शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

वैनगंगा नदीत नाव बुडाली; दोघे बेपत्ता, सहा जणांना वाचविण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 5:51 PM

वैनगंगा नदीपात्राच्या कढोली-हरांबा घाटावर अंत्यविधीसाठी जाताना नाव उलटली.

चंद्रपूर : वैनगंगा नदीपात्राच्या कढोली-हरांबा घाटावर अंत्यविधीसाठी जाताना नाव उलटली. यावेळी नावेमध्ये बसलेले आठही जण नदीमध्ये बुडाले. मात्र परिसरातील नागरिक व पोलिसांच्या सहकार्याने सहा जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.परंतु, दोघेजण बेपत्ता आहेत.  ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यासाठी चंद्रपूर व गडचिरोली येथील पथकांना प्राचारण करण्यात आले असून त्यांचा शोध सुरु आहे. रामचंद्र हनुजी पेंदाम (४०), परशुराम वाघु आत्राम (४२) दोघेही रा. राजगोपालपुरी असे बेपत्ता व्यक्तीचे नाव आहे. 

कढोली येथील एका महिलेचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला. त्या महिलेवर कढोली-हरांबा नदीपात्रामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. अंत्यविधीसाठी गडचिरोली-चार्मोशी येथील आप्तेष्ठ नावेने येत होते. नदीघाट शंभर मिटर अंतरावर असताना नाव अचानक नदीमध्ये उलटली. यावेळी नावेमध्ये बसलेले आठहीजण नदीत बुडाले. यावेळी नदीघाटावर उपस्थित नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली. तसेच बुडालेल्या नातेवाईकांना काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले.

दरम्यान सावलीच्या तहसीलदार, सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरिक्षक मस्के, पोलीस उपनिरिक्षक उंदिरवाडे यांच्या नेतृत्वात सर्व पोलिसांची चमू दाखल झाली. पोलिसांनी उपस्थिताच्या मदतीने अमलजीत सुरेश कन्नाके (३०), देवराव मोहन कन्नाके (४०), केशव मोहन कन्नाके (४५), गंगाधर सोमू वेलादी (५३), संदीप देवराम कन्नाके (३५), कमलाबाई देवराव कन्नाके या सहा जणांना सुखरुप बाहेर काढले. मात्र रामचंद्र हनुजी पेंदाम व परशुराम आत्राम यांचा शोध लागला नाही. त्यामुळे चंद्रपूर व गडचिरोली येथील पानबुड्याची चमू बोलविण्यात आली. त्यांच्याकडून शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र वृत्त लिहीपर्यंत त्या दोघांचा शोध लागला नाही.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिस