शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
2
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
3
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
6
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
7
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
8
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
9
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
10
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
11
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
12
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
13
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
14
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
20
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
Daily Top 2Weekly Top 5

लिंगा येथे भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:31 IST

ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती; उपाय याेजना करण्याची मागणी साखरखेर्डा : सिंदखेड राजा तालुक्यातील लिंगा येथे गत काही दिवसांपासून भीषण पाणीटंचाई ...

ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती; उपाय याेजना करण्याची मागणी

साखरखेर्डा : सिंदखेड राजा तालुक्यातील लिंगा येथे गत काही दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावात नवीन नळयाेजना मंजूर करून ग्रामस्थांना दिलासा देण्याची मागणी हाेत आहे.

साखरखेर्डा येथून १० कि.मी. अंतरावर लिंगा हे गाव असून, लिंगा-पांग्रीकाटे गट ग्रामपंचायत आहे. गावाची लोकसंख्या जेमतेम ९५० च्या आसपास आहे. या गावाची तहान भागविण्यासाठी तत्कालीन आमदार तोताराम कायंदे यांनी कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना मंजूर करून या गावाची तहान भागविण्यासाठी प्रयत्न केले. राजेगाव धरणाच्या पायथ्याशी पुंजाजी तांगडे यांच्या शेतात विहीर घेण्यात आली. ही विहीर ते गावापर्यंत पाईपलाईन टाकण्यात आली. ही कामे करीत असताना पुंजाजी तांगडे यांचे दानपत्र अधिकाऱ्यांनी घेऊन त्यांना जमिनीचा योग्य मोबदला देणे गरजेचे होते. ही नळयोजना मंजूर करताना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अधिकाऱ्यांचे कर्तव्य होते. त्यावेळी अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे दानपत्र घेण्यात आले नाही. त्यावेळी पुंजाजी तांगडे यांना शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही. मदत मिळाली नाही तर किमान पाणी सोडण्यासाठी माझ्या मुलाला ग्रामपंचायतीमध्ये कामावर घ्या, अशी मागणी त्यांची होती. प्रत्येक वेळी नवीन आलेला सरपंच त्यांना कोरडे आश्वासन देऊन काम भागवत आला; परंतु त्यांच्या मुलाला २७ वर्षांत एकाही सरपंचाने पाणी देण्यासाठी कामावर ठेवले नाही, तर काहींनी कामावर ठेवले म्हणून मोटार पंप सुरू करण्यासाठी सांगितले. परंतु मजुरी मात्र मिळाली नाही. गरीब शेतकऱ्याची एकप्रकारे थट्टाच केली. गेल्या चार वर्षांपासून पुंजाजी तांगडे यांनी विहीर माझ्या मालकीची असल्याचे सांगून, पाणी पुरवठा बंद केला आहे. मधल्या काळात लिंगा पांग्रीकाटे ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून पाणी पुरवठा योजनेचे उपमुख्य अभियंता नागापुरे आले. त्यांनी लागलीच नवीन नळयोजना प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पाठविल्याचे समजते. आज मात्र पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकावे लागत आहे. ग्रामपंचायतीने तत्काळ विहीर अधिग्रहण करून पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी माजी उपसरपंच मधुकर भालेराव यांनी केली आहे.