शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

रसायनयुक्त पाणी वर्धा नदीत

By admin | Updated: March 22, 2015 00:04 IST

येथील वेकोलिच्या घुग्घुस खुल्या कोळसा खाणीतील प्रदूषित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता वर्धा नदीत सोडले जात आहे.

घुग्घुस : येथील वेकोलिच्या घुग्घुस खुल्या कोळसा खाणीतील प्रदूषित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता वर्धा नदीत सोडले जात आहे. याशिवाय वणी - घुग्घुस मार्गावरून दिवसरात्र होणाऱ्या वाहतुकीतून उडणारी धूळ पाण्यावर साचत असल्याने पाण्यावर दूषित लेअर दिसून येत आहे. विशेष म्हणजे, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाहणीत हे वास्तव आढळून आले आणि त्यावर तात्काळ उपाययोजना करावी, असे पत्र वेकोलि व्यवस्थापनाला देण्यात आले. मात्र या पत्राकडे वेकोलि सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. ही गंभीर बाब माहितीच्या अधिकारातून उघडकीस आली आहे.घुग्घुस खुल्या कोळसा खाणीतून आॅईल मिश्रीत पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया न करता नाल्याद्वारे सरळ वर्धा नदीत सोडले जात आहे. हा प्रकार मागील अनेक वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. खाणीतील दूषित पाणी बाहेर सोडण्यापूर्वी विशिष्ठ संयंत्राद्वारे या पाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध करणे बंधनकारक आहे. तसे संयंत्रही वेकोलिकडे आहे. पण हे संयंत्र अनेक वर्षांपासून नादुरुस्त आहे. ही बाब काही महिन्यांपूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या पाहणीतही आढळून आली होती. नदीचे पाणी दूषित झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेकोलिच्या अधिकाऱ्यांना प्रदूषण थांबविण्याकरिता उपाययोजना का करण्यात येत नाही, या आशयाची शोकाज नोटीसही बजावली. मात्र वकोलिने कोणतीही उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही. नायगाव कोळसा खाणीचे दूषित पाणीही वर्धा नदीत सोडणे सुरू आहे. (वार्ताहर)