शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

व्यायामशाळा लोकार्पण सोहळ्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2021 13:58 IST

खासदार निधीतून उभारण्यात आलेल्या बाल उद्यानाचे शिवनेरी हे नाव बदलविण्यात येत असल्याच्या शंकेने काँग्रेसच्या काही युवा कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी येऊन प्रश्न उपस्थित केला. यातून भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली.

ठळक मुद्देव्यायामशाळेला सावरकरांचे नाव देण्यावरुन वाद

चंद्रपूर : शहरातील तुकूम प्रभागात हनुमाननगरातील शिवनेरी बाल उद्यानाचे नाव बदलविण्याच्या शंकेने काँग्रेसच्या काही युवा कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यक्रमस्थळी येऊन प्रश्न विचारल्याने दोन्ही गटांत वाद झाला. हा वाद वाढून त्यांचे रुपांतर धक्काबुक्कीत झाले. ही घटना बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.

मनपाने काही वर्षांपूर्वी हनुमाननगरात शिवनेरी बाल उद्यान तयार केले आहे. हे उद्यान बालकांसाठी उपयुक्त ठरत आहे. या उद्यानाला लागूनच सन २०१८-१९ अंतर्गत खासदारांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत २६ लाखांचा निधी खर्चून स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर व्यायामशाळा बांधण्यात आली. उद्यान व व्यायामशाळेचे नामकरण करण्यासाठी मनपाने यापूर्वीच ठराव पारीत केला. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते बुधवारी या व्यायामशाळेच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमादरम्यान, बाल उद्यानाचे शिवनेरी हे नाव बदलविण्यात येत असल्याच्या शंकेने काँग्रेसच्या काही युवा कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी येऊन प्रश्न उपस्थित केला. यातून भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची व धक्काबुक्की झाली. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी लगेच त्या युवकांना वास्तवाची जाणीव करून दिल्यानंतर वाद मिटला आणि वाद घालणारे कार्यकर्ते सभागृहाबाहेर गेले.

अहिर यांनी मैदानातील व्यायामशाळेचे नाव सावरकर असले तरी मैदानाचे नाव शिवनेरीच राहील असे स्पष्ट केले. लोकहित लक्षात ठेवूनच कार्यक्रम घेण्यात आला होता, अशी माहिती स्थायी समितीचे सभापती संदीप आवारी यांनी दिली. शहरात मात्र, दिवसभर या कार्यक्रमाची चर्चा होती. 

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर व्यायामशाळेचा उपयोग वॉर्डातील सर्व नागरिकांनी घ्यावा, या हेतूनेच व्यायामशाळा उभारण्यात आली. राष्ट्रीय विभूतींच्या कार्याचा गौरव व प्रेरणा म्हणून छत्रपती शिवाजी चौक, शहीद बाबूराव शेडमाके शहीदस्थळ व बाबू पेठ येथील नेताजी सुभाषचंद्र बोस चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात आले. व्यायामशाळा लोकार्पण सोहळ्यात कोणतेही राजकारण नाही. ज्या युवकांचे गैरसमज होते तेही दूर झाले. लोकांच्या आग्रहास्तव हा सोहळा घेण्यात आला.

-हंसराज अहीर, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री

टॅग्स :PoliticsराजकारणHansraj Ahirहंसराज अहिरBJPभाजपाcongressकाँग्रेस