शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

कृषीमंत्री नसलेल्या राज्य सरकारला दुष्काळाचा गंध नाही- जयप्रकाश बाविस्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 18:20 IST

शेतकर्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांची पूर्तता केली जावी, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना २७ फेब्रुवारी नंतर अधिक तीव्रतेने राज्यात आंदोलन करेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा माजी आमदार तथा अ‍ॅड. जयप्रकाश बाविस्कर यांनी येथे दिला.

बुलडाणा: दुष्काळी परिस्थिती असतानाही गेल्या नऊ महिन्यापासून राज्याला पूर्ण वेळ कृषीमंत्री नाही, यावरून हे सरकार दुष्काळ व शेतकर्याप्रती किती गंभीर आहे, याची कल्पना यावी. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केवळ हे सरकारमधील मंत्रीसंत्री राजकारण करण्यात मशगूल आहेत. त्यामुळे राजकारण गेले चुलीत पण जगाचा पोशिंदा शेतकरी आधी जगला पाहिजे. त्यासाठीच दुष्काळ व्यवस्थापन संहीता ही मराठीमध्ये उपलब्ध करण्यात येऊन शेतकर्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांची पूर्तता केली जावी, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना २७ फेब्रुवारी नंतर अधिक तीव्रतेने राज्यात आंदोलन करेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा माजी आमदार तथा अ‍ॅड. जयप्रकाश बाविस्कर यांनी येथे दिला.मराठी राजभाषा दिनीतरी किमान शेतकर्यांना समजले अशा आपल्या मराठी भाषेमध्ये २०१६ ची राज्याची दुष्काळ व्यवस्थापन संहिता उपलब्ध केली जावी, अशी मागणी त्यांनी केली. गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या प्रश्नी राज्यात आंदोलन करत असून दर सोमवारी राज्यातील दुष्काळजाहीर झालेल्या १५१ तालुकाक्यात निवेदने देऊन याबाबत मागणी करण्यात आली आहे. पण महिना उलटूनही अद्याप त्यादृष्टीने राज्य शासनस्तरावर याबाबत कुठलीही हालचाल झाली नाही. तिसर्या सोमवारी निदर्शने निवेदने देऊन राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये आंदोलने केल्यानंतर चौथ्या सोमवारी यासाठी जिल्हास्तरावर व तालुकास्तराव माहिती अधिकार टाकून ही मागणी करण्यात आली आहे.दुष्काळाच्या अनुषंगाने मराठी राजभाषा दिनापर्यंत ही दुष्काळ व्यवस्थापन संहिता मराठीमध्ये उपलब्ध न केल्यास तथा दुष्काळी भागात गुरांसाठी चारा छावण्या उभारण्यासोबतच, चारा उत्पादनासाठी प्रयत्न, वृद्धनिराधारांसाठी अशा तालुक्यात स्वयंपाकगृह, रोहयो, मनरेगाची मागे उपलब्ध करून न दिल्यास मनसे तीव्र आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे. शासन उपाययोजना करण्यात कमी पडत असले तर मनसेचे तालुका व जिल्हास्तरावर प्रत्येकी पाच प्रतिनिधी देऊन यासाठी शासना आम्ही सहकार्य करू. पण त्यादृष्टीने शासनाने प्रयत्न करणे अभिप्रेत असल्याचे ते म्हणाले. दुष्काळ जाहीर होऊन साडेतीन महिने होऊनही अद्याप  उपाययोजना हाती घेतल्या गेल्या नाहीत. त्या हाती घेण्यात याव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा त्यांनी इशारा दिला. तर तीव्र आंदोलननिवेदने, निदर्शने करून लोकशाही मार्गाने आम्ही राज्यात आंदोलन करत आहोत. खळखट्याक, कायदा हातात घेऊन विध्वंसक आंदोलन आम्ही आंदोलने करतो असा आमच्यावर आरोप होतो. मात्र महिन्यांतरही आम्ही दिलेल्या निवेदनांची दखल घेतल्या जात नसले तर आम्हाला तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा मनसे नेते तथा माजी आमदार अ‍ॅड. जयप्रकाश बाविस्कर यांनी दिला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMNSमनसे