शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
5
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
6
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
7
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
8
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
9
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
10
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
11
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
12
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
13
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
14
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
15
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
16
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
17
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
18
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
19
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
20
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"

वातावरणातील बदलामुळे बालकात आजार वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 23:58 IST

वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात सध्या विषाणूजन्य आजार वाढले आहेत. त्यामुळे बालके तापाने फणफणत आहेत. तसेच जुलाब, उलटी आदी आजारांनी बालके त्रस्त होत आहेत. त्यामुळे खासगी तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे.

ठळक मुद्देआरोग्य केंद्रात कक्ष : बालकांना ताप, जुलाब, उलटीचा होऊ लागला त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात सध्या विषाणूजन्य आजार वाढले आहेत. त्यामुळे बालके तापाने फणफणत आहेत. तसेच जुलाब, उलटी आदी आजारांनी बालके त्रस्त होत आहेत. त्यामुळे खासगी तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे.ढगाळ वातावरण, रिमझिम पावसामुळे सध्या जिल्ह्यात विषाणूजन्य आजार वाढत आहेत. त्यामध्ये व्हायरल न्यूमोनिया, व्हायरल डायरिया, विषाणू मेंदूज्वर, डोकेदुखी, ताप, हातपाय गळणे, डेंग्युसदृश्य, जुलाब, उलटी आजार वाढलले आहेत. हे आजार बालकांमध्ये आढळून येत आहेत. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रासह खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गर्दी होत आहे. शासकीय रुग्णालयामध्ये आजारी बालकांची संख्या वाढली आहे.पावसाळा लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. तसेच पावसाळ्यात जलस्त्रोतांचे पाणी वाढते आणि या पाण्याचा उपयोग ग्रामीण भागातील नागरिक पिण्यासाठी करतात. त्यामुळे साथ रोगाचे आजार उद्भवतात. हे आजार होऊ नयेत यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे.नागरिकांनीही आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. लहान मुलांमध्ये व्हायरल न्यूमोनिया, तापाचे प्रमाण आढळून येत असून व्हायरल डायरियाचे प्रमाण जास्त आहे. तापाचे रुग्ण असले तरी ते क्रिटीकल नसल्याचे वैयक्तिक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आजार टाळण्यासाठी स्वच्छता बाळगावी, प्रत्येकांनी शुद्ध पाणी प्यावे, विशेष करून उकळलेले पाणी प्यावे, घर परिसर स्वच्छ ठेवावा, उघड्यावरील खाद्य पदार्थ खाणे कटाक्षाने टाळावे, नाल्यांची स्वच्छ करावी,असे आवाहनही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.विषाणूजन्य आजारबालकांंमध्ये विषाणूजन्य मेंदूज्वर, व्हायरल ताप, डेंग्यूसदृश्य आजार, जुलाब उलटी, डोकेदुखी असे आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने उघड्यावरील खाणे टाळणे गरजेचे आहे. तसेच परिसराची स्वच्छता राखावी.थंड पाण्याने अंग पुसावेबालकांत तापसदृश्य आजार र्होुऊ नये यासाठी पाणी उकळून प्यावे. ताप आल्यास थंड पाण्याने संपूर्ण शरीर पुसून घ्यावे त्यामुळे डोक्यापर्यंत ताप जात नाही. तसेच जेवणात पातळ पदार्थ खावे, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नये, डॉक्टरांकडे जाऊनच औषधी घ्यावी.

टॅग्स :Healthआरोग्य