शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

चंद्रपुरातील शासकीय रक्तपेढीला कोरोनाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 06:00 IST

दररोज ४० त ५० बाटल्स रक्ताची मागणी असताना केवळ १० ते १२ रक्तदाते रक्तदान करीत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी रक्तदान करणे गरजेचे आहे.चंद्रपूर जिल्ह्यात शासकीय रुग्णालयासह, अंकुर, निनावे आणि ब्रह्मपुरीतील क्राईस्ट हास्पीटलमध्ये रक्तपेढ्या आहेत. शासकीय रक्तपेढीसह खासगी रक्तपेढींचीही अवस्थाही बिकट आहे.

ठळक मुद्देदिवसाला केवळ १० ते १२ डोनर : दररोज ४० ते ५० बाटलची रुग्णालयाला गरज

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जगभर कोरोनाने थैमान घातले असून शासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शाळा, महाविद्यालय बंद केले आहे. तर व्यावसायिकांनाही आपले प्रतिष्ठाने बंद करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे. सार्वजनिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे. याचा परिणाम रक्तदान शिबिर किंवा स्वच्छेने रक्तदान करणाऱ्यांच्या संख्येवर झाला असून चंद्रपूर शासकीय रुग्णालयातत काही दिवसात रक्ताची टंचाई भासण्याची शक्यता आहे.दररोज ४० त ५० बाटल्स रक्ताची मागणी असताना केवळ १० ते १२ रक्तदाते रक्तदान करीत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी रक्तदान करणे गरजेचे आहे.चंद्रपूर जिल्ह्यात शासकीय रुग्णालयासह, अंकुर, निनावे आणि ब्रह्मपुरीतील क्राईस्ट हास्पीटलमध्ये रक्तपेढ्या आहेत. शासकीय रक्तपेढीसह खासगी रक्तपेढींचीही अवस्थाही बिकट आहे.औद्योगिक जिल्हा असल्याने दररोज अपघात तसेच इतरही घटना सारख्या घडतात. अशावेळी रुग्णांना रक्ताची गरज भासते. शासकीय रुग्णालयामध्ये बाळंतपणे तसेच अत्यावश्यक रुग्णांसाठी रक्त पुरवठा केला जातो. त्यामुळे रक्तदात्यांच्या तुलनेमध्ये रक्ताची मागणी वाढत असल्यामुळे आणि सध्यास्थिती शासकीय रक्तपेढीमध्ये पाहिजे तेवढा रक्तसाठा नसल्यामुळे येत्या काही दिवसामध्येच रक्ताची टंचाई भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामाजिक संस्था, संघटनांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.कोरोनामुळे रक्तदातेही धास्तावलेसध्या कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे.त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. अशावेळी रक्तदातेही रक्तदान करण्यासाठी तयार नाही. सामान्य वेळी ३० ते ४० रक्तदाते स्वच्छेने रुग्णालयात रक्तदान करण्यासाठी येत होते. आता मात्र ही संख्या घटली असून सरासरी केवळ १० ते १२ रक्तदातेच दररोज रक्तदान करण्यासाठी येत आहे.भीती बाळगू नका, रक्तदान कराउन्हाळ्याच्या दिवसामध्ये अपघात तसेच इतर आजारासाठी मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज असते. अशावेळी भरपूर प्रमाणात रक्तदात्यांची गरज असते. मात्र याच दिवसामध्ये रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी होते.त्यामुळे या दिवसामध्ये रक्तदान करणे गरजेचे आहे. यावेळी कोरोनामुळे भितीयुक्त वातावरण आहे. परिणामी रक्तदाते रक्तदान करण्यासाठी पाहिजे त्या प्रमाणात येत नाही. रक्तदात्यांनी भिक्ती बाळगू नका, रक्तदान करा, आपल्या रक्तदानामुळे दुसºयांचा जीव वाचू शकतो.- डॉ. प्रेमचंद, ब्लड बँक अधिकारी, मेडिकल कॉलेज, चंद्रपूर

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBlood Bankरक्तपेढी