शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

इंडियाज स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट जिल्ह्यासाठी चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 06:00 IST

विदर्भातील जिल्ह्यांमध्ये चंद्रपूरचे जंगल अत्यंत समृद्ध आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पामुळे पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळाली. वन्यजीव व जैवविविधतेमुळे जिल्ह्याचे नाव देशभरात पोहोचले. राज्याचे तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विकासाभिमुख धोरण परिणामकारक ठरले. जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीला अनुकूल असलेला बांबूची हजारो हेक्टर क्षेत्रात लागवड झाली.

ठळक मुद्देनिर्माणाधीन प्रकल्पातून रोजगाराच्या संधी : चंद्रपूर जिल्ह्यात ४८३२.१८ चौ. किमी. वन क्षेत्र

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात वन क्षेत्राचे प्रमाण वाढू लागल्याने त्यावर आधारित बांबू, तेंदूपत्ता आणि विविध मूल्यवर्धन प्रकल्पांची उभारणी केली जात आहे. या निर्माणाधीन प्रकल्पांमधून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. बांबूवर आधारित अगरबत्ती प्रकल्पामुळे तर हजारो महिलांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. इंडियाज स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट २०१९ च्या अहवालानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील वनक्षेत्रात ३२ चौरस किमी घट झाल्याची माहिती पुढे आली. यासाठी अवैध वृक्षतोडीकडे झालेले दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा दावा पर्यावरणवाद्यांकडून केला जात आहे.विदर्भातील जिल्ह्यांमध्ये चंद्रपूरचे जंगल अत्यंत समृद्ध आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पामुळे पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळाली. वन्यजीव व जैवविविधतेमुळे जिल्ह्याचे नाव देशभरात पोहोचले. राज्याचे तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विकासाभिमुख धोरण परिणामकारक ठरले. जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीला अनुकूल असलेला बांबूची हजारो हेक्टर क्षेत्रात लागवड झाली. शिवाय, देशभरातील विविध बांबू प्रजातींची लागवड करून अगरबत्ती व अन्य वस्तुनिर्मिती प्रकल्पांची व्याप्ती वाढविली जात आहे. जागतिक कीर्तीचे चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेने बांबू व्यवसायावर आधारित विविध अभ्यासक्रम सुरू केले. परंतु, पर्यावरणाचा ºहास व वृक्षांचे प्रमाण कमी होऊ लागल्याने पर्यावरणावर अनिष्ट परिणाम झाले. त्यामुळे इंडियाज स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट २०१९ चा अहवाल पर्यावरण प्रेमींना अस्वस्थ करणारा आहे. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ४८३२.१८ चौरस किमी वन क्षेत्र आहे. इंडियाज स्टेट फॉरेस्ट रिपोर्टनुसार त्यामध्ये ३२ चौरस किमी वन क्षेत्राची घट झाली.३३ कोटी वृक्ष लागवडीत जिल्ह्यातील नागरिक, पर्यावरण संवर्धनाविषयी बांधिलकी जोपासणाऱ्या विविध संघटनांनी लक्षवेधी योगदान दिले. मात्र, वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाने दुर्लक्ष केल्याने जिल्ह्यातील वनक्षेत्रात घट झाली आहे.95कोटी वृक्ष जिवंत३३ कोटी वृक्ष लागवड योजनेतंर्गत सन २०१७ मध्ये ४३ लाख ६१ हजार ५१६ रोपटी लावण्यात आली. त्यातील २५ लाख ७४ हजार २०० वृक्ष जगले. सन २०१८ मध्ये ७२ लाख ६६ हजार ७३८ रोपटी लावली. त्यातील ३४ लाख ४० हजार ९८ वृक्ष जगले. शतकोटी वृक्ष लागवड मोहिमेत सन २०१९ मध्ये १ कोटी ७३ लाख ३६ हजार ८५३ वृक्ष जिवंत आहेत, अशी माहिती विभागीय वन अधिकारी कार्यालयाने दिली.जिल्ह्यातील वनक्षेत्राचा तपशीलजिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र ११४४३.०० एवढे चौरस किमी आहे. यामध्ये राखीव वनक्षेत्र ३९५०. ०५ चौकिमी, सरंक्षित ८७८. ७२ चौरस किमी, अवर्गीकृत ३. ४१ चौरस किमी वनक्षेत्राचा समावेश आहे. कोअर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, ताडोबा बफर, पश्चिम चांदा, मध्य चांदा आणि ब्रह्मपुरी वन विकासाचे एकूण भौगोलिक क्षेत्र १५७२. ३२ चौरस किमी असल्याचा अहवाल मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने दिला आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील वन क्षेत्रात ३२ टक्के चौरस किमी घट झाल्याचे इंडियाज स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट २०१९ च्या अहवालात जाहीर झाले. त्यामुळे वन विभागाने वन क्षेत्रात वाढ करण्यासाठी वृक्षतोडीला प्रतिबंध व वन जमिनीवरील अतिक्रमण थांबविण्याकरिता विशेष लक्ष दिले पाहिजे.- दीपक दीक्षित, पर्यावरण अभ्यासक4,357 वनहक्क पट्टे वाटपवन विभागातंर्गत जिल्ह्यातील ४ हजार ३५७ लाभार्थ्यांना वनहक्क जमिनीचे पट्टे वाटप करण्यात आले. त्यामध्ये ३ हजार ८७२ वैयक्तिक तर ४८५ सामूहिक वनहक्क दाव्यांचा समावेश आहे. अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी अधिनियमानुसार आतापर्यंत १ लाख ३३ हजार ३८३.५४ एकर जमीन गावांना वाटप करण्यात आली. सद्यस्थितीत २२६ वैयक्तिक दावे पुनर्विलोकनाच्या प्रतीक्षेत आहेत. ३ हजार ७५ गावांची जमीन मोजणी करून सातबारा वाटप केल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली.

टॅग्स :forestजंगल