे आता सोपे झाले असून दाखल्यासाठी होणारी पायपीट महाराजस्व अभियानामुळे बंद झाली आहे.महसूल प्रशासनातर्फे चंद्रपूर जिल्ह्यात महाराजस्व अभियानात २८० शिबिर घेऊन विविध २३ हजार १९४ दाखल्याचे वाटप करण्यात आले आहे. ८०६ किलोमीटर लांबीचे ४०४ अतिक्रमति रस्ते मोकळे करण्यात आले आहेत. फेरफार अदालतीद्वारे १६ हजार ९११ फेरफार निकाली काढण्यात आले असून १ हजार ६० गावात चावडी वाचनातून समस्या सोडविण्यात आल्या. तलाठी कार्यालयात जाण्याचा नाही त्रास, मंडळ मुख्यालयी फेरफार करा हमखास यानुसार प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी मंडळ मुख्यालयी फेरफार अदालत घेण्यात येते. या अभियानामुळे नागरिकांना विविध सेवा तत्काळ मिळण्याची सोय झाली आहे. (प्रतिनिधी)