शहरं
Join us  
Trending Stories
1
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
2
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
3
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
4
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
6
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
7
'वैभव'शाही वर्ष! १४ वर्षांच्या पोरानं MS धोनी-विराटला मागे टाकत सेट केला आपला ट्रेंड
8
"इम्रान खान 'वेडा', त्याची विधाने देशाविरोधी अन् चिथावणीखोर"; पाकिस्तान आर्मीचा मोठा दावा
9
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
10
IND vs SA वनडेआधी मोठी दुर्घटना टळली, फॅन्सच्या गर्दीमुळे होती चेंगराचेंगरीची भीती (VIDEO)
11
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
12
Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...
13
“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?
14
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
15
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
16
उर्मिला मातोंडकरसोबत जास्त सिनेमे, दोघांचं होतं अफेअर? राम गोपाल वर्मांनी सोडलं मौन; म्हणाले...
17
VIDEO: कुछ तुफानी हो जाए ! टायरच्या ढिगावर उभा राहिला तरुण, फुल स्पीडमध्ये आली कार अन्...
18
मीडिया, कला आणि खेळाचा त्रिवेणी संगम: 'जय हिंद'च्या ‘कॉन्स्टीलेशन २५-२६’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
19
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पीएम मोदींसोबतच्या बैठकीत पुतिन यांचे मोठे विधान, म्हणाले...
20
'या' ८ म्युच्युअल फंड्सनी दिले नेगेटिव्ह रिटर्न; 'या' क्षेत्रातील फंडांचा समावेश, कशी ओळखायची जोखीम?
Daily Top 2Weekly Top 5

गावांच्या सामूहिक प्रयत्नानेच गाव समृद्ध होईल - अविनाश पोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:22 IST

धामणगाव बढे: गावकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नातूनच गावाची वाटचाल समृद्धीकडे होईल, असे प्रतिपादन पाणी फाउंडेशनचे मुख्य सल्लागार डॉ. अविनाश पोळ यांनी ...

धामणगाव बढे: गावकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नातूनच गावाची वाटचाल समृद्धीकडे होईल, असे प्रतिपादन पाणी फाउंडेशनचे मुख्य सल्लागार डॉ. अविनाश पोळ यांनी केले. मोताळा तालुक्यातील सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेतील सहभागी गाव दाभा येथे भेट दिली असता ते बोलत होते़ यावेळी त्यांनी दाभा गावाची समृद्ध गाव स्पर्धेतील वाटचाल व गावांनी केलेली कामाची पाहणी केली.

दाभा गावातील नरेगा अंतर्गत शोषखड्डे, निर्मिती वृक्षलागवड, धरणातील गाळ काढणे, वैयक्तिक शेतकऱ्यांनी केलेली फळबागांची त्यांनी पाहणी केली. यामध्ये समृद्ध गाव स्पर्धेची सहा स्तंभं, स्पर्धेची पुढील वाटचाल व गावाने पुढील कालावधीत करावयाच्या कामाच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. गाव समृद्ध करायचे असेल, तर गावातील एक-दोन लोकांनी प्रयत्न करून होणार नाही. समृद्धीकरिता गावाने सामूहिक प्रयत्न करणे नितांत गरजेचे आहे, गावाच्या समृद्धीबरोबरच गावाच्या आरोग्य, शिक्षण, रोजगार याबाबतसुद्धा एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. यावेळी पंचायत समिती मोताळाचे गटविकास अधिकारी मोहोड व नरेगा विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी डॉ. अविनाश पोळ यांनी दाभा गाव समृद्ध गाव स्पर्धेमध्ये सध्या करीत असलेल्या वाटचालीबद्दल समाधान व्यक्त केले. नरेगा योजना गावातील प्रत्येक व्यक्तीसाठी किती उपयुक्त आहे आणि त्यामधून आपण कोणती कामे करू शकतो, याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गावच्या सरपंच सरला रवींद्र हागे, सर्व ग्रा. पं. सदस्य आणि युवकवर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.

विविध कामांची पाहणी

दाभा गावातील तरुण मंडळी, युवक वर्ग चांगल्या प्रकारे काम करत असून अविनाश पोळ यांनी गावाच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले. ग्रामपंचायतीमार्फत रोजगार हमी योजनेतून गावामध्ये सांडपाणी निर्मूलनासाठी तयार केलेल्या शोषखड्ड्यांची पाहणी केली. गावातील प्रयोगशील शेतकरी बळीराम होनाळे यांनी आपल्या शेतामध्ये रोजगार हमी योजनेतून लिंबू लागवड व शेवगा लागवड केलेल्या पिकांची पाहणी केली. बळीराम होनाळे करीत असलेल्या नावीन्यपूर्ण शेतीबद्दल आशावाद व्यक्त केला.