शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

डासांनी उडविली नागरिकांची झोप

By admin | Updated: September 6, 2014 23:40 IST

हिवताप व हत्तीपायासह इतर रोगांचा प्रसार थांबविण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने मोहिम राबविली जात असली तरी या रोगाच्या प्रसारासाठी कारणीभूत असलेल्या डासांचा नायनाट प्रथम करणे गरजेचे असताना

देवाडा (खु.) : हिवताप व हत्तीपायासह इतर रोगांचा प्रसार थांबविण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने मोहिम राबविली जात असली तरी या रोगाच्या प्रसारासाठी कारणीभूत असलेल्या डासांचा नायनाट प्रथम करणे गरजेचे असताना आरोग्य विभाग, ग्रामपंचायत प्रशासन उदासीन आहे. परिणामी पोंभूर्णा तालुका परिसरातील अनेक भागात डासांचा प्रकोप वाढला आहे पोंभूर्णा येथील वार्ड क्रमांक चारमध्ये संसर्गजन्य आजाराच्या साथीला सुरुवात झाली आहे. एकीकडे महाराष्ट्र शासन नागरिकांचे आरोग्य व स्वच्छतेविषयी मोहिम राबवित आहे, तर दुसरीकडे प्रत्यक्षात पोंभूर्णा शहरात व ग्रामीण भागात मात्र विरोधाभास निर्माण करणारे चित्र पहायला मिळत आहे. स्वच्छतेचा कुठे मागमुसही दिसत नाही. शहरात डासांचे प्रमाण वाढले असून त्यामुळे विविध संसर्गजन्य आजाराची साथ सुरू झाली आहे. बालकांसह वृद्ध व युवकांना साथीच्या विविध आजारांनी ग्रासले आहे. ताप, खोकला, सर्दी पडसे यासारख्या सामान्य आजारासोबत इतरही आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे येथील खासगी दवाखान्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. येथील शासकीय रुग्णालयात पाहिजे त्या प्रमाणात उपाययोजना होत नसल्याने काही रुग्ण चंद्रपूरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी जात आहेत. पोंभूर्णा येथील वार्ड क्रमांक चारमधील पाच रुग्ण डेंग्यूसदृश्य तापाच्या विळख्यात असून ते खासगी रुग्णालयात भरती असल्याचे सांंगण्यात येत आहे.तालुक्यातील कसरगट्टा येथे नुकतीच विषाणूजन्य आजाराची साथ सुरू झाली होती. ती सध्या काही प्रमाणात नियंत्रणात असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. तालुक्यातील पोंभूर्णा, बोर्डा बोरकर, झुल्लुरवार, चिंतलधाबा, देवाडा (खुर्द) या ठिकाणी मार्च, एप्रिल महिन्यामध्ये डेंग्युसदृश्य तापाने कहर केला होता. त्यातच तिघांचा मृत्युसुद्धा झाला होता. त्यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील नाल्यांचा थातुर- मातूर उपसा करुन फॉगिंग मशीनद्वारे काही गावांमध्ये एकदा फवारणी करण्यात येवून आपली जबाबदारी झटकली होती. त्यावेळी फक्त मुख्य रस्त्यांच्या नाल्याचा उपसा करण्यात आला होता. त्यातही काही दुकानदारांनी नाल्यावर अतिक्रमण केल्याने त्याठिकाणची जागा उपसा न झाल्याने दुर्गंधीयुक्त पाण्याची विल्हेवाट होवू शकली नाही. परिणामी जिकडे-तिकडे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिणामी डासांनी आपला उच्छाद मांडला असून नानाविध आजाराला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. शहरात व ग्रामीण भागात विविध संसर्गजन्य आजाराची साथ पसरत आहे. आजारानी उग्ररुप धारण करण्यापूर्वीच स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने नाल्यांमधील घाणीची विल्हेवाट लावावी व डासांचा नायनाट करण्यासाठी तालुक्यात फॉगिंग मशीनद्वारे फवारणी करावी अशी मागणी होत आहे. सायंकाळी होणाऱ्या सततच्या विजेच्या लंपडावामुळे डासांचा उपद्रव अधिक होत असल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. (वार्ताहर)