शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
3
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
4
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
5
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
6
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
7
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
8
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
9
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
10
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
11
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
12
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
13
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
14
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
15
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
16
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
17
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
18
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
19
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
20
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका

चंद्रपूर जिल्ह्यातील कोळशाची मागणी वाढली; दररोज १ लाख २० हजार टनाची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2022 7:24 PM

Chandrapur News देशातील अनेक राज्यांमध्ये वीजटंचाई निर्माण झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील कोळशाची मागणी अचानक वाढली.

ठळक मुद्देकर्नाटक व गुजरातमध्येही फेऱ्या वाढल्या

चंद्रपूर : देशातील अनेक राज्यांमध्ये वीजटंचाई निर्माण झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील कोळशाची मागणी अचानक वाढली. सद्य:स्थितीत मध्य प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात राज्यात दररोज सुमारे १ लाख २० हजार टन कोळशाची वाहतूक केली जात आहे.

चंद्रपूर जिल्हा वीज उत्पादक म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील कोळसा देशातील अनेक महाऔष्णिक केंद्रांना पुरविला जातो. उन्हाळ्यामुळे सध्या विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली. त्यातच देशात वीजटंचाई निर्माण झाल्याने विदर्भातील या खाणीतून कोळशाचा पुरवठा अचानक वाढला.

विदर्भातील खाणीतून २७ मालगाड्यांनी विद्युत केंद्रांमध्ये कोळसा पुरवठा केला जात आहे. मालगाडीच्या ३१ फेऱ्या झाल्या आहेत. दरदिवशी ३१ फेऱ्यांनी कोळसा विद्युत केंद्रात पोहोचविणे सुरू आहे. एका मालगाडीत सुमारे ४ हजार टन कोळसा वाहतूक होताे. काही महिन्यांपूर्वी मालगाडीतून दररोज १ लाख १२ हजार टन कोळसा वीज केंद्रांना पुरविला जात होता. त्यात मोठी वाढ झाली. आता १ लाख २० हजार टन कोळसा पुरवठा होत आहे. महाराष्ट्रासोबतच मध्य प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात राज्यातही चंद्रपुरातील खाणींचा कोळसा पाठविण्यात येत आहे.

आठ खाणींतून सर्वाधिक कोळसा पुरवठा

चंद्रपूर, बल्लारपूर, बाबूपेठ, माजरी, घुग्घुस, वणी, जुनारदेव व उमरेड येथील खाणींतून मोठ्या प्रमाणात कोळसा काढला जात आहे. उन्हाळ्यात विजेची मागणी वाढली. त्यातून कोळसा टंचाई निर्माण झाली. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाणींचे उत्पादन दुप्पटीने वाढले.

टॅग्स :electricityवीज