शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

डासांनी उडविली नागरिकांची झोप

By admin | Updated: September 6, 2014 23:40 IST

हिवताप व हत्तीपायासह इतर रोगांचा प्रसार थांबविण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने मोहिम राबविली जात असली तरी या रोगाच्या प्रसारासाठी कारणीभूत असलेल्या डासांचा नायनाट प्रथम करणे गरजेचे असताना

देवाडा (खु.) : हिवताप व हत्तीपायासह इतर रोगांचा प्रसार थांबविण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने मोहिम राबविली जात असली तरी या रोगाच्या प्रसारासाठी कारणीभूत असलेल्या डासांचा नायनाट प्रथम करणे गरजेचे असताना आरोग्य विभाग, ग्रामपंचायत प्रशासन उदासीन आहे. परिणामी पोंभूर्णा तालुका परिसरातील अनेक भागात डासांचा प्रकोप वाढला आहे पोंभूर्णा येथील वार्ड क्रमांक चारमध्ये संसर्गजन्य आजाराच्या साथीला सुरुवात झाली आहे. एकीकडे महाराष्ट्र शासन नागरिकांचे आरोग्य व स्वच्छतेविषयी मोहिम राबवित आहे, तर दुसरीकडे प्रत्यक्षात पोंभूर्णा शहरात व ग्रामीण भागात मात्र विरोधाभास निर्माण करणारे चित्र पहायला मिळत आहे. स्वच्छतेचा कुठे मागमुसही दिसत नाही. शहरात डासांचे प्रमाण वाढले असून त्यामुळे विविध संसर्गजन्य आजाराची साथ सुरू झाली आहे. बालकांसह वृद्ध व युवकांना साथीच्या विविध आजारांनी ग्रासले आहे. ताप, खोकला, सर्दी पडसे यासारख्या सामान्य आजारासोबत इतरही आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे येथील खासगी दवाखान्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. येथील शासकीय रुग्णालयात पाहिजे त्या प्रमाणात उपाययोजना होत नसल्याने काही रुग्ण चंद्रपूरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी जात आहेत. पोंभूर्णा येथील वार्ड क्रमांक चारमधील पाच रुग्ण डेंग्यूसदृश्य तापाच्या विळख्यात असून ते खासगी रुग्णालयात भरती असल्याचे सांंगण्यात येत आहे.तालुक्यातील कसरगट्टा येथे नुकतीच विषाणूजन्य आजाराची साथ सुरू झाली होती. ती सध्या काही प्रमाणात नियंत्रणात असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. तालुक्यातील पोंभूर्णा, बोर्डा बोरकर, झुल्लुरवार, चिंतलधाबा, देवाडा (खुर्द) या ठिकाणी मार्च, एप्रिल महिन्यामध्ये डेंग्युसदृश्य तापाने कहर केला होता. त्यातच तिघांचा मृत्युसुद्धा झाला होता. त्यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील नाल्यांचा थातुर- मातूर उपसा करुन फॉगिंग मशीनद्वारे काही गावांमध्ये एकदा फवारणी करण्यात येवून आपली जबाबदारी झटकली होती. त्यावेळी फक्त मुख्य रस्त्यांच्या नाल्याचा उपसा करण्यात आला होता. त्यातही काही दुकानदारांनी नाल्यावर अतिक्रमण केल्याने त्याठिकाणची जागा उपसा न झाल्याने दुर्गंधीयुक्त पाण्याची विल्हेवाट होवू शकली नाही. परिणामी जिकडे-तिकडे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिणामी डासांनी आपला उच्छाद मांडला असून नानाविध आजाराला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. शहरात व ग्रामीण भागात विविध संसर्गजन्य आजाराची साथ पसरत आहे. आजारानी उग्ररुप धारण करण्यापूर्वीच स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने नाल्यांमधील घाणीची विल्हेवाट लावावी व डासांचा नायनाट करण्यासाठी तालुक्यात फॉगिंग मशीनद्वारे फवारणी करावी अशी मागणी होत आहे. सायंकाळी होणाऱ्या सततच्या विजेच्या लंपडावामुळे डासांचा उपद्रव अधिक होत असल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. (वार्ताहर)