शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 19:32 IST

जेवताना ताटात उष्टे अन्न ठेवल्याच्या शुल्लक कारणावरून मुलाने वडिलांसोबत वाद घातला आणि त्यानंतर थेट कुऱ्हाडीने हत्या केली. मृतदेहाचे तुकडे करून तो नदीत फेकून दिला. पण, ही घटना उघडकीस कशी आली?

Buldhana Crime News: संतापाच्या भरात माणसं काहीही करू लागली आहे. जवळच्याच माणसांच्या हत्या करण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातही अशीच हादरवून टाकणारे भयंकर हत्याकांड घडले आहे. रागाच्या भरात मुलाने वडिलांची हत्या केली. त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून पोत्यात भरले आणि ते पूर्णा नदीत फेकून दिले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

थरकाप उडवणारी ही घटना बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या संग्रामपूर तालुक्यामध्ये घडली आहे. तालुक्यात बोडखा नावाचे गाव आहे. येथीलच शिवाजी तेल्हारकर याने ताटात उष्टे अन्न ठेवले, या किरकोळ कारणावरून वडिलांची हत्या केली. 

हत्येची ही घटना १३ ऑगस्ट रोजी घडलेली असून, ती १९ ऑगस्ट रोजी उघडकीस आली.

मुलाने केली वडिलांची हत्या, सुनेमुळे समोर आले प्रकरण

या प्रकरणी मृतकाची सुन व आरोपीची पत्नी हिनेच पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मृताचे नाव रामराव तेल्हारकर (रा. बोडखा) असे असून, आरोपी मुलगा शिवाजी रामराव तेल्हारकर याने हे भयानक कृत्य केले. 

पोलिसांच्या माहितीनुसार, वडिलांनी "तू काम करत नाहीस, घराकडे लक्ष देत नाहीस" असे म्हणत मुलाला हटकले. 

त्याचवेळी मुलाने ताटात उष्टे अन्न का ठेवले म्हणून वाद घालायला सुरूवात केली. हा वाद इतका वाढला की मुलाला राग अनावर झाला. संतापलेल्या शिवाजीने कुऱ्हाडीने वडिलांच्या गळ्यावर व शरीरावर वार करून त्यांचा खून केला.

पोत्यात भरले तुकडे आणि नदीत फेकले

शिवाजी वडिलांची हत्या केल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे केले. सगळे तुकडे पोत्यात भरले. त्यानंतर हे पोते त्याने पूर्णा नदीमध्ये फेकून दिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbuldhana gramin police stationबुलढाणा ग्रामीण पोलिस ठाणेDeathमृत्यू