जिल्ह्यातील सर्व प्रकल्प हाऊसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 12:33 AM2019-09-02T00:33:28+5:302019-09-02T00:35:49+5:30

यावर्षी जिल्ह्यात नव्हे तर विदर्भातच पावसाचे आगमन उशिरा झाले. पाऊस येणार का नाही, याची शेतकºयांना व सर्वसामान्य नागरिकांना चिंता लागून होती. मात्र जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने आपला कोटा पूर्ण केला. मागील वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अभिशाप ठरला. मोठ्या उत्साहाने पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी गतवर्षी खरीपासाठी उभा झाला. मात्र वरूणराजाने त्याचे कंबरडेच मोडले. परिणामी शेतकऱ्यांना पिके वाचविताना मोठी कसरत करावी लागली होती. कशीबशी शेतकऱ्यांनी आपली पिके वाचविली.

All the projects in the district are house full | जिल्ह्यातील सर्व प्रकल्प हाऊसफुल्ल

जिल्ह्यातील सर्व प्रकल्प हाऊसफुल्ल

Next
ठळक मुद्दे४७ मामा तलावही ओव्हरफ्लो : सिंचनासाठी शेतकऱ्यांना मोठा आधार

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ऑगस्ट महिन्यात पडलेल्या संततधार पावसामुळे जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील अकरापैकी अकराही सिंचन प्रकल्प शंभर टक्के भरले आहे. तर नदी, नाले, शेतकऱ्यांचे सुरक्षित सिंचन म्हणजे तलावदेखील तुडूंब भरले आहेत. जिल्ह्यातील ५१ पैकी ४७ मामा तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. ३७ लघू प्रकल्पापैकी ३१ प्रकल्पही शंभर टक्के भरले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना पुढे सिंचनासाठी मोठी मदत होणार आहे.
यावर्षी जिल्ह्यात नव्हे तर विदर्भातच पावसाचे आगमन उशिरा झाले. पाऊस येणार का नाही, याची शेतकºयांना व सर्वसामान्य नागरिकांना चिंता लागून होती. मात्र जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने आपला कोटा पूर्ण केला. मागील वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अभिशाप ठरला. मोठ्या उत्साहाने पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी गतवर्षी खरीपासाठी उभा झाला. मात्र वरूणराजाने त्याचे कंबरडेच मोडले. परिणामी शेतकऱ्यांना पिके वाचविताना मोठी कसरत करावी लागली होती. कशीबशी शेतकऱ्यांनी आपली पिके वाचविली. मात्र उत्पादनावर मोठा परिणाम झाला. पाहिजे तसे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आले नाही.त्यामुळे शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत लोटला गेला. लावलेला पैसाही निघाला नाही. त्यामुळे डोक्यावरील कर्ज तो फेडू शकला नाही. रबी हंगामानेही शेतकऱ्यांना पाहिजे तसा फायदा करवून दिला नाही. तरीही यंदा शेतकरी पुन्हा खरिपाच्या तयारीला लागला. मात्र समुद्रात उठलेल्या चक्रीवादळामुळे मान्सून योग्य वेळी आला नाही. शेतकऱ्यांनी पेरणी थांबविली. गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे मामा तलावातही पाणी नव्हते. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होता.
अशातच जुलैच्या अखेरच्या तीन दिवसांपासून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संततधार पाऊस पडला. त्यानंतर ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवाड्यातही चांगला पाऊस पडला. या पावसामुळे वर्धा, पैनगंगा, उमा, शिरणा, इरई यासारख्या नद्या व मोठे नाले तुडुंब भरले आहेत. दमदार पावसामुळे जिल्ह्यातील चंदई, चारगाव, लभानसराड, डोंगरगाव, इरई, आसोलामेंढा, घोडाझरी, नलेश्वर, अमलनाला, पकडीगुड्डम, लालनाला या अकराही सिंचन प्रकल्पात सद्यस्थितीत शंभर टक्के जलसाठा आहे.

इतर प्रकल्पातही शंभर टक्के जलसाठा
चंद्रपूर जिल्ह्यात ३७ लघू प्रकल्प आहेत. यातील ३१ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. याशिवाय ४७ मामा तलावही शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो होत आहे. म्हणजेच जिल्ह्यात ९८ प्रकल्पापैकी ८८ प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत.

Web Title: All the projects in the district are house full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती