शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

'ओबीसींवरील अन्यायासाठी केंद्र सरकारच जबाबदार'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2021 3:25 PM

न्यायालयाला हवा असलेला इम्पिरीकल डेटा हा केंद्र सरकारकडे आहे. तो केंद्र सरकार द्यायला तयार नाही त्यामुळे ओबीसी समाजाचे मोठे नुकसान होते आहे, असे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले. 

चंद्रपूर :  ओबीसी आरक्षणासाठी आम्ही सतत लढा देत आहोत. केंद्र सरकारकडे ओबीसीचा इम्पिरीकल डेटा २०१६ पासून पडून आहे. केंद्राने त्यात दुरुस्ती न केल्याने ओबीसीवर आरक्षणाबाबत मोठा अन्याय झाला, असा आरोप राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मंगळवारी चंद्रपुरातील जनता महाविद्यालयातील कृतज्ञता सोहळ्यात केला.

ओबीसी आरक्षणासाठी आज सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यासाठी ओबीसी आरक्षणाच्या विरोधात काम करणाऱ्यांना बाजूला करायला हवे. राज्य सरकार हे ओबीसी घटकाचे राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी प्रत्येक मार्ग तपासून पाहत आहे. राज्याची न्यायालयीन लढाई देखील सुरू आहे. मात्र, न्यायालयाला हवा असलेला इम्पिरीकल डेटा हा केंद्र सरकारकडे आहे. तो केंद्र सरकार द्यायला तयार नाही त्यामुळे ओबीसी समाजाचे मोठे नुकसान होते आहे, असे भुजबळ यावेळी म्हणाले. 

महाराष्ट्रमध्ये आरक्षण विरोधी कारवाया करण्यात कोण पुढे आहे, हे जनतेला चांगले ठाऊक आहे. २०१० पासून महात्मा फुले समता परिषदने आरक्षणासाठी लढा सूरू ठेवला. सर्वोच्च न्यायालयात याचिका टाकली. २०१६ पर्यंत हे आंदोलन सुरूच होते. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर ओबीसींचा डाटा त्यांच्याकडे गेला. अर्थतज्ज्ञ अरविंद पनगढीया यांच्या नेतृत्वात समिती नेमण्यात आली. परंतु, पाच वर्षे होऊनही अन्य सदस्यांची नियुक्तीच केली नाही. दरम्यान, पनगढीया यांनी राजीनामा दिल्याने हे काम थांबले. हा डाटा २०१६ पासून केंद्र सरकारच्या अखत्यारित आहे. मग त्यात दुरुस्ती का केली नाही, असा प्रश्न ना. भुजबळ यांनी उपस्थित केला.

२०१७ मध्ये राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदी होते. अध्यादेशातील चुका दुरुस्त करण्यासाठी व ओबीसी इंम्पिरीकल डेटा मिळविण्यासाठी २० पत्रे लिहिली. मात्र, केंद्र व तत्कालीन राज्य सरकारने हेतूपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे ओबीसी आरक्षणापासून वंचित आहे. एसटी व एसीप्रमाणे ओबीसीलाही घटनात्मक आरक्षण द्यावे, यासाठी आम्ही लढा देत राहणार आहे, असेही ना. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

जो ठसा उमटवेल त्यालाच तिकीट

जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका व नगरपंचायतच्या निवडणुकीत जे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचा ठसा उमटवतील त्यांनाच तिकीट देऊ. त्यासाठी पक्षातील सर्वांनी आगामी निवडणुकीसाठी कंबर कसून कामाला लागावे, असे आवाहन ना. भुजबळ यांनी कृतज्ञता सोहळ्यात केले.

टॅग्स :PoliticsराजकारणChhagan Bhujbalछगन भुजबळ