शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

सूर्याच्या आगीत होरपळतोय चंद्रपूर जिल्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 13:12 IST

कारखान्यांच्या राक्षसी प्रदूषणाने आधीच आजारी असलेला चंद्रपूर जिल्हा आता सूर्याच्या आगीने होरपळत आहे.

ठळक मुद्देदिवसा कर्फ्यूसदृश स्थितीतब्बल ३० दिवस पारा ४४ ते ४७ अंशावर

राजेश भोजेकरलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कारखान्यांच्या राक्षसी प्रदूषणाने आधीच आजारी असलेला चंद्रपूर जिल्हा आता सूर्याच्या आगीने होरपळत आहे. यंदा ३० मार्चपासूनच सूर्य आग ओकू लागला. गेल्या ४७ दिवसांपासून सूर्याचा पारा ४४ ते ४७ अंशाच्या खाली उतरायला तयार नाही. मे महिना अजून संपलेला नाही. या आगीने चंद्रपूर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून जगणेही असह्य झाले आहे. दुपारी सर्वत्र संचारबंदी सदृश स्थिती बघायला मिळत आहे.चंद्रपूर जिल्हा विपुल खनिज संपत्ती आणि वनसंपदेने नटलेला असला तरी हीच खनिज संपत्ती आता चंद्रपूरकरांवरच उठली आहे. या खनिज संपत्तीची लयलुट करण्यासाठी जिल्ह्यात हजारांच्या घरात कारखाने थाटलेले आहे. या कारखान्यातून निघणारी उष्णता चंद्रपूर जिल्ह्याच्या तापमानात मोठी भर घालत आहे. यंदा सूर्य तापायला लागल्यानंतर विदर्भात त्यांच्या झळा सर्वाधिक बसू लागल्या. सुरुवातीला विदर्भातील अकोला जिल्ह्याचा पारा सर्वाधिक होता. यानंतर अन्य जिल्हेही तापायला लागले. नंतर अन्य जिल्ह्यांचे तापमान कमी होत असताना चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान मात्र वाढताना दिसत आहे. ३० मार्चपासून चंद्रपूर जिल्ह्यातील तापमानावर लक्ष टाकल्यास चंद्रपूर जिल्ह्यात अक्षरश: सूर्य आगच ओकत असल्याचे दिसून येते.सकाळी ८ वाजतापासूनच उन्हाच्या झळा बसायला सुरुवात होते. दिवसा नागरिकांचे घराबाहेर पडणे बंद पडले आहे. अतिमहत्त्वाच्या कामानिमित्तच चंद्रपूरकर घराबाहेर पडताना दिसून येत आहे. नोकरदार वर्ग कार्यालयातच बसून राहणे पसंत करीत आहेत. नेहमी दिवसभर गजबजून असलेले शहराचे रस्ते दुपारी मोकळे दिसायला लागले आहे. मुख्य रस्त्यांवर नाममात्र माणसे दिसतात. शहरात संचारबंदी लागल्यागत स्थिती निर्माण झाली आहे.४ दिवस पारा ४५ अंशावर३१ मार्चला ४४.२ अं.से. तापमानाची नोंद झाली. यानंतर पारा ४१ अंशाच्या खाली उतरलाच नाही. ३० मार्च ते १६ मे या ४७ दिवसांतील तापमानावर दृष्टी टाकल्यास तब्बल १४ दिवस पारा ४५ अंशावर होता. ८ दिवस ४६ अंशावर होता. तर २ दिवस ४७ अंशावर होता. ६ दिवस ४३ अंशावर आणि केवळ ५ दिवस ४३ अंशावर होता. अन्य केवळ १२ दिवस तो ४१ ते ४२ अंशावर होता. मे महिना संपायला अजून दोन आठवडे शिल्लक आहेत. यंदा मान्सून वेळेवरच दाखल होईल, हा हवामान विभागाचा अंदाज असला तरी तो दरवर्षी खरा ठरणार याची शाश्वती नाही. मान्सून वेळेवर दाखल न झालस या कालावधीतही चंद्रपूर जिल्ह्याला सूर्याची आग सोसावी लागणार आहे.

बळीराजा भर उन्हात राबतोय

खरीपाचा हंगाम तोंडावर आहे. यंदा मान्सून वेळेत येण्याचे भाकीत हवामान खात्याने वर्तविल्यामुळे बळीराजाच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. उन्हाची तमा न बाळगता तो पेरणीपूर्व मशागतीसाठी शेतावर राबताना दिसत आहे.

३३ कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्व वाढलेराज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीचा विडा उचलला तो उगीच नाही. टिका करणे सोपे आहे. शंभर टक्के वृक्ष जगण्याची हमी टिका करणारेही देऊ शकत नाही. जे वृक्ष जगले ते पर्यावरणाच्या दृष्टीने फायद्याचेच आहे. भविष्यातील धोके टाळण्यासाठी वनमंत्र्यांनी टाकलेले सकारात्मक पाऊल चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येकाला आता टाकावे लागणार आहे.

पर्यावरणवाद्यांना सोशल मीडियाची मर्यादाअदानी प्रकल्पाला विरोध करून चंद्रपूरातून हाकलून लावणारे पर्यावरणवादी आता नावाने मोठे झाले आहे. ते स्वत:ला तज्ज्ञ मानायला लागले असून ते सतत सोशल मिडियावरच विचार मांडताना दिसून येत आहे. जिल्ह्यात सूर्य आग ओकत असताना अपवाद वगळता याबाबत ते ब्र देखील काढताना ते दिसत नाही.

३० मार्च ते १६ मेपर्यंतचे चंद्रपूर जिल्ह्यातील तापमान४५ अंश - १४ दिवस४६ अंश - ८ दिवस४७ अंश - २ दिवस४४ अंश - ६ दिवस४३ अंश - ५ दिवस४१ ते ४२ अंश - १२ दिवस

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशल