गोरगरिबांसाठी काँग्रेस पक्षच पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 12:55 AM2017-11-01T00:55:55+5:302017-11-01T00:56:02+5:30

देशात मागील ६० वर्षांपासून काँग्रेस पक्षाने सत्ता चालवून देशाची प्रगती केली. त्यात सर्वसामान्य जनतेचे हित जोपासत न्याय देण्याचे काम केले असून गोरगरीब जनतेची प्रगती उंचविण्यासाठी माजी ....

The choice of the Congress party for the people of the Ganges | गोरगरिबांसाठी काँग्रेस पक्षच पर्याय

गोरगरिबांसाठी काँग्रेस पक्षच पर्याय

Next
ठळक मुद्देअविनाश वारजूकर : भालेश्वर येथे कार्यकर्ता स्नेहमीलन व सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : देशात मागील ६० वर्षांपासून काँग्रेस पक्षाने सत्ता चालवून देशाची प्रगती केली. त्यात सर्वसामान्य जनतेचे हित जोपासत न्याय देण्याचे काम केले असून गोरगरीब जनतेची प्रगती उंचविण्यासाठी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी प्रयत्न करून न्याय देण्याचे काम केले. मात्र विद्यमान सरकारने जनहितविरोधी धोरण राबवून जनतेची दिशाभूल केली आहे. त्यामुळे पुन्हा काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने संघटन मजबुतीसाठी प्रयत्न करावे, असे आवाहन माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर यांनी केले.
भालेश्वर येथील कार्यकर्ता व सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, प्रदेश सचिव रवींद्र दरेकर, युवक काँग्रेसचे लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, पंजाबराव गावंडे, जि.प. गटनेते डॉ.सतीश वारजूकर, जि. प सदस्य राजेश कांबळे, जि. प. सदस्य प्रमोद चिमुरकर, जि. प. सदस्य स्मिता पारधी, महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष मंगला लोनबले, तालुका अध्यक्ष खेमराज तिडके, विजय गावंडे, पं. स. सदस्य रोशन ढोक, विजय अमृतकर, कायरकर, नेताजी मेश्राम वामन मिसार आदी उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रात सत्ता असताना महत्वाचे पदे घेतली नाही. ते जनतेच्या कल्याणासाठी झटत राहिले व आजही झटत आहेत. काँग्रेसच्या काळातील योजनांचे नावे बदलून जुन्याच योजना भाजप शासन राबवित असून जनविरोधी निर्णय घेत आहे. मात्र काँग्रेस पक्ष जणसामान्यांपर्यत पोहचून समस्या सोडवित आहे, असे सांगितले. कार्यक्रम दरम्यान जि. प. सदस्य व पं.स. सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यकर्ता स्नेहमीलन मेळाव्यात चिमूर तालुका युवक काँग्रेस तालुका अध्यक्षपदी धनराज डवले यांची नियुक्ती करून उपस्थितांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आला. यावेयी शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
रुग्णालयाची मागणी
गोवरी : पाचगाव हे गाव आदिवासीबहुल गाव आहे. गावातील बहुतेक कुटुंबाकडे शेती व्यवसाय आहे. त्यामुळे गावात पशुधनाची संख्या मोठी आहे. पशुधन आजारी पडल्यास त्यांना उपचारासाठी भुरकुंडा येथे न्यावे लागते. त्यामुळे येथे पशुवैद्यकीय रुग्णालय सुरु करण्याची मागणी आहे

Web Title: The choice of the Congress party for the people of the Ganges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.