शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

मतदानावर बहिष्काराचा इशारा

By admin | Updated: September 18, 2014 00:45 IST

सिंदखेडराजा तालुक्यातील शेतक-यांची गारपीटग्रस्तासाठी मदतीची मागणी.

सिंदखेडराजा : फेब्रुवारी व मार्च २0१४ मध्ये सिंदखेडराजा तालुक्यामध्ये झालेल्या गारपीटग्रस्त पावसामुळे शेतकर्‍यांच्या तोंडाशी आलेला घास मातीत मिसळला. गहू, शाळू, कांदा, द्राक्ष, मोसंबी, फळबागाचे करोडो रुपयांचे नुकसान झाले. शासनाने मदतही जाहीर केली. परंतु सात महिने उलटले तरीही सहा हजार शेतकरी मदतीपासून वंचीत आहेत. त्यांना त्वरीत मदत द्यावी, अन्यथा विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे रमेश पागोरे, बद्रीनाथ बुधवत, रन्नु, चौधरी, जे.के.खरात, सुरेश खरात यांचेसह भाराकाँचे शिवदास रिंढे, बद्री वाघ, राजेंद्र कांगणे, दामु बंगाळे यांचेसह असंख्य शेतकर्‍यांनी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी डॉ.घोडके व तहसिलदार कणसे यांना दिला. जर पंधरा दिवसाचे आत शेतकर्‍यांना मदत न मिळाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. ५ हजार ८७४ शेतकरी मदतीपासून वंचीतगारपीट व अतवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतीचा तलाठी व कृषी पर्यवेक्षकांच्या माध्यमातून सर्वे करण्यात आला होता. त्यामध्ये ८१ गावातील ३१८२४ शेतकर्‍यांना २१ कोटी ५२ लाख ३९ हजार ५00 रुपयांची मदत शासनाने पाठविली. आलेली मदत गावातील शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी तलाठय़ामार्फत प्रत्येक शेतकर्‍यांचे बँक खाते नंबर जमा करण्याचे आदेश तहसिलदारांनी तलाठय़ांना दिले होते. आजपर्यंत २६ हजार ९५0 शेतकर्‍यांना १९ कोटी रुपयांचे वाटप बँकेच्या माध्यमातुन करण्यात आले. तरीही ५८७४ शेतकरी मदतीपासून वंचीत आहेत. यातील असंख्य शेतकर्‍यांनी बँक खात्याचे नंबर तलाठी व संबंधीत यंत्रणेकडे ३ ते ४ वेळेस येऊन सुद्धा पाच हजार शेतकरी गेल्या सहा महिन्यापासून तहसिलमध्ये दररोज येरझारा मारतात.