शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
3
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
4
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
5
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
6
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
7
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
8
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
9
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
11
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
12
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
13
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
14
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
15
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
16
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
17
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
18
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
19
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
20
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

१८४ मुख्याध्यापकांची पदे होणार रद्द

By admin | Updated: May 25, 2016 01:27 IST

राज्य शासनाच्या संच मान्यतेचे सुधारित निकष मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक व शिक्षकांच्या जिवावर उठले आहे.

संच मान्यतेचा फटका : ६६१ शिक्षक ठरले अतिरिक्त चंद्रपूर : राज्य शासनाच्या संच मान्यतेचे सुधारित निकष मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक व शिक्षकांच्या जिवावर उठले आहे. तुकडी व्यवस्था बंद केल्याने जिल्ह्यातील खासगी, अनुदानित, विनाअनुदानित शाळेतील तब्बल ६६१ शिक्षक अतिरीक्त ठरले आहेत. यात १८४ मुख्याध्यापकांचा समावेश असून ही पदे आता रद्द करण्यात येणार आहेत. २ जुलै २०१३ च्या शासन निर्णयानुसार इयत्ता पहिली ते चवथीच्या शाळांना ५ वा वर्ग तर इयत्ता सातवीला आठवा वर्ग जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. पूर्वी असलेली तुकडी व्यवस्था बंद करून विद्यार्थी पटसंख्येच्या निकषावर शिक्षकांची पदे ठरविण्यात आली. परिणामी जिल्ह्यातील अनेक शाळांमधील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व शिक्षकांची पदे अतिरीक्त ठरली आहेत. प्राथमिक शाळा पहिली ते पाचवीमध्ये विद्यार्थी संख्या १५० पेक्षा अधिक असल्यास मुख्याध्यापकाचे पद मान्य करण्यात आले आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थी संख्या १३५ पेक्षा कमी, उच्च प्राथमिक शाळेत ९० पेक्षा कमी, माध्यमिक शाळेत ९० पेक्षा कमी पटसंख्या असल्यास मुख्याध्यापकाचे पद अनुज्ञेय राहणार नसल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे. या निर्णयामुळे जवळपास ५० च्या वर शाळा मुख्याध्यापकाविना चालवाव्या लागणार आहेत. १८४ शाळांतील मुख्याध्यापक हे अतिरिक्त ठरले असून शासन निर्णयापूर्वीच्या निकषाप्रमाणे मान्य झालेल्या मुख्याध्यापकाचे पद अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना त्या-त्या अन्य शाळांमध्ये समायोजित करावे किंवा त्यांना शिक्षकांच्या पदांमध्ये रिक्त जागेवर समायोजित करावे, असे म्हटले आहे.उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अथवा ज्या संयुक्त शाळांमध्ये १५ पेक्षा अधिक शिक्षकांची पदे अनुज्ञेय असतील, तेथे एक पर्यवेक्षकाचे पद देण्यात येत आहे. शिक्षकांची संख्या ३० पेक्षा अधिक झाल्यास एक अतिरिक्त उपमुख्याध्यापक पद अनुज्ञेय आहे. मात्र विद्यार्थी संख्येचा निकष ठरविण्यात आल्याने जवळपास ६६१ शिक्षकांची पदे अतिरिक्त ठरली असून यात अनुदानित, विनाअनुदानित व खासगी शाळेतील शिक्षकांचा समावेश आहे. (स्थानिक प्रतिनिधी)मंजूर पदांपेक्षा अतिरिक्त मुख्याध्यापकजिल्ह्यात मुख्याध्यापकांची २२५ पदे मंजूर आहेत. मात्र जिल्ह्यात ४०९ मुख्याध्यापक कार्यरत होते. राज्य शासनाच्या संच मान्यता निकषानुसार अटी लावण्यात आल्याने मुख्याध्यापकांची १८४ पदे अतिरिक्त ठरले आहेत. ६९९ पदवीधर शिक्षकांची गरजजिल्ह्यात सध्या १ हजार ३११ पदविधर शिक्षकांची पदे मंजूर आहे. यापैकी केवळ ६१० शिक्षक कार्यरत आहे. ६९९ पदविधर शिक्षकांची नियुक्ती आणखी आवश्यक आहे. संच मान्यतेच्या सुधारित निकषानुसार ही पदे भरणे शिक्षण विभागाला अनिवार्य झाले आहे. शासनाच्या संच मान्यतेनुसार जिल्ह्यात १८४ मुख्याध्यापक व ४७७ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. या अतिरिक्त ठरलेल्या मुख्याध्यापक व शिक्षकांचे जागा रिक्त असलेल्या ठिकाणी समायोजन करण्यात येणार आहे.- संजय डोर्लीकर, शिक्षणाधिकारी,चंद्रपूर