शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पाणी आरक्षणात कपातीचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 17:12 IST

बुलडाणा : परतीच्या पावसामुळे वार्षिक सरासरी जिल्ह्याने गाठली असली तरी ९१ प्रकल्पांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत अवघा ३५ टक्के जलसाठा आहे. परिणामी यावर्षी कृषी व बिगर सिंचन पाणी आरक्षणात प्रसंगी मोठ्या प्रमाणावर कपातीचे संकेत आहे.

ठळक मुद्देप्रकल्पांमध्ये ३५ टक्केच जलसाठा आरक्षण समितीच्या बैठकीची प्रतीक्षा

बुलडाणा : परतीच्या पावसामुळे वार्षिक सरासरी जिल्ह्याने गाठली असली तरी ९१ प्रकल्पांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत अवघा ३५ टक्के जलसाठा आहे. परिणामी यावर्षी कृषी व बिगर सिंचन पाणी आरक्षणात प्रसंगी मोठ्या प्रमाणावर कपातीचे संकेत आहे. त्यातच खामगाव औद्योगिक वसाहत आणि शेगाव संस्थाने यावर्षी जादा पाण्याची मागणी केली आहे.त्यातच १५ आॅक्टोबरला प्रकल्पांमध्ये असलेल्या जलसाठ्याच्या आधारावर आगामी काळासाठी पिण्याचे तथा कृषी क्षेत्रासाठीचे पाणी आरक्षीत केले जात असले तरी अद्याप पाणी आरक्षण समितीच्या बैठकीचा मुहूर्त निघालेला नाही. ३१ आॅक्टोबर अखेर ही बैठक घेणे क्रमप्राप्त आहे. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तथा जिल्हाधिकाºयांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होते. याबाबत अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयस्तरावर बैठक घेण्याबाबत सुचना प्राप्त न झाल्यामुळे ती कधी होणार याकडे लक्ष लागून आहे.वर्तमानस्थितीमध्ये जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये १८६.२४ दलघमी जलसाठा असून सरासरी तो अवघा ३४.९१ टक्के आहे. सुमारे २५ लाख लोकसंख्या असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात ११ पालिका आणि दोन नगरपंचायतींमधील सुमारे साडेपाच लाख नागरिकांसाठी १०.५७ दलघमी तर ग्रामीण भागातील जवळपास दीडशे गावांसाठी २१ दलघमी पाण्याची अवश्यकता आहे. याव्यतिरिक्त खामगाव आणि चिखली येथील औद्योगिक वसाहतीसाठी ०.६४ दलघमी पाणी आरक्षीत करण्याची गरज आहे. गतवर्षी शहरी, ग्रामीण आणि नागरी तथा औद्योगिक वसाहतीसाठी ३४.०८ दलघमी पाणीसाठा आरक्षीत करण्यात आला होता. मात्र यावर्षी प्रकल्पातील जलसाठा अवघा ३४ टक्के आहे. त्यामुळे कृषी तथा औद्योगिक वसाहतीसाठीच्या पाणी आरक्षणात प्रसंगी कपात होण्याचे संकेत. आहे. परंतु प्रत्यक्षात ही बैठक कधी होते यावर पुढचे गणीत अवलंबून आहे.--प्रकल्पातील जलसाठा--मोठे प्रकल्प           पाणीसाठा        टक्केवारीनळगंगा                 २८.७३        ४१.४५पेनटाकळी               २६.१८        ४३.६६खडकपूर्णा                 १८.२९         १९.५८मध्यम प्रकल्प (७)    ५७.०४         ४१.९१लघूप्रकल्प (८१)          ५६         ३२.०४एकुण प्रकल्प (९१)     १८६.२४         ३४.९१(पाणीसाठा हा दलघमीमध्ये आहे.)

--गतवर्षी होता ७३ टक्के जलसाठा--जिल्ह्यात गतवर्षी ९१ प्रकल्पामध्ये ३९१.२३ दलघमी अर्थात ७३.३३ टक्के जलसाठा १५ आॅक्टोबरच्या तारखेत उपलब्ध होता. त्या तुलनेत पाणी आरक्षणासाठी गृहीत धरण्यात येणार्या १५ आॅक्टोबरच्या तारखेत हा जलसाठा ३४.९१ टक्केच आहे. त्यामुळे यावर्षी पाणी आरक्षण समितीच्या बैठकीत कृषी व औद्योगिक क्षेत्राताच्या पाणी आरक्षणात कपात होण्याचे संकेत आहेत.

--ग्रामंपंचायतींचे दुर्लक्ष--परतीच्या पावासाने जिल्ह्याला सरासरी गाठून दिली असली तरी नेमक्या ज्या प्रकल्पावर ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत. त्याच प्रकल्पांमध्ये अल्पसाठा आहे. एकड्या खडकपूर्णा प्रकल्पावर ४४ गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. तर दुसरीकडे ग्रामपंचायती पाणी आरक्षणाच्या मागणीबाबत उदासीन आहे. त्यामुळे सिंचन शाखेला आगामी काळासाठी पाणी आरक्षणाची आकडेमोड करताना अडचणी येत आहे. त्यामुळे ग्रामंपचायतींनीही त्यांची मागणी सिंचन विभागाकडे त्वरेने नोंदविण्याची गरज आहे.

--शेगाव संस्थांनाला हवे जादा पाणी--दरवर्षी साधारणपणे शेगाव संस्थानला वर्षाकाठी दोन दलघमी पाण्याची गरज पडते. मात्र संस्थांचा वाढता व्याप पाहता यावर्षी शेगाव संस्थाने अतिरिक्त चार दलघमी पाण्याची मागणी केली आहे. मन प्रकल्पावरून चार दलघमी पाणी संस्थाना यावर्षी हवे आहे.

--गतवर्षीेचे पाणी आरक्षण--शहरी:- १०.५७ दलघमी (११ पालिका)ग्रामीण :- २०.८७ दलघमी (१५० गावे)एमआयडीसी :- ०.६४ दलघमी (खामगाव, चिखली)

टॅग्स :Waterपाणी