शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेसोबतच कचऱ्याचीही विल्हेवाट लावावी

By admin | Updated: December 20, 2014 22:36 IST

ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेमध्ये झाल्यानंतर गडचांदूर नगरपरिषदेची प्रथमच निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे निवडून येणाऱ्या नगरसेवकांकडून गडचांदूर शहरवासीयांच्या अपेक्षाही उंचावणे सहाजिक आहेत.

आशिष देरकर - गडचांदूरग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेमध्ये झाल्यानंतर गडचांदूर नगरपरिषदेची प्रथमच निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे निवडून येणाऱ्या नगरसेवकांकडून गडचांदूर शहरवासीयांच्या अपेक्षाही उंचावणे सहाजिक आहेत. उमेदवारांना निवडून येण्याचे तर लोकांना विकासकामांचे डोहाळे लागले आहेत. नगरपालिकेने स्वच्छतेसोबतच कचऱ्याची विल्हेवाट लावावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.वाढत्या लोकसंख्येनुसार गडचांदुरात अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. गडचांदुरात नगरपरिषदेचे सफाई कामगार स्वच्छता अभियान जरी राबवित असले तरी नियोजनाअभावी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात नगरपालिकेला मोठे अपयश येत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर तर होतच आहे, सोबतच पाळीव प्राणी, जनावरे मोठ्या प्रमाणात त्याचे सेवन करीत आहे. त्यामुळे जनावराचेही आरोग्य धोक्यात आले आहे.गडचांदूर-कोरपना, गडचांदूर-लखमापूर व गडचांदूर-राजुरा या मुख्य रस्त्यांच्या कडेला शहरालगत मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे टाकण्यात येतात. ‘आतून स्वच्छ, बाहेर गलिच्छ’ असे दर्शन बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना नक्कीच होते. नगर परिषदेने उचललेला कचरा रोज पहाटे ट्रॅक्टरच्या माध्यमातून मुख्य रस्त्यांवर टाकण्यात येतो. गडचांदूर हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे येथे मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकसंख्येबरोबरच कचऱ्याच्या प्रमाणातही फार वाढ होत आहे. घनकचरा प्रकल्पाच्या माध्यमातून कचऱ्याची विल्हेवाट लावल्यास ‘स्वच्छ गडचांदूर, सुंदर गडचांदूर’ हे स्वप्न नक्कीच साकार होईल. मात्र त्यासाठी नगरसेवकांच्या इच्छाशक्तीची गरज राहणार आहे.सडलेला भाजीपाला व केरकचरा रोज रस्त्यावर टाकण्यात येतात. यावर नगर परिषदेने कसलेही निर्बंध आणलेले नाही. तसेच झोपडपट्टी भागातील कचरा नियमित उचलल्या जात नसल्याची ओरड आहे. झोपडपट्याही नगरपरिषदेचा भाग असल्यामुळे तेथील स्वच्छतेकडे लक्ष पुरविण्याची मागणी गडचांदुरातील झोपडपट्टीवासीयांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)