तालुक्याच्या ग्रामीण भागात दिवाबत्तीत १०० व्हॅटचे बल्ब
By Admin | Updated: December 17, 2015 01:11 IST2015-12-17T01:11:15+5:302015-12-17T01:11:15+5:30
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजेची बचत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी सीएलएफ व एलईडी बल्ब उपयोगात ...

तालुक्याच्या ग्रामीण भागात दिवाबत्तीत १०० व्हॅटचे बल्ब
वीज बचतीला खो : ग्रामपंचायत तिजोरीत निधीच नाही
सिंदेवाही : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजेची बचत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी सीएलएफ व एलईडी बल्ब उपयोगात आणणारी संकल्पना मांडली असताना ग्रामपंचायतीच्या तिजोरीत निधीच नसल्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागात चक्क सार्वजनिक दिवाबतीत १०० व्हॅटचे बल्ब लावण्यात आले असल्यामुळे ‘मेकइन’ संकल्पनेला गालबोट लागले आहे.
शासनाची वर्षपूर्ती झाली असतानाही शासन स्तरावर ग्रामपंचायतींना अनुदान राशी उपलब्ध करण्यात आली नाही. यामुळे निधीअभावी ग्रामपंचायतीच्या तिजोरीत ठणठणाट आहे. शासनाने तेरा वित्त आयोग गुंडाळला असून चौदावा वित्त आयोगाची पुर्नबांधणी केली आहे.
या आयोगा अंतर्गत थेट निधी ग्रामपंचायतींना वळता करण्यात येणार असल्याचा उदोउदो करण्यात येत आहे. सामान्य फंडात खेळणारा निधी नाही. यामुळे चहा- पाणी बंद झाले आहे. गावागावात विकासाचा अनुशेष २५ टक्के शिल्लक आहे. नाले सरळीकरण, पांदण रस्ते, इमारती पूर्ण झाल्या, सिमेंट रस्ते बांधकामासाठी गावात जागा शिल्लक नाही. सभामंडपाचे बांधकाम वॉर्डावॉर्डात होत आहेत. मात्र उपयोग अल्प आहे. गावात सार्वजनिक दिवाबतीची सोय करण्यात आली आहे. रात्री संपूर्ण गावात प्रकाश दिसून येत आहे. विजेचे देयक जि.प. मार्फत देण्यात येते. यामुळे ग्रामपंचायतींना टेंशन नाही. गावकऱ्यांना प्रकाश देण्यासाठी ग्रामपंचायतीची धडपड सुरू झाली आहे. तिजोरीत निधी नसतानाही सरपंच तथा पदाधिकाऱ्यांनी बल्ब खरेदीचे प्रयत्न सुरू केले आहेत. स्वखर्चातून तथा उसनवारीवर बल्ब खरेदी करतो.
१०० व्हॅटचे बल्ब २० रुपयात प्राप्त होत असल्याने त्या बल्बची खरेदी केली जात आहे. कमी व्हॅटचे महागडे बल्ब खरेदी करण्याची स्थिती ग्रामपंचायतीची नाही. सरासरी एक हजाराचे देयक करण्याची स्थिती नसल्याचे दिसून आले आहे. अॅल्प व्हॅटचे बल्ब २०० रुपयात तथा पुढील दरात प्राप्त होत आहेत. गावात अंदाजे ५० हुन अधिक बल्ब लावण्यात येत आहे. परंतु निधी नसल्याने महागडे बल्ब खरेदी करताना डोळे वटारण्याची पाळी सरपंच व सचिवावर आली आहे. यामुळे ग्रामीण भागातील अनेक गावात आजही १०० व्हॅटचे बल्ब नाईलाजास्तव लावले जात आहे. यामुळे अतिरिक्त ८० व्हॅट अधिक वीज खर्च केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)