शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात पाणीटंचाई! ७७ गावात ८० टँकर, अवघा ५ टक्के पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 19:02 IST

जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात पाणी प्रश्न पेटला आहे. प्रकल्पातील जलसाठा हा अद्यापही तळाला असून सध्या प्रकल्पात अवघा 5.28 टक्के जलसाठा आहे.

बुलडाणा - पावसाळ्याचा दीड महिना उलटत आला असला तरी पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पाणी प्रश्न पेटला आहे. प्रकल्पातील जलसाठा हा अद्यापही तळाला असून सध्या प्रकल्पात अवघा 5.28 टक्के जलसाठा आहे. येत्या काळात दमदार पाऊस पडून प्रकल्प न भरल्यास ऑगस्ट नंतर शहरी भागातील साडेपाच लाख आणि ग्रामीण भागातील सुमारे १७ लाख नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनू शकतो.

जिल्ह्यातील ७७ गावांची तहान सध्या ८० टँकरद्वारे भागवावी लागत आहे. जिल्ह्यात अद्याप जोरदार पाऊस झाला नसल्याने पावसाळ्यातही ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यात असलेलेल्या मोठे, मध्यम व लघू अशा एकूण ९१ प्रकल्पांचा संकल्पीत साठा हा ५३३.५६ दलघमी आहे. परंतु, यावर्षी पावसाळा सुरू झाल्यापासून एकही दमदार पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पात केवळ २८.१९ दलघमी जलसाठा आहे. जिल्ह्यातील नळगंगा (मोताळा), पेनटाकळी (मेहकर) व खडकपूर्णा (देऊळगाव राजा) या तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये ८.४९ दलघमी म्हणजे ३.८१ टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यात सात मध्यम प्रकल्प असून त्यामध्ये पलढग (मोताळा), ज्ञानगंगा, मस (खामगाव), कोराडी (मेहकर), मन, तोरणा (खामगाव), उतावळी (मेहकर) यांचा समावेश आहे. या मध्यम प्रकल्पांमध्ये १४.१० दलघमी म्हणजे १०.३६ टक्के जलसाठा आहे. तर एकूण लघु प्रकल्प ८१ असून यामध्ये ५.६० दलघमी म्हणजे ३.२० टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यातील ७७ गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या आहे. त्यामुळे या ७७ गावांमध्ये ८० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. काही ठिकाणी गावालगतच्या विहिरीत पाइपद्वारे टँकरमधील पाणी सोडण्यात येते. त्यानंतर गावातील महिला व ग्रामस्थांना त्या विहिरीतून पाणी काढून पाणी भरावे लागते. सध्या शेतातील कामे सुरू आहेत. मात्र, कामाच्या वेळेतही अनेक वेळेस गावातील नागरिकांना टँकरची वाट पहावी लागत असल्याचे चित्र आहे आहे.

* साडेचारशे गावे विहीर अधिग्रहणावरजिल्ह्यात जोरदार पाऊस अद्याप झाला नसल्याने पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत आहे. जिल्ह्यात ८० टँकर तर सुरू आहेतच. याशिवाय पाणीटंचाई निवारणार्थ विहीर अधिग्रहणही करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात ४४२ गावांमध्ये ५२१ विहीर अधिग्रहण करण्यात आलेले आहे.

* गतवर्षीपेक्षा परिस्थिती गंभीरगतवर्षी जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झाली होती. मात्र, पावसाळ्याच्या दिवसात पाणीटंचाई दिसून आली नाही. गतवर्षी पेक्षा यावर्षीच्या  पाणीटंचाईची परिस्थिती जरा गंभीर आहे. २०१७ मध्ये या दिवसात केवळ २९ गावात ३० टँकर सुरू होते आणि ४०३ गावांमध्ये ४९२ विहीर अधिग्रहण करण्यात आल्या होत्या. मात्र, यंदा ८० टँकर व ५२१ विहीर अधिग्रहण आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईWaterपाणीbuldhanaबुलडाणा