शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आसोलामेंढा तलावावर वाढली पर्यटकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 00:42 IST

निसर्गदत्त वनराईने समृद्ध व सांडव्यावरून वाहणाऱ्या धबधब्यामुळे मागील आठवड्यापासून आसोलामेंढा तलावावर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. १०० वर्षापूर्वी इंग्रजांनी बांधलेल्या आसोलामेंढा तलावाचे नैसर्गिक सौंदर्य मनाला मोहित करणारे आहे.

ठळक मुद्देनैसर्गिक सौंदर्यावर भाळले पर्यटक : शासनाने पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन विकास करावा

उदय गडकरी।लोकमत न्यूज नेटवर्कसावली : निसर्गदत्त वनराईने समृद्ध व सांडव्यावरून वाहणाऱ्या धबधब्यामुळे मागील आठवड्यापासून आसोलामेंढा तलावावर पर्यटकांची गर्दी वाढली आहे.१०० वर्षापूर्वी इंग्रजांनी बांधलेल्या आसोलामेंढा तलावाचे नैसर्गिक सौंदर्य मनाला मोहित करणारे आहे. पावसाळ्यात सांडव्यावरुन वाहणारे पाणी पर्यटकांसाठी पर्वणीच ठरते. जिल्ह्याच्या कानाकोपºयातूनच नव्हे तर अन्य जिल्ह्यातूनही येणाºया पर्यटकांची गर्दी वाढत आहे. तलाव परिसरातील सौंदर्य आणि वाहणारे पाणी मनाला आल्हाद देतो. १०० वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी येथील नैसर्गिक सौंदर्याचे महत्त्व जाणले होते. परंतु, स्वतंत्र भारतातील शासनाने या परिसराकडे कायम दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. जलसाठा आणि क्षेत्रफळाने जिल्ह्यातील सर्वात मोठा तलाव म्हणून ओळखला जातो. तलावाची सिंचन क्षमताही मोठी आहे. गोसेखुर्द प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात येत असल्याने तलावातील जलसाठा निरंतर कायम राहतो. अशा परिस्थितीत या परिसराला पर्यटन स्थळाचा दर्जा देवून सुविधा उपलब्ध केल्यास आकर्षणाचे स्थळ म्हणून विकसित होऊ शकते. शासनाच्या कोणत्याही सुविधा नसताना पर्यटकांची दिवसेंदिवस वाढणारी गर्दी हे आसोलामेंढा तलावाच्या निसर्ग सौंदर्याचेच प्रतीक आहे. जिल्ह्यातील अधिकृत पर्यटन स्थळाच्या तुलनेत आसोलामेंढाचे सौंदर्य व वेगळेपणा नजरेत भरतो. तलावाच्या परिसराला विकसित करण्यासाठी शासनाने दूरदृष्टी दाखवून आणि पर्यटन स्थळाचा दर्जा दिल्यास रोजागराची संधी निर्माण होऊ शकतात. देश-विदेशतील पक्षांचे या तलावर होणारे स्थलांतरण अभ्यासाचा विषय आहे. परिसरातील हिरवीगार वनराई आणि त्यातील विविध प्रजाती, वन्यप्राणी हे सुद्धा पर्यटनाच्या दृष्टीने लाभदायक ठरू शकतात. जिल्ह्यातील एकाही तलावात चार प्रपातांची (सांडवे) निर्मिती करण्यात आली नाही. मात्र आसोलामेंढा तलावाच्या चार सांडव्यावरून वाहणारे पाणी पर्यटकांचे मन मोहीत करते. आसोलामेंढा तलावाच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी प्रशासनाने एक पाऊल पुढे येवून परिसराचा विकास करावा. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राची व्याप्ती वाढेल, असा आशावाद पर्यटकांनी व्यक्त केला आहे.सिंचनाची व्याप्ती वाढू शकतेब्रिटिश काळातील आसोलामेंढा तलावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. पर्यटन स्थळाचा दर्जा देत असताना तलावाला बाधा होणार नाही, या दृष्टीने विकास आराखडा तयार करावा. शेतकऱ्यांसाठी हा तलाव उपयुक्तच आहे. पण शासनाने लक्ष दिल्यास सिंचन व्याप्ती पुन्हा वाढेल.

टॅग्स :Aasolamendha Damआसोलामेंढा धरण