महाराष्ट्रात तेलंगणातून येणारे सर्व मार्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 05:00 IST2020-04-13T05:00:00+5:302020-04-13T05:00:43+5:30

जिवती तालुक्यापासून ७० कि.मी.अंतरावर तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यात आणि त्या अंतर्गत येणाऱ्या हसणापूर, जैनुर व इतर गावात कोरोनाचे पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहे. रूग्णांच्या संपर्कात आलेल्या क्वारंटाईनच्या संख्येत मोठया प्रमाणात वाढ होत असल्याने तेलंगणातून येणारे संपूर्ण मार्ग बंद करण्यात आले आहे.

All routes from Telangana to Maharashtra are closed | महाराष्ट्रात तेलंगणातून येणारे सर्व मार्ग बंद

महाराष्ट्रात तेलंगणातून येणारे सर्व मार्ग बंद

ठळक मुद्देतेलंगणात अनेक रुग्ण पाझिटिव्ह : सीमेवरून कोरोना विषाणूची घुसखोरी होऊ नये म्हणून खबरदारी

लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती : तालुक्यालगत असलेल्या आदिलाबाद जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. तेलंगणा-महाराष्ट्र सीमा जिवती तालुक्याच्या हाकेच्या अंतरावर आहे. आणि या वादग्रस्त १४ गावात दोन्ही राज्याची विकास यंत्रणा काम करीत असून येथील नागरिकांना तेलंगणा राज्यातून विविध योजनेचा लाभ मिळत असल्याने सर्वाधिक लोक तेलंगणात ये-जा करीत असतात. त्यामुळे तेलंगणा राज्यात झालेली कोरोनाची बाधा सीमेवरील गावात होऊ नये. यासाठी जिवतीचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी तेलंगणातून येणारे सर्व मार्ग बंद केले आहे.
त्यानुसार जिवतीचे ठाणेदार विश्वास पुल्लरवार यांनी सीमेवरील लेंडीगुडा, पळसगुडा, इंदिरानगर, कुंभेझरी, येसापूर गावात बाहेरील व्यक्ती गावात प्रवेश करणार नाही व गावातील कुणीही बाहेर जाणार नाही, याची खबरदारी घेण्याचे सांगत सर्व मार्ग बंद करून नागरिकांचे समुपदेशन केले जात आहे. जिवती तालुक्यापासून ७० कि.मी.अंतरावर तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यात आणि त्या अंतर्गत येणाऱ्या हसणापूर, जैनुर व इतर गावात कोरोनाचे पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहे. रूग्णांच्या संपर्कात आलेल्या क्वारंटाईनच्या संख्येत मोठया प्रमाणात वाढ होत असल्याने तेलंगणातून येणारे संपूर्ण मार्ग बंद करण्यात आले आहे. यासाठी जिवतीचे ठाणेदार विश्वास पुल्लरवार, पोलीस मित्र गजानन राठोड, तालुका कृषी अधिकारी दमाळे, मंडळ कृषी अधिकारी टी.जी.आडे, कृषी सहाय्यक माधव राठोड, नामदेव राठोड यांनी गावा-गावात जाऊन नागरिकांना सतर्क राहत स्वत:ची व परिवाराची काळजी घेण्यास सांगतले. यावेळी कुभेझरी येथील सरपंच अंबादास जाधव, उपसरपंच लहू गोतावळे, सामाजिक कार्यकर्ते जमालूदिन शेख, कैलास महामुने व गावातील तरूणांनी सहकार्य केले.

कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना
कोरोनाबाधित तेलंगणा राज्यातील गावात नागरिकांचा संपर्क होऊ नये. यासाठी सर्व मार्ग बंद केले. गावातील दारू, खर्रा, सिगारेट आदी बंद करावेत, कामाव्यतिरिक्त कुणीही बाहेर जाणार नाही, तोंडाला माक्स बांधावे व बाहेरून आल्यावर हात साबनाने स्वच्छ धुवावे, कुठेही गर्दी करू नये.
हे तेलंगणातून येणारे मार्ग झाले बंद
लेंडीगुडा,पळसगुडा, येसापूर, इंदिरानगर, नारायणगुडा, कुंभेझरी, परमडोली, शंकरलोधी, शेडवाही(बा.), येल्लापूर, भेंडवीसह इतर मार्गही बंद करण्यात आले आहे.

Web Title: All routes from Telangana to Maharashtra are closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.