शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

साथीच्या आजाराने नागरिक बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 6:00 AM

वातावरणात सतत बदल होत असताना प्रत्येक व्यक्तीच्या शरीराला या वातावरणात जुळवून घेणे सहज शक्य होत नाही. लहान बालके, वृद्ध व रोग प्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना आजाराची लवकर लागण होते. रात्री थोडी थंडी व दिवसा उकाडा, त्यातच अधून मधून पावसाच्या सरी अशा वातावणामुळे साथीचे आजार बळावत आहे.

ठळक मुद्देवातावरणात बदल : उबदार कपड्यांची मागणी वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून वातावरण सातत्याने बदलत आहे. कधी थंडी तर कधी कोरड्या वाऱ्यांमुळे विविध आजारांनी डोके वर काढले आहे. ऐन दिवाळीच्या दिवसात व्हायरल फीवर आणि सर्दी-खोकल्यांच्या तक्रारी वाढल्या असतानाच साथीचे आजारही वाढत आहेत. घरोघरी सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण आढळून येत आहे. परिणामी, शासकीय रुग्णालयासह खासगी दवाखानेही फुल्लं झाले आहेत. अनेक नागरिकांची दिवाळीही आजारपणातच गेली.वातावरणात सतत बदल होत असताना प्रत्येक व्यक्तीच्या शरीराला या वातावरणात जुळवून घेणे सहज शक्य होत नाही. लहान बालके, वृद्ध व रोग प्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना आजाराची लवकर लागण होते. रात्री थोडी थंडी व दिवसा उकाडा, त्यातच अधून मधून पावसाच्या सरी अशा वातावणामुळे साथीचे आजार बळावत आहे. वातावरणातील बदलामुळे विषाणूजन्य आजारातही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहावयास मिळते. आधीच श्वसनाचे विकार असणाºया व्यक्तींना या वातावरणाचा अधिक त्रास होतो. गावागावांतील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये व खासगी दवाखाने रुग्णांच्या संख्येमुळे भरल्याचे चित्र आहे.सर्दी-पडसा, खोकला व त्यामुळे आलेल्या तापावर वेळीच उपचार न केल्यास ताप वारंवार येतो. परिणामी, अनेकदा रुग्णांना जीवही गमवावा लागतो. यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे झाले आहे. यासाठी आरोग्याप्रती जनजागृती करणे महत्त्वाचे आहे.मागील काही दिवसांपासून व्हायरल फिवरने कहर केला आहे. प्रत्येक घरातील बालके आजारी दिसून येत आहे. सर्दी, खोकला, ताप आणि घसा दुखत असल्याने चिमुकल्यांची त्राही होत असल्याचे दिसते. ग्रामीण भागातही विविध आजारांची डोके वर काढले असून नागरिक जेरीस आले आहेत.मच्छरदाणीत झोपणे फायद्याचेया वातावरणात मच्छरांची उत्पत्ती अधिक होते. त्यामुळे डासांपासून बचाव व्हावा यासाठी मच्छरदाणीत झोपणे फायद्याचे ठरते. सर्दी, पडसा, खोकला झाल्यास वेळीच डॉक्टरांच्या सल्लाने औषधोपचार करावा.त्वचा कोरडी व्हायला सुरुवातथंडीमध्ये कोरडी हवा श्वासोच्छवासाद्वारे आत जाते व याचा परिणाम फुफ्फुसावर होतो. थंडीमुळे घसा खवखवणे, घशाचा संसर्ग असे आजार होतात. यापासूनच श्वसनाच्या आजाराची सुरुवात होते. दम्याच्या रुग्णांना या वातावरणाचा अधिक त्रास होतो. अशा प्रतिकूल परिस्थितीत वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. नियमित फिरायला जाणे, व्यायाम करणे, एकाच वेळी न खाता थोडे-थोडे चार ते पाच वेळा खाणे, रोज तीन ते चार लिटर पाणी पिणे, रोज एक फळ वा सुका मेवा खाणे आवश्यक असल्याचे डॉक्टरचे म्हणणे आहे. अधिक वेळा उपाशी राहणे या काळात अपायकारक ठरते. यामुळे नियमित सकस आहार घ्यावा तसेच हात, पाय स्वच्छ धुण्याच्या सूचनाही वैद्यकीय तज्ज्ञांनी दिल्या आहे.

टॅग्स :Healthआरोग्य