शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

लेखकाने आपल्या शब्दांवर विश्वास ठेवावा - विश्वास पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 19:03 IST

Vishwas Patil: विश्वास पाटील यांनी दिला नवोदित लेखकांना सल्ला.

- विवेक चांदूरकरलोकमत न्यूज नेटवर्क   खामगाव : लेखक व साहित्यिकांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर डोळा न ठेवता आपल्या शब्दांवर विश्वास ठेवून लिखाण करावे, असा सल्ला ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी नवोदित लेखकांना दिला. बुलडाणा येथे राज्यस्तरीय नेताजी जागर साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील होते. यावेळी त्यांनी लोकमतशी संवाद साधला. 

प्रश्न : आपण छत्रपती संभाजी महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर लिखाण केले. हेच नायक तुम्ही का निवडले? उत्तर : मी आतापर्यंत पाणीपत, झाडाझडती, पांगीरा, गाभूळ यासह आखणी पुस्तकांचे लिखाण केले आहे. यामध्ये प्रेमकथा आहेत तसेच सामाजिक आशयसुद्धा आहे. त्यामुळे उपेक्षित नायकांवरच लिखाण केले, असे नाही.

प्रश्न : नोकरी सांभाळीत ऐवढे दर्जेदार साहित्य निर्मिती करताना काही अडचणी आल्या काय?उत्तर : अनेक अडचणी आल्यात. मी केवळ साडेपाच तास झोपतो. पहाटे वेळ मिळतो, त्यावेळी लिहितो. शनिवारी व रविवारी संपूर्ण वेळ लिखाण करतो.

प्रश्न : आगामी पुस्तक कोणते येणार आहे?उत्तर : गाभूळलेल्या चंद्रबनात हे पुस्तक येत आहे.  

प्रश्न : अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आपण होऊ शकआ नाहीत, याची खंत वाटते काय?

उत्तर : मला पुणे येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्याबाबत विचारणा करण्यात आली होती. मीच नकार दिला. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले तर एक वर्ष त्यात गुंतून राहावे लागते. वर्षभर सत्कार व अन्य कार्यक्रम चालतात. त्याऐवजी मी नवीन लिखाण करण्याला प्राधान्य दिले.  

प्रश्न : सोशल मीडियावर अनेक नवोदित कवी व लेखक निर्माण होतात व लगेच संपून जातात? उत्तर : नवोदित व सोशल मीडियावर लिखाण करणाऱ्यांना घाई फार असते. ते लिखाण करतील व जेव्हा त्यांनाच कंटाळा येईल, तेव्हा ते बंद करतील.

प्रश्न : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूबद्दल बरेच गूढ समाजात आहे. याबद्दल काय सांगाल?

उत्तर : आतापर्यंत संपूर्ण देशात ५२ साधू व संन्याशांनी तेच सुभाषचंद्र बोस असल्याचे सांगत सांगितले. नेताजींचा मृत्यू  कसा झाला हे विसरा व त्यांचे विचार आत्मसात करायला हवे. मी याचा शोध घेण्याकरिता जपानमध्ये गेलो होतो. त्यावेळी नेताजींसोबत विमानात असलेल्यांच्या नातेवाईकांनाही मी भेटलो आहे.

 प्रश्न : पाणीपत कादंबरी कशी साकारली, याबाबत काय सांगाल?उत्तर : मी पाणीपतला गेलो होतो. त्यावेळी तेथे कुणीही जात नव्हते.  उसाच्या शेतात त्या जागेचा शोध घेतला. तेथे केवळ एक चौथरा होता. ती कादंबरी आल्यानंतर पाणीपतला लाखो लोक जायला लागले. त्या जागेला आता मोठे वैभव प्राप्त झाले आहे. एका साहित्यिकासाठी ही सन्मानाची बाब आहे. यापेक्षा जास्त काय हवे. 

प्रश्न : नवोदित लेखकांना काय संदेश द्याल? उत्तर : यशाची घाई न करता तपश्चर्या, आराधना करायला हवी. मेहनत घेतली, श्रम केले तर काहीच अवघड नाही. ज्ञानसम्राज्ञी लता मंगेशकर, आशा भोसले अजूनही रियाज करतात. मी वयाच्या २८व्या वर्षी पाणीपत लिहिली होती. त्यापूर्वीही मी अडीच हजार पाने लिहिली होती. लेखकांनी इतरांच्या आयुष्यात डोकावून बघायला हवे. त्यांच्या अनुभवातून शिकायला हवे. केवळ साहित्य संमेलनावर डोळा न ठेवता आपल्या शब्दांवर विश्वास ठेवायला हवा.  

टॅग्स :Vishwash Patilविश्वास पाटील interviewमुलाखतkhamgaonखामगाव