शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

प्रशिक्षणादरम्यान दुखापतीमुळे बाहेर होतायेत अग्निवीर, लष्कर नियमात बदल करू शकते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 14:59 IST

Agniveer Bharti 2023: प्रशिक्षणादरम्यान झालेल्या दुखापतींमुळे लष्कर तरुणांना बाहेर काढत आहे. 

गेल्या वर्षी केंद्र सरकारने अग्निवीर अंतर्गत तरुणांची सैन्यात भरती करण्यासाठी अग्निपथ योजना सुरू केली होती. यावर्षीही या योजनेंतर्गत तरुणांची सैन्यात भरती करण्यात येत आहे. लष्कराच्या तिन्ही शाखांमध्ये अग्निवीरची भरती होणार आहे. दुसरीकडे, अग्निपथ योजनेंतर्गत सैन्यात अग्निवीरसाठी निवड झालेले तरुण प्रशिक्षणादरम्यानच बाहेर पडत आहेत. दरम्यान, प्रशिक्षणादरम्यान झालेल्या दुखापतींमुळे लष्कर तरुणांना बाहेर काढत आहे. 

अग्निवीर भरतीमध्ये असा नियम आहे की, 6 महिन्यांच्या प्रशिक्षणादरम्यान कोणताही उमेदवार सलग 30 दिवस रजेवर राहिला तर त्याला बाहेर काढले जाईल, म्हणजे त्याला भरती केले जाणार नाही.  NBT च्या रिपोर्टनुसार, बिहारचा रहिवासी रितेश कुमार तीन वर्षांच्या मेहनतीनंतर सैन्यात अग्निवीरसाठी निवडला गेला. आर्टिलरी सेंटरमध्येही प्रशिक्षण सुरू झाले, पण दोन्ही पाय फ्रॅक्चर झाल्याने त्याला वैद्यकीय रजेवर पाठवण्यात आले.रजेवरून परत आल्यानंतर रितेशने आणखी 7 आठवडे प्रशिक्षण घेतले, पण काही दिवसांपूर्वी त्याला रिलीव्हिंग लेटर देण्यात आले. 

हिमाचल प्रदेशातील रहिवासी मोहन सिंग याच्याबाबतही असेच घडले, प्रशिक्षणादरम्यान खांद्याला दुखापत झाल्यामुळे त्यांना वैद्यकीय रजेवर पाठवण्यात आले आणि कसम परेडच्या दोन दिवस आधी मोहन सिंगला सैन्यातून बाहेर काढण्यात आले. आर्टिलरी सेंटरमध्ये प्रशिक्षणादरम्यान असे प्रकार घडल्याने 15 हून अधिक तरुण बाहेर पडले आहेत.रिपोर्ट्सनुसार, लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, प्रत्येक प्रशिक्षण केंद्रातून अशी प्रकरणे समोर येत आहेत. तसेच, मीडिया रिपोर्ट्सनुसार, लष्कर नियम बदलण्याचा विचार करत आहे. 

एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणाचा विचार केला जात आहे, मात्र लगेच काही होऊ शकत नाही. सैन्याच्या नियमित भरतीमध्ये प्रशिक्षणादरम्यान कोणी जखमी झाल्यास त्याला पुन्हा एक बॅच मागे करणे, असा नियम होता. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना नियुक्ती देण्यात येत होती. नियमित भरतीमध्ये 9 ते 11 महिन्यांचे प्रशिक्षण असायचे, परंतु अग्निवीर भरतीमध्ये असा नियम नाही. त्यामुळे प्रशिक्षणादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे तरुण बाहेर केले जात आहे.

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाIndian Armyभारतीय जवानjobनोकरी