शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

बुलडाणा जिल्ह्यात पाणीटंचाईची चाहूल;  विहीर अधिग्रहणास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 11:38 AM

Water scarcity in Buldana district नांदुरा व शेगाव तालुक्यातील पाच गावांत विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवण्यास प्रारंभ झाला असून, नांदुरा व शेगाव तालुक्यातील पाच गावांत विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या वर्षीचा जिल्ह्याचा पाणीटंचाईचा कृती आराखडा हा १६ कोटी ३ लाख ३२ हजार रुपयांचा आहे. दरम्यान, यंदा जिल्ह्यातील ६८७ गावांत पाणीटंचाई जाणवण्याची भीती आहे. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनाने ९५६ उपाययोजनांची तरतूद जिल्हा प्रशासनाने केली आहे. यामध्ये विंधन विहिरी, कूपनलिका घेण्यासाठी १ कोटी २६ लाख ५० हजार रुपयांची आराखड्यात तरतूद करण्यात आली असून २३० उपाययोजना त्यातून करण्यात येणार आहेत. ६१ नळ योजनांच्या दुरुस्तीसाठी ३ कोटी ५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तात्पुरत्या पूरक नळ योजनांसाठी दोन कोटी १० लाख रुपये खर्च अपेक्षित असून, २१ गावांतील योजनांची दुरुस्ती करावी लागणार आहे.याव्यतिरिक्त ५३८ गावांत पाणीटंचाई निवारणासाठी ५५९ विहिरी अधिग्रहित कराव्या लागणार आहेत. त्यासाठी २ कोटी ७५ लाख ८२ हजार रुपयांचा खर्च करावा लागणार आहे.

दोन तालुक्यांत आतापासूनच टंचाईखारपाण पट्ट्यातील दोन तालुक्यांत पाणीटंचाईच्या झळा बसण्यास प्रारंभ झाला असून, नांदुरा तालुक्यात त्यामुळे नारखेड, हिंगणा भोटा, भोरवंड आणि शेगाव तालुक्यात चिंचखेड आणि जानोरी येथे त्यामुळे विहिरी अधिग्रहित कराव्या लागल्या आहेत.

८२ गावांत टँकरची गरजयावर्षी ६८७ गावांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असून, ८२ गावांना ८४ टँकरने पाणीपुरवठा करावा लागू शकतो. त्यादृष्टीने ६ कोटी ८४ लाख रुपयांचे पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात नियोजन करण्यात आले आहे. तूर्तास जिल्ह्यात एकही पाण्याचे टँकर सुरू नसल्याचे टंचाई निवारण विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान, २०१८-२०१९ या वर्षी जिल्ह्यात तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई होती. त्या तुलनेत यंदा टंचाईचे प्रमाण कमी असल्याचे जाणवत आहे, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाwater scarcityपाणी टंचाई