शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

आसोलामेंढा तलावावर वाढली पर्यटकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 00:42 IST

निसर्गदत्त वनराईने समृद्ध व सांडव्यावरून वाहणाऱ्या धबधब्यामुळे मागील आठवड्यापासून आसोलामेंढा तलावावर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. १०० वर्षापूर्वी इंग्रजांनी बांधलेल्या आसोलामेंढा तलावाचे नैसर्गिक सौंदर्य मनाला मोहित करणारे आहे.

ठळक मुद्देनैसर्गिक सौंदर्यावर भाळले पर्यटक : शासनाने पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन विकास करावा

उदय गडकरी।लोकमत न्यूज नेटवर्कसावली : निसर्गदत्त वनराईने समृद्ध व सांडव्यावरून वाहणाऱ्या धबधब्यामुळे मागील आठवड्यापासून आसोलामेंढा तलावावर पर्यटकांची गर्दी वाढली आहे.१०० वर्षापूर्वी इंग्रजांनी बांधलेल्या आसोलामेंढा तलावाचे नैसर्गिक सौंदर्य मनाला मोहित करणारे आहे. पावसाळ्यात सांडव्यावरुन वाहणारे पाणी पर्यटकांसाठी पर्वणीच ठरते. जिल्ह्याच्या कानाकोपºयातूनच नव्हे तर अन्य जिल्ह्यातूनही येणाºया पर्यटकांची गर्दी वाढत आहे. तलाव परिसरातील सौंदर्य आणि वाहणारे पाणी मनाला आल्हाद देतो. १०० वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी येथील नैसर्गिक सौंदर्याचे महत्त्व जाणले होते. परंतु, स्वतंत्र भारतातील शासनाने या परिसराकडे कायम दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. जलसाठा आणि क्षेत्रफळाने जिल्ह्यातील सर्वात मोठा तलाव म्हणून ओळखला जातो. तलावाची सिंचन क्षमताही मोठी आहे. गोसेखुर्द प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात येत असल्याने तलावातील जलसाठा निरंतर कायम राहतो. अशा परिस्थितीत या परिसराला पर्यटन स्थळाचा दर्जा देवून सुविधा उपलब्ध केल्यास आकर्षणाचे स्थळ म्हणून विकसित होऊ शकते. शासनाच्या कोणत्याही सुविधा नसताना पर्यटकांची दिवसेंदिवस वाढणारी गर्दी हे आसोलामेंढा तलावाच्या निसर्ग सौंदर्याचेच प्रतीक आहे. जिल्ह्यातील अधिकृत पर्यटन स्थळाच्या तुलनेत आसोलामेंढाचे सौंदर्य व वेगळेपणा नजरेत भरतो. तलावाच्या परिसराला विकसित करण्यासाठी शासनाने दूरदृष्टी दाखवून आणि पर्यटन स्थळाचा दर्जा दिल्यास रोजागराची संधी निर्माण होऊ शकतात. देश-विदेशतील पक्षांचे या तलावर होणारे स्थलांतरण अभ्यासाचा विषय आहे. परिसरातील हिरवीगार वनराई आणि त्यातील विविध प्रजाती, वन्यप्राणी हे सुद्धा पर्यटनाच्या दृष्टीने लाभदायक ठरू शकतात. जिल्ह्यातील एकाही तलावात चार प्रपातांची (सांडवे) निर्मिती करण्यात आली नाही. मात्र आसोलामेंढा तलावाच्या चार सांडव्यावरून वाहणारे पाणी पर्यटकांचे मन मोहीत करते. आसोलामेंढा तलावाच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी प्रशासनाने एक पाऊल पुढे येवून परिसराचा विकास करावा. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राची व्याप्ती वाढेल, असा आशावाद पर्यटकांनी व्यक्त केला आहे.सिंचनाची व्याप्ती वाढू शकतेब्रिटिश काळातील आसोलामेंढा तलावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. पर्यटन स्थळाचा दर्जा देत असताना तलावाला बाधा होणार नाही, या दृष्टीने विकास आराखडा तयार करावा. शेतकऱ्यांसाठी हा तलाव उपयुक्तच आहे. पण शासनाने लक्ष दिल्यास सिंचन व्याप्ती पुन्हा वाढेल.

टॅग्स :Aasolamendha Damआसोलामेंढा धरण