शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

लेखकाने आपल्या शब्दांवर विश्वास ठेवावा - विश्वास पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 19:03 IST

Vishwas Patil: विश्वास पाटील यांनी दिला नवोदित लेखकांना सल्ला.

- विवेक चांदूरकरलोकमत न्यूज नेटवर्क   खामगाव : लेखक व साहित्यिकांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर डोळा न ठेवता आपल्या शब्दांवर विश्वास ठेवून लिखाण करावे, असा सल्ला ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी नवोदित लेखकांना दिला. बुलडाणा येथे राज्यस्तरीय नेताजी जागर साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील होते. यावेळी त्यांनी लोकमतशी संवाद साधला. 

प्रश्न : आपण छत्रपती संभाजी महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर लिखाण केले. हेच नायक तुम्ही का निवडले? उत्तर : मी आतापर्यंत पाणीपत, झाडाझडती, पांगीरा, गाभूळ यासह आखणी पुस्तकांचे लिखाण केले आहे. यामध्ये प्रेमकथा आहेत तसेच सामाजिक आशयसुद्धा आहे. त्यामुळे उपेक्षित नायकांवरच लिखाण केले, असे नाही.

प्रश्न : नोकरी सांभाळीत ऐवढे दर्जेदार साहित्य निर्मिती करताना काही अडचणी आल्या काय?उत्तर : अनेक अडचणी आल्यात. मी केवळ साडेपाच तास झोपतो. पहाटे वेळ मिळतो, त्यावेळी लिहितो. शनिवारी व रविवारी संपूर्ण वेळ लिखाण करतो.

प्रश्न : आगामी पुस्तक कोणते येणार आहे?उत्तर : गाभूळलेल्या चंद्रबनात हे पुस्तक येत आहे.  

प्रश्न : अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आपण होऊ शकआ नाहीत, याची खंत वाटते काय?

उत्तर : मला पुणे येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्याबाबत विचारणा करण्यात आली होती. मीच नकार दिला. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले तर एक वर्ष त्यात गुंतून राहावे लागते. वर्षभर सत्कार व अन्य कार्यक्रम चालतात. त्याऐवजी मी नवीन लिखाण करण्याला प्राधान्य दिले.  

प्रश्न : सोशल मीडियावर अनेक नवोदित कवी व लेखक निर्माण होतात व लगेच संपून जातात? उत्तर : नवोदित व सोशल मीडियावर लिखाण करणाऱ्यांना घाई फार असते. ते लिखाण करतील व जेव्हा त्यांनाच कंटाळा येईल, तेव्हा ते बंद करतील.

प्रश्न : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूबद्दल बरेच गूढ समाजात आहे. याबद्दल काय सांगाल?

उत्तर : आतापर्यंत संपूर्ण देशात ५२ साधू व संन्याशांनी तेच सुभाषचंद्र बोस असल्याचे सांगत सांगितले. नेताजींचा मृत्यू  कसा झाला हे विसरा व त्यांचे विचार आत्मसात करायला हवे. मी याचा शोध घेण्याकरिता जपानमध्ये गेलो होतो. त्यावेळी नेताजींसोबत विमानात असलेल्यांच्या नातेवाईकांनाही मी भेटलो आहे.

 प्रश्न : पाणीपत कादंबरी कशी साकारली, याबाबत काय सांगाल?उत्तर : मी पाणीपतला गेलो होतो. त्यावेळी तेथे कुणीही जात नव्हते.  उसाच्या शेतात त्या जागेचा शोध घेतला. तेथे केवळ एक चौथरा होता. ती कादंबरी आल्यानंतर पाणीपतला लाखो लोक जायला लागले. त्या जागेला आता मोठे वैभव प्राप्त झाले आहे. एका साहित्यिकासाठी ही सन्मानाची बाब आहे. यापेक्षा जास्त काय हवे. 

प्रश्न : नवोदित लेखकांना काय संदेश द्याल? उत्तर : यशाची घाई न करता तपश्चर्या, आराधना करायला हवी. मेहनत घेतली, श्रम केले तर काहीच अवघड नाही. ज्ञानसम्राज्ञी लता मंगेशकर, आशा भोसले अजूनही रियाज करतात. मी वयाच्या २८व्या वर्षी पाणीपत लिहिली होती. त्यापूर्वीही मी अडीच हजार पाने लिहिली होती. लेखकांनी इतरांच्या आयुष्यात डोकावून बघायला हवे. त्यांच्या अनुभवातून शिकायला हवे. केवळ साहित्य संमेलनावर डोळा न ठेवता आपल्या शब्दांवर विश्वास ठेवायला हवा.  

टॅग्स :Vishwash Patilविश्वास पाटील interviewमुलाखतkhamgaonखामगाव