शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

गावांच्या सामूहिक प्रयत्नानेच गाव समृद्ध होईल - अविनाश पोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:22 IST

धामणगाव बढे: गावकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नातूनच गावाची वाटचाल समृद्धीकडे होईल, असे प्रतिपादन पाणी फाउंडेशनचे मुख्य सल्लागार डॉ. अविनाश पोळ यांनी ...

धामणगाव बढे: गावकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नातूनच गावाची वाटचाल समृद्धीकडे होईल, असे प्रतिपादन पाणी फाउंडेशनचे मुख्य सल्लागार डॉ. अविनाश पोळ यांनी केले. मोताळा तालुक्यातील सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेतील सहभागी गाव दाभा येथे भेट दिली असता ते बोलत होते़ यावेळी त्यांनी दाभा गावाची समृद्ध गाव स्पर्धेतील वाटचाल व गावांनी केलेली कामाची पाहणी केली.

दाभा गावातील नरेगा अंतर्गत शोषखड्डे, निर्मिती वृक्षलागवड, धरणातील गाळ काढणे, वैयक्तिक शेतकऱ्यांनी केलेली फळबागांची त्यांनी पाहणी केली. यामध्ये समृद्ध गाव स्पर्धेची सहा स्तंभं, स्पर्धेची पुढील वाटचाल व गावाने पुढील कालावधीत करावयाच्या कामाच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. गाव समृद्ध करायचे असेल, तर गावातील एक-दोन लोकांनी प्रयत्न करून होणार नाही. समृद्धीकरिता गावाने सामूहिक प्रयत्न करणे नितांत गरजेचे आहे, गावाच्या समृद्धीबरोबरच गावाच्या आरोग्य, शिक्षण, रोजगार याबाबतसुद्धा एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. यावेळी पंचायत समिती मोताळाचे गटविकास अधिकारी मोहोड व नरेगा विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी डॉ. अविनाश पोळ यांनी दाभा गाव समृद्ध गाव स्पर्धेमध्ये सध्या करीत असलेल्या वाटचालीबद्दल समाधान व्यक्त केले. नरेगा योजना गावातील प्रत्येक व्यक्तीसाठी किती उपयुक्त आहे आणि त्यामधून आपण कोणती कामे करू शकतो, याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गावच्या सरपंच सरला रवींद्र हागे, सर्व ग्रा. पं. सदस्य आणि युवकवर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.

विविध कामांची पाहणी

दाभा गावातील तरुण मंडळी, युवक वर्ग चांगल्या प्रकारे काम करत असून अविनाश पोळ यांनी गावाच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले. ग्रामपंचायतीमार्फत रोजगार हमी योजनेतून गावामध्ये सांडपाणी निर्मूलनासाठी तयार केलेल्या शोषखड्ड्यांची पाहणी केली. गावातील प्रयोगशील शेतकरी बळीराम होनाळे यांनी आपल्या शेतामध्ये रोजगार हमी योजनेतून लिंबू लागवड व शेवगा लागवड केलेल्या पिकांची पाहणी केली. बळीराम होनाळे करीत असलेल्या नावीन्यपूर्ण शेतीबद्दल आशावाद व्यक्त केला.