शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

चाऱ्याअभावी जनावरांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 10:42 PM

तालुक्यात यावर्षी अल्प पाऊस पडला. याचा मोठा फटका जनतेसह मुक्या जनावरांनाही बसू लागला आहे. चारा आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याने पहाडावर असणाऱ्या गावांतील शेकडो जनावरे वनवन भटंकती करत आहेत.

ठळक मुद्देशेतकरी चिंताग्रस्त : जनावरांसाठी चारा छावण्यांची गरज

संघरक्षित तावाडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : तालुक्यात यावर्षी अल्प पाऊस पडला. याचा मोठा फटका जनतेसह मुक्या जनावरांनाही बसू लागला आहे. चारा आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याने पहाडावर असणाऱ्या गावांतील शेकडो जनावरे वनवन भटंकती करत आहेत.सध्या तालुक्यात मुक्या जनावरांसाठी चारा व पाण्याची आवश्यकता आहे. गाय, बैल, म्हैस, शेळ्या, बकऱ्यांना चारा मिळत नसल्याने भटकावे लागत आहे. चरायला जंगल किंवा गावाबाहेर गेल्यानंतर पाणी मिळत नाही, एवढी भयावह स्थिती मुक्या जनावरांवर आली आहे. पहाडावर जंगलाचे प्रमाण आधीच कमी आहे. त्यातच यंदा दुष्काळ पडला. उन्हामुळे झाडेझुडपे वाळली. दिवसभर जंगलात फिरून जनावरे उपाशीपोटी घरी परत येत आहेत. त्यामुळे शेतकरी हबलत झाले. माणूस कुठेही जाऊन पोट भरू शकतो पण जनावरांचे काय, हा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. प्रशासनाने या परिसराची पाहणी करून वास्तस्थिती जाणून घ्यावी आणि तातडीने चारा छावण्या उभारण्याची मागणी शेतकरी करत आहेत.बेभाव विक्रीजिवती तालुका हा पहाडावर आहे. नेहमीच दुष्काळाच्या झळा बसतात. यावर्षी पिके वाया गेली. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला. उन्हाळ्याला आता सुरुवात झाली. जनावरांची उपासमारी टाळण्यासाठी बेभाव किमतीत विकण्याची तयारी शेतकरी करत असल्याचे दिसून येत आहे.भूकबळीचा धोकाचारा आणि पाण्याचा प्रश्न असाच राहिला तर जनांवराचा भूकबळी जाऊ शकतो, अशी परिस्थिती पहाडावर निर्माण झाली आहे. आपल्या मुलांची उपासमारी होऊ नये, यासाठी आई-वडिल चिंतेत असतात. अन्नाची जुळवाजुळव करतात. मुकी जनावरेही आमची लेकरे आहेत. पण पाणी व चारा मिळत नसल्याने जनावरांना जगवायचे कसे, या प्रश्नाने शेतकरी हैराण झाले आहेत.