शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

  ‘स्वाभीमानी’चे आत्मक्लेष आंदोलन; रविकांत तुपकर यांनी स्वत:ला घेतले जमीनीत गाडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 3:58 PM

नुकसान भरपाईचा प्रश्न मार्गी लागत नाही तो पर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

मोताळा: अतिपावसामुळे जिल्ह्यात पिकांच्या झालेल्या नुकसानापोटी शेतकºयांना त्वरित मोबदला द्यावा, या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्त्वात मोताळा तालुक्यातील परडा शिवारात शेतातच स्वत:ला मानेपर्यंत गाडून घेत आत्मक्लेष आंदोलन करण्यात येत आहे. जो पर्यंत शेतकºयांच्या नुकसान भरपाईचा प्रश्न मार्गी लागत नाही तो पर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.यंदा अतिपावसामुळे शेतकºयांचे मका, सोयाबीन, मुग, उडीद, कापसाच्या पिकाचे नुकसान झाले आहे. मात्र प्रत्यक्षात कोठे पंचनामे झाले नाही. नुकसानाचा अंतिम अहवालही अद्याप सादर करण्यात आलेला नाही. शेतकरी मेटाकुटीला आला आहे. मात्र त्यास कुठलीच मदत देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकºयांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत द्यावी, ही प्रमुख मागणी घेवून हे आंदोलन २३ सप्टेंबर रोजी रविकांत तुपकर यांनी मोताळा तालुक्यातील परडा शिवारात एका शेतात स्वत:ला गळ््यापर्यंत जमिनीत गाडून घेत हे समाधी आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या समवेत स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे सय्यद वसीम, शेख रफीक शेख करीम आणि दत्ता पाटील या त्यांच्या सहकाºयांनीही त्यांच्या समवेत गळ््या पर्यंत स्वत:ला जमिनीत गाडून घेत हे आंदोलन सुरू केले आहे.गेल्या दोन दिवसापूर्वी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे २२१ गावातील दहा हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र पंचनामे अद्यापही सुरू करण्यात आलेले नाही. शेत पिकांसह, जमीन खरडून गेल्याचेही प्रकार यात झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. गेल्या वर्षीही खरीप आणि रब्बी पिकांचेही अति पावसामुळे नुकसान झाले होते. त्यामुळे गतवर्षीेचे दोन्ही हंगाम हातचे गेले यंदाही खरीपाचा हंगाम हातचा गेल्यात जमा असल्याचे सांगत रविकांत तुपकर यांनी शेतकºयांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.

तहसिलदार आंदोलन स्थळी‘स्वाभीमानी’च्या या आक्रमक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तहसिलदार व्ही. एस. कुमरे आणि बोराखेडीचे ठाणेदार हे आंदोलनस्थळी पोहोचले असून स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्याशी त्यांची चर्चा सुरू आहे. मात्र जो पर्यंत शेतकºयांना त्वरित नुकसान भरपाई मिळत नाही, तोवर हे आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका तुपकर यांनी घेतली आहे. त्यामुळे आता आंदोलनाची तिव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आमच्या रक्ताचा नैवेद्य द्यायचा का- तुपकरशेतकरी नुकसानामुळे त्रस्त आहे. गतवर्षीही अशीच स्थिती होती. यंदाही तिच स्थिती आहे. त्यामुळे शेतकºयांना मदत मिळण्यासाठी आता आम्ही शेतकºयांनी आमच्याच रक्ताचा नैवेद्य द्यायचा का? असा संतप्त सवाल रविकांत तुपकर यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाRavikant Tupkarरविकांत तुपकरbuldhanaबुलडाणा