शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

दोन वर्षांची पाटी कोरी; मानसिक आजार बळावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2022 17:37 IST

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे आणखी शाळा बंद आहे. मात्र थेट अध्यापन आणि मोबाईलवरील अध्यापन आकलनात फरक पडत असल्याने या मुलांचे शैक्षणिकदृष्ट्या नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देविद्यार्थी वाचन, लेखनात मागे : विद्यार्थ्यांची करावी लागणार तयारी

चंद्रपूर : कोरोना संकाटमुळे मागील दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. ऑनलाईन अभ्यासक्रम प्रत्येकांनाच शक्य झाला नाही. पहिली ते चौथीपर्यंतचे विद्यार्थी काही दिवसापूर्वी शाळेत जाऊ लागले. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे आणखी शाळा बंद आहे. मात्र थेट अध्यापन आणि मोबाईलवरील अध्यापन आकलनात फरक पडत असल्याने या मुलांचे शैक्षणिकदृष्ट्या नुकसान झाले आहे. वाचन, लेखन, आकलनामध्ये फरक पडत असून, दीड ते दोन वर्षे हे विद्यार्थी मागे पडले आहे. शाळा सुरु होताच त्यांची उजळणी घ्यावी लागणार आहे.

दुसरं शैक्षणिक सत्र संपायला अवघे दोन महिने शिल्लक आहे. या दोन महिन्यात शिक्षकांना प्रचंड मेहन करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढविणेही महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र यासाठी शिक्षकांना अधिक परिश्रम घ्यावे लागणार आहे.

पहिलं पाठ मागचं सपाट

ऑनलाईन अध्यापनात वेळेची मर्यादा होती. शिवाय मुले प्रत्यक्ष समोर नसल्याने आकलन झाले किंवा नाही, शिक्षकांना समजतच नव्हते. मुले दीड ते दोन वर्ष मागे पडली असल्याने तूट भरून काढावी लागणार आहे. शिक्षकांनी शकिवल्यानंतर सराव नसल्याने विद्यार्थी विसरत आहे.

गोंधळलेले विद्यार्थी

ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये नेटवर्क समस्येमुळे अनेकवेळा भाषेतील उच्चारात फरक पडत आहे. लेखनाचा सराव मोडल्याने मुले हात दुखत असल्याची तक्रार करतात. एका ठिकाणी बसण्यासही त्यांना आता कंटाळवाणे वाटत आहे. मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा कठीण वाटत आहे. त्यामुळे सध्या स्थितीत विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढली आहे.

शिक्षक म्हणतात...

कोरोना संकटामध्ये विद्यार्थी शाळेपासून दूर होते. काही ठिकाणी ऑनलाईन अध्यापन सुरु होते. काही दिवासपूर्वी शाळा सुरु झाल्या. मात्र कोरोना संकटामुळे आणखी शाळा बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा शाळेमध्ये खंड पडत आहे.

-जे.टी. पोटे, शिक्षण समिती सदस्य, जि.प.चंद्रपूर

ऑनलाईन शिक्षणामध्ये मुले प्रत्यक्ष समोर नव्हते. त्यामुळे त्यांच्याकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नव्हता. बहुतांश विद्यार्थ्यांचा लेखन तसेच वाचनाची सवय तुटली आहे. लिखाणातही मुले मागे पडत आहे. मुलांकडून अधिकाधिक वाचन, लेखनाचा सराव करून घ्यावा लागणार आहे.

-अनिल खुसपूरे, चंद्रपूर

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थीSchoolशाळाTeacherशिक्षक