शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

शिक्षण क्षेत्राला कोरोनाची काजळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 05:01 IST

मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागल्याने तसेच मुले दिवसभर टिव्ही पाहत बसल्याने पालकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे शाळा व खासगी क्लास चालकांनी विविध अ‍ॅपद्वारे व मोबाईलवरून ऑनलाईन शिकवणी वर्ग सुरू केले आहेत. ठराविक वेळेत सर्व मुलांना स्मार्ट फोन देऊन व्हिडीओ कॉलिंग अथवा व्हॉटसअ‍ॅपद्वारे नोट्स पाठवून मुलांना शिकवले जात आहे.

ठळक मुद्देमुलांचे भवितव्य टांगणीला : शिक्षक,पालक, विद्यार्थी, संस्थाचालक चिंतेत

राजकुमार चुनारकर।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : मुलांचे भविष्य प्रकाशमय करणाऱ्या शिक्षण क्षेत्राला कोरोनाची 'काजळी' लागली आहे. कोरोनामुळे शाळा, क्लास ठप्प आहेत. शाळा सुरू होण्यास सप्टेंबर महिना उजाडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालक, शिक्षक, संस्थाचालक काय व कसे करायचे, या चिंतेत आहेत. मुलेही घरात बसून कंटाळली आहेत. आॅनलाईन क्लासमुळे मुले मोबाईलच्या आहारी जाण्याबरोबर त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.कोरोनामुळे मार्च महिन्यात शाळा लॉकडाऊन झाल्या. तिसरी घटक चाचणी व वार्षिक परीक्षा होऊ शकलेली नाही. केवळ दोन परीक्षांवर मुलांचा निकाल दिला आहे. गेल्या चार महिन्यांपासून मुले घरात आहेत. शाळा सुरु होण्यास आॅगस्ट किंवा सप्टेंबर महिना उजाडणार आहे.ऑनलाईन शिक्षण पर्याय नव्हेमुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागल्याने तसेच मुले दिवसभर टिव्ही पाहत बसल्याने पालकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे शाळा व खासगी क्लास चालकांनी विविध अ‍ॅपद्वारे व मोबाईलवरून ऑनलाईन शिकवणी वर्ग सुरू केले आहेत. ठराविक वेळेत सर्व मुलांना स्मार्ट फोन देऊन व्हिडीओ कॉलिंग अथवा व्हॉटसअ‍ॅपद्वारे नोट्स पाठवून मुलांना शिकवले जात आहे. परंतु काही मुले याचा गैरफायदा घेताना दिसत आहेत. क्लास व अभ्यासाच्या नावाखाली पालकांचे मोबाईल दिवसभर मुले वापरत आहेत. क्लास संपला की चित्रपट, वेब सिरीज, कार्टून, वेगवेगळ्या क्लिप मुले पाहत आहेत.मुलांना मोबाईलचे व्यसनमुलांना मोबाईलचे व्यसन जडल्यासारखे झाले आहे. दिवसातील सर्वाधिक काळ मोबाईलवर जात असल्याने स्क्रीनच्या प्रखर लाईट व हेडफोनमुळे मुलांना डोळ्याचे व कानाचे विकार होत आहेत. तसेच मोबाईलच्या अतिवापराने अनेकांना डोकेदुखीचा त्रास वाढला आहे. मुले इंटरनेटच्या आहारी जाण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे मुलांत नेत्रविकार, कर्णविकार, डोकेदुखी असे आजार वाढल्याचे दिसत आहे.आरोग्य महत्त्वाचे की शिक्षण?शाळा सुरू झाल्या तरी त्या चालविणे अवघड असणार आहे. कारण सोशल डिस्टन्स ठेवावा लागणार आहे. दोन सत्रांत शाळा सुरू कराव्या लागतील. शिक्षकांना पूर्ण वेळ शाळेत थांबावे लागेल. यातूनही एखाद्या मुलाला कोरोनाचा संसर्ग झाला तर शाळाच बंद करावी लागणार आहे. यामुळे मुलांना शाळेत पाठवायचे की नाही, याबाबत पालकांत अद्यापही चिंता आहे.सॅनिटायझर, मास्क नवीन ओझेसध्या मुलांवर दप्तराचे ओझे आहे. त्यात आता शाळेला जाताना सॅनिटायझर, मास्क, पाणी, साबण याचे ओझे सोबत न्यावे लागणार आहे. दैनंदिन आरोग्य तपासणी करण्याचे काम शाळांवर वाढणार आहे. खेळ, स्नेहसंमेलन, सहली यावर निर्बंध येणार आहेत.ऑनलाईन शिक्षण हा कायमस्वरूपी पर्याय होऊ शकत नाही, कारण वर्गात फेस टू फेस शिकवणे हे जितके परिणामकारक होते, त्याप्रमाणे ऑनलाईन होत नाही. काही नियम घालून शाळा लवकर चालू करणे गरजेचे आहे. पण सगळ्याच शाळा यासाठी पात्र ठरतील का, हा प्रश्न आहे. कारण शाळेची इमारत, वर्गखोल्यांची जागा, संख्या व सोशल डिस्टन्स हे सगळे नियम पाहिले तर शाळा सुरू करणे अवघड आहे. काही पालक शाळा चालू करा, असे म्हणतात. कारण शैक्षणिक नुकसान होता कामा नाही, असे त्यांचे मत आहे. तर काही पालक, मुलांच्या आरोग्यापेक्षा शिक्षण महत्त्वाचे नाही, असे म्हणत आहे.-भास्कर बावनकर,जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती संघटना, चंद्रपूर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEducationशिक्षण