शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
4
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
5
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
6
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
7
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
8
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
9
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
10
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
11
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
12
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
13
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
14
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
15
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
16
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
17
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
18
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
19
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
20
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'

चंद्रपुरात कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 05:00 IST

देशात कोरोना विषाणूचा पसार होताच सुमारे दोन महिने ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात २ मे रोजी पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर शहरात हळूहळू रुग्णसंख्या वाढू लागली. प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. मात्र तरीसुद्धा ५ सप्टेंबरपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात २३ हजार ११८ कोरोनाचे रुग्ण आढळून आले. यापैकी २२ हजार ६२५ जण कोरोनातून मूक्त झाले. 

ठळक मुद्देनोव्हेंबरनंतर कोरोनाचा आलेख घसरला : प्रशासनाच्या प्रयत्नाला यश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाचा प्रसार मंदावला असला तरीही आजपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाने सुमारे ३९२ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण चंद्रपूर मनपा क्षेत्रात आहे. मनपा क्षेत्रात आजपर्यंत १८८ तर ग्रामीण क्षेत्रात ३० जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. प्रशासनाला वाढता मृत्यूदर रोखण्यास यश आले असले तरीही आजपर्यंत झालेल्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक आहे.    देशात कोरोना विषाणूचा पसार होताच सुमारे दोन महिने ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात २ मे रोजी पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर शहरात हळूहळू रुग्णसंख्या वाढू लागली. प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. मात्र तरीसुद्धा ५ सप्टेंबरपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात २३ हजार ११८ कोरोनाचे रुग्ण आढळून आले. यापैकी २२ हजार ६२५ जण कोरोनातून मूक्त झाले. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा पहिला मूत्यू १ ऑगस्ट रोजी झाला. त्यानंतर मृतकाच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. सप्टेंबर महिन्यातच जिल्ह्यात चक्क १२३ रुग्णांचा मृत्यू झाला. तर ५ फेब्रुवारीपर्यंत ३९१ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. प्रशासनाच्या प्रयत्नाने आता कोरोना रुग्णाची संख्या कमी झाली असून मृतकांची संख्याही नाहीच्या बरोबरीत आहे. परंतु, कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांना स्वत:ची काळजी घेणे गरजेचे असल्याचे आरोग्य विभागाकडून कळविण्यात येत        आहे. 

सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक मृत्यूचंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण २ मे रोजी आढळून आला. तर  १ ऑगस्ट रोजी पहिला कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर या संख्येत झपाट्याने वाढ झाली. सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात १२३ रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंर ऑक्टोबर ७८, नोव्हेंबर ७०, डिसेंबर ६४ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. 

कोरोनाचा प्रसार कमी झाला असला तरीही नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. गर्दीच्या ठिकाणी विना मॉस्क जाणे टाळावे, बाहेरून आल्यानंतर हात स्वच्छ धुवावे. स्वत:च स्वत:चे रक्षक बनून काळजी घ्यावी, तेव्हाच आपण कोरोनाचा प्रसार रोखू शकतो.- डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा आरोग्य अधिकारी, चंद्रपूर

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या