शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत काँग्रेसनं केला उद्धव ठाकरेंचा गेम?; निवडणुकीनंतरचं स्नेहभोजन वादात
2
निवडणुकीत हरवले ४५ हजार कोटींचे मराठवाड्याचे पॅकेज; प्रचारातही कुणी शब्द काढला नाही
3
“इंडिया आघाडीचे सरकार आल्यास १०० दिवसांत इलेक्टोरल बॉण्डचा तपास करणार”: अरविंद केजरीवाल
4
पश्चिम बंगालमध्ये राडा! भाजपाच्या महिला कार्यकर्त्याच्या मृत्यूनं तणाव; TMC वर आरोप
5
IPL 2024: दोन वर्ष, दोन जिव्हारी लागणारे पराभव... एकाच मैदानाने दोन वेळा तोडलं Virat Kohli चं स्वप्न
6
Smriti Irani : "CM हाऊसमध्ये स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन, केजरीवाल गप्प का?"; स्मृती इराणींचं टीकास्त्र
7
Rajkummar Rao : "आता तो माझ्या आयुष्याचा..."; राजकुमार राव आईच्या आठवणीत आजही करतो दर शुक्रवारी व्रत
8
"न्याय झाल्यासारखा दिसला पण पाहिजे"; मतांच्या आकडेवारीवरुन सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाला विनंती
9
बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू
10
Gold Silver Price 23 May: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, एकाच दिवसात सोनं ₹१२८९, चांदी ₹३४७६ स्वस्त 
11
...म्हणून मला भारतीय संघाचा कोच व्हायचं नाही; Ricky Ponting नं सांगितलं कारण
12
"... तो रिपोर्ट खोटा आणि निराधार," कोळसा पुरवठा घोटाळ्याच्या आरोपावर Adani Groupचं स्पष्टीकरण
13
"पैसे देऊन गर्दी करतात", मोदींच्या विधानावर सपा नेत्याचा संताप; म्हणाले, "भाजपाचे बादशाह..."
14
Aadhar Card : १४ जूननंतर जुने आधार कार्ड खरोखरच निरुपयोगी होईल का? जाणून घ्या संपूर्ण सत्य
15
Tata Safari Review: टाटाची सफारी, चिखलात घातली, डोंगरात पळविली, १००० किमी चालवली; मायलेज, फिचर्स कशी वाटली...
16
राजकुमार रावचा 'गजगामिनी वॉक' पाहून पोट धरुन हसाल, 'हीरामंडी'च्या बिब्बोजानची केली कॉपी
17
१७ हंगाम अन् ६ संघ! Dinesh Karthik च्या IPL कारकिर्दीला पूर्णविराम
18
“काही नेत्यांची कीव येते”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी वसंत मोरेंचे रोखठोक भाष्य, दिला इशारा
19
भारत सरकारने सत्या नडेलांना ठोठावला लाखोंचा दंड! दोन महिन्यांत पैसे भरण्याचे आदेश
20
Fact Check: प्रशांत किशोर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला? व्हायरल होत असलेले पत्र आहे खोटे!

बंडू धोत्रे यांचा अन्नत्याग सत्याग्रह मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 4:24 AM

चंद्रपूर : शहरातील रामाळा तलावाच्या स्वच्छतेबाबत इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग सत्याग्रह प्रशासनाने मागण्या मान्य ...

चंद्रपूर : शहरातील रामाळा तलावाच्या स्वच्छतेबाबत इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग सत्याग्रह प्रशासनाने मागण्या मान्य केल्यानंतर मागे घेण्यात आला. प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र तहसीलदार नीलेश गौंड यांच्या हस्ते देण्यात आले. ज्येष्ठ समाजसेवक मोहन हिराबाई हिरालाल यांच्या हस्ते लिंबूपाणी पाजून बंडू धोत्रे यांचे उपोषण सोडले.

चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक गोंडकालीन रामाळा तलाव प्रदूषणमुक्त करण्याकरिता पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे यांनी रामाळा तलावाचे खोलीकरण व सौंदर्यीकरण करण्याबाबतचा प्रस्ताव शासनास येत्या सात दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिलेत. रामाळा तलाव स्वच्छता व सुशोभीकरणासाठी दोन टप्प्यांत कामे पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. पर्यटनमंत्री ठाकरे यांच्या निर्देशान्वये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उपरोक्त विषयाबाबत सर्व संबंधित यंत्रणेची आढावा सभा घेण्यात आली. रामाळा तलाव खोलीकरणबाबतचा प्रस्ताव पाटबंधारे विभागामार्फत तयार करण्यात आला असून, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबई यांना सादर करण्यात आला आहे.

खोलीकरणाबाबत पुरातत्त्व विभागाची परवानगी आवश्यक असल्याने, विहीत नमुन्यात परवानगीसाठी प्रस्ताव तयार करून भारतीय पुरातत्त्व विभागाला सादर करण्यात येत असल्याबाबत व यासंबंधाने वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा करून सदर प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याची विनंती करण्यात आली असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

कोट

रामाळा तलावाचा प्रश्न घेऊन इकोप्रोने हाक दिली आणि सर्वसामान्य जनतेनी साथ दिली. हा लढा केवळ इको-प्रोचा नव्हता, तर तो जनतेचा होता. १२व्या दिवशी प्रशासनाने मागण्या मान्य केल्याने अन्नत्याग सत्याग्रह मागे घेत आहे. आता तलाव संवर्धनासाठी खऱ्या अर्थाने सत्याग्रह सुरू होणार आहे, त्याला चंद्रपूरकर नागरिकांची अशीच साथ हवी आहे.

- बंडू धोतरे, अध्यक्ष, इको प्रो