शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
5
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
6
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
7
Success Story : शेतकऱ्याच्या मुलानं बनवलं Nirmaला मोठा ब्रँड; सायकलवरुन ₹३ किलोनं विकली पावडर; वाचा करसनभाईंची कहाणी
8
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
9
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
10
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
11
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
12
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
13
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
14
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
15
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
16
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
17
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
18
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
19
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
20
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल

पदभरतीमधील जाचक अटी तातडीने रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:11 AM

जिल्हा परिषद अंतर्गत गट क सरळसेवा भरतीसाठी आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले. मात्र, विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क वाढवून अडचणी निर्माण केल्या. त्यामुळे जाचक अटी रद्द करण्याची मागणी तालुका रोजगार संघाच्या शिष्टमंडळाने तहसीलदार चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देबेरोजगार संघाची मागणी : तहसीलदारांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : जिल्हा परिषद अंतर्गत गट क सरळसेवा भरतीसाठी आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले. मात्र, विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क वाढवून अडचणी निर्माण केल्या. त्यामुळे जाचक अटी रद्द करण्याची मागणी तालुका रोजगार संघाच्या शिष्टमंडळाने तहसीलदार चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.जिल्हा परिषद अंतर्गत भरती प्रक्रियेत विद्यार्थ्यांना पदनिहाय व जिल्हानिहाय परीक्षा शुल्क भरण्याच्या सूचना संबंधित जाहिरातीमध्ये दिल्या आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात १३ प्रकारच्या एकूण ४४२ पदांसाठी अर्ज करण्याची मुभा आहे. प्रत्येक पदासाठी खुल्या प्रवर्गाला ५०० रूपये व मागासवर्गीय २५० रूपये परीक्षा शुल्क भरण्याच्या अटी घालण्यात आल्या. सदर जाहिरातीनुसार प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक जिल्ह्यात अर्ज करायचा असल्यास खुल्या प्रवर्गासाठी एका जिल्ह्यातील एकूण १३ पदांसाठी ६ हजार ५०० रूपये तर राज्यातील एकूण ४४२ पदांसाठी २ लाख २१ हजार रूपये व प्रत्येक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना १३ पदांसाठी ३ हजार २४० व ४४२ पदांसाठी १ लाख १० हजार रूपये परीक्षा शुल्क मोजावे लागणार आहे.एवढी मोठी परीक्षा शुल्क घेऊन भरती प्रक्रिया राबविण्यामागे शासनाचा हेतू स्वच्छ नाही. यातून बेरोजगारांची आर्थिक लूट करून त्यांना करिअरपासून परावृत्त केल्या जात आहे. राज्य शासन विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत असल्यामुळे सामाजिक व राष्ट्रीय सलोखा व एकूनच घटनात्मक मूल्ये धोक्यात आली, असा आरोप निवेदनातून केला आहे. शासनाच्या अशा बेजबाबदार धोरणामुळे लाखो अन्यायग्रस्त बेरोजगार विद्यार्थ्यांचे करिअर धोक्यात आले आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया तातडीने रद्द करून सुधारित प्रक्रिया अमलात आणावी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क परत करावे, अशी मागणी तालुका रोजगार संघाचे संघटक प्रा. नामदेव जेंगठे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ तहसीलदार चव्हाण यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. शिष्टमंडळात विजय मुळे, प्रदीप राऊत, ज्ञानज्योती, जवाहर, व दिशा ग्रंथालयाचे विद्यार्थी बहुसंख्येने सहभागी झाले होते.विद्यार्थ्यांची आर्थिक लूटजि. प. मधील भरती प्रक्रियेत दोन अडीच लाख विद्यार्थी सहभागी झाल्यास शासनाला परीक्षा शुल्कापोटी सुमारे चार हजार कोटी होणार आहेत. स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली अधिकाऱ्यांना हाताशी धरून राज्य शासन बेरोजगार विद्यार्थ्यांची लूट करीत आहे. हे भारतीय संविधातील कल्याणकारी तत्त्वाला धरून नाही. चुकीच्या अटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे आर्थिक व मानसिक शोषण केल्या जात आहे. हा प्रकार बंद करून पद भरतीच्या नवीन अटी लागू करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली आहे.

टॅग्स :jobनोकरीzpजिल्हा परिषद