शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

संकटावर मात करीत शेतकरी मशागतीत व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 12:15 AM

सध्या शेतीच्या कामात शेतकरी व्यस्त असून खरीप हंगामासाठी शेती सज्ज करीत आहेत. ही सर्व कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली जात असून बैलांचा वापर मागे पडला आहे.

ठळक मुद्देबैलबंडीऐवजी शेतकरी करीत आहेत ट्रॅक्टरचा वापर : दुष्काळ, चाराटंचाईच्या छायेत जिल्ह्यातील शेतकरी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सध्या शेतीच्या कामात शेतकरी व्यस्त असून खरीप हंगामासाठी शेती सज्ज करीत आहेत. ही सर्व कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली जात असून बैलांचा वापर मागे पडला आहे.सततची नापिकी, सातत्याने राहत असलेले ढगाळ वातावरण, सरपणाची व्यवस्था, नागरणी, आदी कामे उरकविण्याच्या बेतात शेतकरी आहे. गुढीपाडव्यापासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात करणाऱ्या बळीराजापुढे आर्थिक संकट उभे असले तरी शेतीची मशागत पुन्हा त्याच जोशाने सुरु केली असली तरी पुढील हंगामाच्या नियोजनाची काहीशी चिंता शेतकऱ्यांना आहे.जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही शेतकºयांजवळ बैलजोडी नाही. त्यामुळे ट्रॅक्टरच्या सहाय्याने कपाशीची वाळलेली रोपटे काढण्याचे काम सुरू असून शेताची नागरणी ट्रॅक्टरद्वारे केली जात आहे. यंत्रामुळे रोटावेटर, कल्टीवेटर आदी कामे करून तापत्या उन्हामुळे जमिनीची पोत कायम रहात असल्याचा समज आहे. शेतातील तण वेचणीची कामे सकाळच्या प्रहारात उरकविण्याचा सपाटा सुरू आहे. मुग नक्षत्राला अजून दोन महिन्यांचा कालावधी असल्याने कामे उरकवून लग्नकार्यात सहभागी होण्यासाठी उसंत मिळणार आहे. सिंचनाची सोय असलेल्या शेतात काही शेतकºयांनी पालेभाज्या, लावल्या असून वाढलेल्या पालेभाज्या रखरखत्या उन्हामुळे अडचणीत सापडला आहे.बैलांच्या किंमती वाढल्याबैलांच्या किंमती महागल्याने बैलांची खरेदी कमी झाली आहे. शेती असणारे शेती करीत नाही, त्यामुळे शेतकामासाठी बैलजोडी किरायाने घ्यावी लागते. यासाठी मोसम पाहून जास्तीचे पैसेही वेळ प्रसंगी देऊन ही कामे उरकली जात आहे.पेरणीचे नियोजनयेणाºया खरीप हंगामाला सामोरे जात असताना पारंपरिक पिकांनी सतत तीन वर्षांपासून पाठ फिरविल्याने व योग्य भाव मिळत नसल्याने कोणते पीक घ्यावे या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. अनेकजण वेगळी पिके घेताना दिसत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती