शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

१८४ मुख्याध्यापकांची पदे होणार रद्द

By admin | Updated: May 25, 2016 01:27 IST

राज्य शासनाच्या संच मान्यतेचे सुधारित निकष मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक व शिक्षकांच्या जिवावर उठले आहे.

संच मान्यतेचा फटका : ६६१ शिक्षक ठरले अतिरिक्त चंद्रपूर : राज्य शासनाच्या संच मान्यतेचे सुधारित निकष मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक व शिक्षकांच्या जिवावर उठले आहे. तुकडी व्यवस्था बंद केल्याने जिल्ह्यातील खासगी, अनुदानित, विनाअनुदानित शाळेतील तब्बल ६६१ शिक्षक अतिरीक्त ठरले आहेत. यात १८४ मुख्याध्यापकांचा समावेश असून ही पदे आता रद्द करण्यात येणार आहेत. २ जुलै २०१३ च्या शासन निर्णयानुसार इयत्ता पहिली ते चवथीच्या शाळांना ५ वा वर्ग तर इयत्ता सातवीला आठवा वर्ग जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. पूर्वी असलेली तुकडी व्यवस्था बंद करून विद्यार्थी पटसंख्येच्या निकषावर शिक्षकांची पदे ठरविण्यात आली. परिणामी जिल्ह्यातील अनेक शाळांमधील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व शिक्षकांची पदे अतिरीक्त ठरली आहेत. प्राथमिक शाळा पहिली ते पाचवीमध्ये विद्यार्थी संख्या १५० पेक्षा अधिक असल्यास मुख्याध्यापकाचे पद मान्य करण्यात आले आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थी संख्या १३५ पेक्षा कमी, उच्च प्राथमिक शाळेत ९० पेक्षा कमी, माध्यमिक शाळेत ९० पेक्षा कमी पटसंख्या असल्यास मुख्याध्यापकाचे पद अनुज्ञेय राहणार नसल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे. या निर्णयामुळे जवळपास ५० च्या वर शाळा मुख्याध्यापकाविना चालवाव्या लागणार आहेत. १८४ शाळांतील मुख्याध्यापक हे अतिरिक्त ठरले असून शासन निर्णयापूर्वीच्या निकषाप्रमाणे मान्य झालेल्या मुख्याध्यापकाचे पद अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना त्या-त्या अन्य शाळांमध्ये समायोजित करावे किंवा त्यांना शिक्षकांच्या पदांमध्ये रिक्त जागेवर समायोजित करावे, असे म्हटले आहे.उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अथवा ज्या संयुक्त शाळांमध्ये १५ पेक्षा अधिक शिक्षकांची पदे अनुज्ञेय असतील, तेथे एक पर्यवेक्षकाचे पद देण्यात येत आहे. शिक्षकांची संख्या ३० पेक्षा अधिक झाल्यास एक अतिरिक्त उपमुख्याध्यापक पद अनुज्ञेय आहे. मात्र विद्यार्थी संख्येचा निकष ठरविण्यात आल्याने जवळपास ६६१ शिक्षकांची पदे अतिरिक्त ठरली असून यात अनुदानित, विनाअनुदानित व खासगी शाळेतील शिक्षकांचा समावेश आहे. (स्थानिक प्रतिनिधी)मंजूर पदांपेक्षा अतिरिक्त मुख्याध्यापकजिल्ह्यात मुख्याध्यापकांची २२५ पदे मंजूर आहेत. मात्र जिल्ह्यात ४०९ मुख्याध्यापक कार्यरत होते. राज्य शासनाच्या संच मान्यता निकषानुसार अटी लावण्यात आल्याने मुख्याध्यापकांची १८४ पदे अतिरिक्त ठरले आहेत. ६९९ पदवीधर शिक्षकांची गरजजिल्ह्यात सध्या १ हजार ३११ पदविधर शिक्षकांची पदे मंजूर आहे. यापैकी केवळ ६१० शिक्षक कार्यरत आहे. ६९९ पदविधर शिक्षकांची नियुक्ती आणखी आवश्यक आहे. संच मान्यतेच्या सुधारित निकषानुसार ही पदे भरणे शिक्षण विभागाला अनिवार्य झाले आहे. शासनाच्या संच मान्यतेनुसार जिल्ह्यात १८४ मुख्याध्यापक व ४७७ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. या अतिरिक्त ठरलेल्या मुख्याध्यापक व शिक्षकांचे जागा रिक्त असलेल्या ठिकाणी समायोजन करण्यात येणार आहे.- संजय डोर्लीकर, शिक्षणाधिकारी,चंद्रपूर