शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

‘श्री’च्या उत्सवासाठी मनपा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 00:40 IST

मूर्ती आणि सजावटींमध्ये 'पीओपी'चा वापर मोठया प्रमाणात होतो, मात्र, 'पीओपी' पुन्हा वापरता येत नसल्याने प्रदूषणाची शक्यता नाकारता येत नाही. 'पीओपी'चा वापर घरगुती सजावट, भव्य सेट्सची उभारणी आणि मूर्ती तयार करण्यासाठी होतो. 'पीओपी'च्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत.

ठळक मुद्देमूर्तिकार, मूर्ती विक्रेते व गणेश मंडळाच्या प्रतिनिधींची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : २ सप्टेबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेनेही आपली तयारी पूर्ण केली आहे. शहरातील विसर्जन घाट, कृत्रिम तलाव, निर्माल्य कुंड, रस्त्यांची डागडुजी आदी कामे पूर्ण केली आहेत. दरम्यान, या उत्सवात जल व ध्वनी प्रदूषण होऊ नये, शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोहचू नये, या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी मूर्तीकार, मूर्ती विक्रेते व गणेश मंडळांचे पदाधिकारी यांची एक बैठक घेत त्यांना मनपा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.याप्रसंगी गणेशोत्सवादरम्यान प्लास्टर आॅफ पॅरिस निर्मित मूर्ती संबंधाने उपाययोजना करणे, ध्वनी प्रदूषण नियंत्रण, मंडप उभारणे, सजावट करणे, मूर्ती विसर्जनासंबंधी मार्गदर्शक तत्वांवर चर्चा करण्यात आली.मूर्ती आणि सजावटींमध्ये 'पीओपी'चा वापर मोठया प्रमाणात होतो, मात्र, 'पीओपी' पुन्हा वापरता येत नसल्याने प्रदूषणाची शक्यता नाकारता येत नाही. 'पीओपी'चा वापर घरगुती सजावट, भव्य सेट्सची उभारणी आणि मूर्ती तयार करण्यासाठी होतो. 'पीओपी'च्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे जलप्रदूषणात वाढ होऊन जलचर प्राण्यांसह वनस्पतींनाही धोका पोहोचतो. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शहरातील सर्व गणेश मंडळांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी मनपा आयुक्त संजय काकडे यांनी केले. यावेळी महानगरपालिकेतील सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी व गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच करामागील वर्षीच्या आकडेवारीनुसार शहरातील ९० टक्क्यांपेक्षा ज्यास्त मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच झाले होते. यंदा १०० टक्के मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच व्हावे, यासाठी मनपा प्रयत्नशील आहे. पाच ते साडेपाच फुटापर्यंतची मूर्तीसुद्धा आता कृत्रिम तलावातच विसर्जित करण्यात येणार आहे. कृत्रिम तलावात दर १ ते २ तासांनी विरघळणारी माती बाहेर काढण्यात येते. त्यामुळे मोठया मूर्तींचे विसर्जन योग्यप्रकारे होण्यास अडचण निर्माण होत नाही. याकरिता कृत्रिम तलावांची उंची वाढविण्यात आलेली आहे. कृत्रिम तलाव वापरास प्रोत्साहन म्हणून मनपातर्फे नागरिकांना प्रमाणपत्र देण्यात येते. मागील वर्षी १९ कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले होते. यावर्षी आवश्यकतेनुसार अधिक तलावांची निर्मिती करण्यात येणार आहे.देखाव्यात प्लास्टिक, थर्माकॉल टाळावेमंडळांनी गणेश सजावट व देखावे तयार करताना प्लास्टिक व थर्माकॉलचा वापर टाळावा. गणेशोत्सव काळात प्लस्टिकचा कचरा तयार होणार नाही, याचीही दक्षता घ्यावी. पर्यारवण रक्षणाची जबाबदारी प्रत्येकानेच स्वीकारायला हवी. प्रत्येक घरातून याची दक्षता घेतली गेल्यास इको प्रेंडली गणेशोत्सव साजरा व्हायला मदत होईल.स्वस्त दरात वीज पुरवठागणेश मंडळांनी स्थापनेसाठी मनपाकडून रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे. शहरातील गणेश मंडळांनी विद्युत खांबावरून अनधिकृतरित्या वीज पुरवठा घेऊ नये. विद्युत जोडणीसाठी स्वस्त दरात तात्पुरते वीज कनेक्शन महावितरण कंपनीने उपलब्ध करून दिले जात आहे. गणेश मंडळांनी त्याचा लाभ घ्यावा.

टॅग्स :Ganesh Mandal 2019गणेश मंडळ 2019