शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
3
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
4
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
5
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
6
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
7
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
8
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
9
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
10
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
11
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
12
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
13
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
14
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
15
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
16
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
17
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
18
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
20
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?

चंद्रपुरातील शासकीय रक्तपेढीला कोरोनाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 06:00 IST

दररोज ४० त ५० बाटल्स रक्ताची मागणी असताना केवळ १० ते १२ रक्तदाते रक्तदान करीत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी रक्तदान करणे गरजेचे आहे.चंद्रपूर जिल्ह्यात शासकीय रुग्णालयासह, अंकुर, निनावे आणि ब्रह्मपुरीतील क्राईस्ट हास्पीटलमध्ये रक्तपेढ्या आहेत. शासकीय रक्तपेढीसह खासगी रक्तपेढींचीही अवस्थाही बिकट आहे.

ठळक मुद्देदिवसाला केवळ १० ते १२ डोनर : दररोज ४० ते ५० बाटलची रुग्णालयाला गरज

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जगभर कोरोनाने थैमान घातले असून शासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शाळा, महाविद्यालय बंद केले आहे. तर व्यावसायिकांनाही आपले प्रतिष्ठाने बंद करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे. सार्वजनिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे. याचा परिणाम रक्तदान शिबिर किंवा स्वच्छेने रक्तदान करणाऱ्यांच्या संख्येवर झाला असून चंद्रपूर शासकीय रुग्णालयातत काही दिवसात रक्ताची टंचाई भासण्याची शक्यता आहे.दररोज ४० त ५० बाटल्स रक्ताची मागणी असताना केवळ १० ते १२ रक्तदाते रक्तदान करीत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी रक्तदान करणे गरजेचे आहे.चंद्रपूर जिल्ह्यात शासकीय रुग्णालयासह, अंकुर, निनावे आणि ब्रह्मपुरीतील क्राईस्ट हास्पीटलमध्ये रक्तपेढ्या आहेत. शासकीय रक्तपेढीसह खासगी रक्तपेढींचीही अवस्थाही बिकट आहे.औद्योगिक जिल्हा असल्याने दररोज अपघात तसेच इतरही घटना सारख्या घडतात. अशावेळी रुग्णांना रक्ताची गरज भासते. शासकीय रुग्णालयामध्ये बाळंतपणे तसेच अत्यावश्यक रुग्णांसाठी रक्त पुरवठा केला जातो. त्यामुळे रक्तदात्यांच्या तुलनेमध्ये रक्ताची मागणी वाढत असल्यामुळे आणि सध्यास्थिती शासकीय रक्तपेढीमध्ये पाहिजे तेवढा रक्तसाठा नसल्यामुळे येत्या काही दिवसामध्येच रक्ताची टंचाई भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामाजिक संस्था, संघटनांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.कोरोनामुळे रक्तदातेही धास्तावलेसध्या कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे.त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. अशावेळी रक्तदातेही रक्तदान करण्यासाठी तयार नाही. सामान्य वेळी ३० ते ४० रक्तदाते स्वच्छेने रुग्णालयात रक्तदान करण्यासाठी येत होते. आता मात्र ही संख्या घटली असून सरासरी केवळ १० ते १२ रक्तदातेच दररोज रक्तदान करण्यासाठी येत आहे.भीती बाळगू नका, रक्तदान कराउन्हाळ्याच्या दिवसामध्ये अपघात तसेच इतर आजारासाठी मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज असते. अशावेळी भरपूर प्रमाणात रक्तदात्यांची गरज असते. मात्र याच दिवसामध्ये रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी होते.त्यामुळे या दिवसामध्ये रक्तदान करणे गरजेचे आहे. यावेळी कोरोनामुळे भितीयुक्त वातावरण आहे. परिणामी रक्तदाते रक्तदान करण्यासाठी पाहिजे त्या प्रमाणात येत नाही. रक्तदात्यांनी भिक्ती बाळगू नका, रक्तदान करा, आपल्या रक्तदानामुळे दुसºयांचा जीव वाचू शकतो.- डॉ. प्रेमचंद, ब्लड बँक अधिकारी, मेडिकल कॉलेज, चंद्रपूर

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBlood Bankरक्तपेढी