शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

बाळू धानोरकर : घोंघावणारे वादळ एकाएकी शांत झाले

By राजेश भोजेकर | Published: May 30, 2023 11:52 AM

धानोरकर यांचा शिवसैनिक ते खासदार हा अवघा २० वर्षांचा प्रवास थक्क करणारा होता.

राजेश भोजेकर

चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील आणि काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू   धानोरकर यांच्या निधनाची धक्कादायक वार्ता सकाळी धडकताच अख्खा चंद्रपूर जिल्हाच नव्हे ते महाराष्ट्र निशब्द झाला. अवघ्या ४८ वर्ष वयाच्या काळात घोंगावणारे वादळ एकाएकी शांत झाले, यावर विश्वासच बसत नव्हता. बाळू धानोरकर नावाच्या वादळाने चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणाचा नवा अध्याय लिहिला. सतत १५ वर्ष भाजपच्या ताब्यात असलेला गड काँग्रेसला परत मिळवून दिला. शिवसैनिक ते खासदार हा अवघा २० वर्षांचा प्रवास थक्क करणारा होता. अशातच त्यांनी एकाएकी जगाचा निरोप घेऊन मोठा धक्का दिला.

शिवबंधन हाताला बांधल्यापासून बाळू धानोरकर हे नाव सतत चर्चेत होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी ते एकनिष्ठ होते. काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून आल्यानंतरही त्यांच्या मनात बाळासाहेबांचे विशेष स्थान होते. बाळू धानोरकर यांच्या रूपाने एक नवे नेतृत्व चंद्रपूर जिल्हावासीयांना खुणावत होते. २००९ मध्ये त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघातून पहिली निवडणूक लढली. परंतु नेहमीप्रमाणे झालेल्या बंडखोरीमुळे त्यांनाही निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला. मात्र ते मनाने जिंकले होते. २०१४ मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा याच मतदार संघातून विधान सभेची निवडणूक लढली आणि ते जिंकले. त्यांच्या रूपाने येथून पहिल्यांदाच शिवसेनेचा प्रतिनिधी विधानसभेत पोहचला. विशेष म्हणजे या काळात देशात मोदी लाट आली होती. शिवसेना आणि भाजपची युती तुटलेली होती. अशा विपरीत परिस्थितीत हा विजय मोठा होता. यानंतर बाळू धानोरकर यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.

अवघ्या ३९ व्या वर्षी आमदार झालेले बाळू धानोरकर २०१९ मध्ये  खासदार होईल. याची साधी कल्पनाही कोणी केलेली नव्हती. मात्र बाळू धानोरकर यांनी हे करून दाखवले. आमदार असताना त्यांनी चंद्रपूर मतदार संघातून २०१९ ची लोकसभा निवडणूक लढली. ही निवडणूक लढणे म्हणजे मोठे धाडस होते. ते त्यांनी केले आणि यशस्वी झाले. त्यांनी इतिहास रचला. भाजप काँग्रेसमुक्त भारतसाठी झटत असताना बाळू धानोरकर यांनी भाजपच्या तावडीतून काँग्रेसचा बालेकिल्ला परत मिळवून दिला. हा साधासुधा विजय नव्हता, तर बाळू धानोरकर नावाच्या मावळ्याने काँग्रेसमुक्त महाराष्ट्र होण्यापासून काँग्रेसला वाचविले. ते लोकसभेत काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून पोहोचले होते. लोकसभेत त्यांनी मतदार संघातील समस्यांसह देशातील अनेक बाबींवर कटाक्षाने प्रकाश टाकला. त्यांनी अल्पावधीतच दिल्लीतही आपली मजबूत पकड निर्माण केली होती.

काँग्रेसच्या तिकिटावर ते निवडून आले असले तरी त्यांचा सर्वच पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी जवळचा परिचय झाला होता. असे असले तरी ते विरोधकांना नेहमी आव्हान देत असत. त्यांनी मध्यंतरी वाराणसी लोकसभा मतदार संघातून निवडून लढण्याची घोषणा करून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आव्हान दिले होते. खासदार झाल्यापासून ते देशपातळीवर चर्चेत असायचे. मात्र मागील काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसमधील नेत्यांमधील समन्वय तुटल्यागत स्थिती निर्माण झाली होती. यामुळे ते अस्वस्थ वाटायचे.

म्हणतात ना आयुष्य क्षणभंगुर आहे. केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. आणि तसेच झाले. २७ मे ०२३ रोजी म्हणजेच तीन दिवसांपूर्वी बाळू धानोरकर यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर त्याचदिवशी अचानक त्यांचीही  प्रकृती खालावली. त्यांनालगेच नागपूर आणि नंतर दिल्लीला उपचारासाठी हलविले. कोणालाही काहीच कळायला मार्ग नव्हता. एकाएकी काय झाले? सर्वांच्या चेहरे प्रश्नांकित झाले होते. प्रकृती चिंताजनक आहे हे कळताच प्रत्येकजण परमेश्वराकडे त्यांच्या दिर्घआयुष्यासाकडे घालत होते. मात्र वेळ हातून निघून गेली होती. खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती चांगली नव्हती.

ते सतत जनसेवेत असायचे. यामध्ये ते स्वतःचे आरोग्य जपण्यात कमी पडले. मंगळवारी सकाळी चंद्रपूरचे खासदार बाळूभाऊ धानोरकर गेले, ही नकोशी वार्ता धडकली आणि सारेच निशब्द झाले. खासदार बाळू धानोरकर यांचे अकाली निधन चटका लावून गेले. वादळ एकाएकी शांत कसे झाले. यावर कुणाचाच विश्वास बसत नाही आहे. पण हे कटसत्य आहे. हे पचविण्याची वेळ चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेवर नियनीने लादली आहे. 

टॅग्स :Suresh Dhanorkarसुरेश धानोरकरchandrapur-acचंद्रपूरcongressकाँग्रेस