शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

अबब,चंद्रपुरात निघते पाच टन निर्माल्य

By admin | Updated: September 2, 2014 23:38 IST

गणेशोत्सव भक्तीभावाने साजरा होत असला तरी निर्माल्याच्या माध्यमातून प्रदूषणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. धार्मिक भावना जुळल्या असल्याने प्रशासन यात हात घालत नाही. पर्यावरण प्रेमींनी जनजागृती करून

साईनाथ कुचनकार ल्ल चंद्रपूरगणेशोत्सव भक्तीभावाने साजरा होत असला तरी निर्माल्याच्या माध्यमातून प्रदूषणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. धार्मिक भावना जुळल्या असल्याने प्रशासन यात हात घालत नाही. पर्यावरण प्रेमींनी जनजागृती करून निर्माल्य कुंडीत टाकण्याची विनंती करीत आहे. ही विनंतीही अनेकजण धुडकावत आहे. यातून नदी-तलाव प्रदूषित होत आहे. भविष्यासाठी धोकादायक ठरू पहात असलेले निर्माल्य भाविकांनी नदी-तलावात न टाकता कलश, ड्रममध्ये टाकल्यास भविष्यातील धोका टाळता येऊ शकतो.एकट्या चंद्रपूर शहराचा विचार केल्यास पाच हजारावर घरगुती तसेच २५० सार्वजनिक गणेश मंडळ आहे. या माध्यमातून गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. धार्मिक भावना जुळल्या असल्याने अनेक भाविक नदीचे पात्र, तलावात निर्माल्य टाकतात. प्रत्येकांकडून अर्धा, एक किलो निर्माल्य पात्रात टाकण्यात येते. सदर निर्माल्य एकत्र केल्यास पाच टनच्या वर जमा होते. हा विचार साधारण: कुणीच करत नाही. मात्र ही वास्तविकता ‘लोकमत’ने केलेल्या एका सर्व्हेक्षणातून समोर आली आहे. यातून मोठ्या प्रमाणात नदी-तलाव प्रदूषित होत आहे.विशेष म्हणजे, घरगुतीच नाही तर सार्वजनिक गणेश मंडळही निर्माल्याच्या माध्यमातून प्रदूषण करीत आहे. प्रदूषणामध्ये चंद्रपूर शहराचा प्रथम क्रमांक आहे. यामुळे नागरिकांना अनेक आजारांना समोर जावे लागत आहे. अनेकांना आपला जीवही गमवावा लागत आहे. तरीही प्रदूषण टाळण्यासाठी आपण पाहिजे तसे प्रयत्न अद्यापही करीत नाही. सोबतच दिवसेंदिवस छोट्या मोठ्या सण, उत्सवाच्या माध्यमातून प्रदूषणात भरच टाकत आहो. चंद्रपूर शहरात ५ टन निर्माल्य जमा होत आहे. तर जिल्ह्यात किती होत असेल, हा विचारही न केलेला बरा.यावर्षी मनपा प्रशासनाने निर्माल्य प्रदूषण टाळण्यासाठी पाऊल उचलले आहे. इरईच्या पात्रामध्ये निर्माल्य टाकण्यासाठी दोन मोठमोठे खड्डे तयार करण्यात आले आहे. तर गणेश विसर्जनासाठी येथे विशेष सोय करण्यात आली आहे. मनपाने यावर्षी झोननुसार प्लॉस्टिकचे ड्रम खरेदी केले आहे. तसेच रामाळा तसेच इरईच्या पात्राजवळ ठेवण्यात येणार आहे. सोबतच आझाद बागेमध्येही विसर्जनाच्या दिवशी निर्माल्य टाकण्यासाठी ड्रम ठेवण्यात येणार आहे. मंडळांनी या ड्रममध्ये निर्माल्य टाकल्यास प्रदूषनाचा थोडा का होईना प्रश्न आपल्याला टाळता येणार आहे.