शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

संग्रामपूर, जळगावमध्ये विंधन विहिरींवर निर्बंध

By admin | Updated: April 7, 2015 01:57 IST

भूजल प्राधिकरणाचा निर्णय; जमिनीची होत आहे चाळणी.

बुलडाणा : जिल्ह्यात भूजलाचा वापर हाच महत्त्वाचा स्त्रोत पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध आहे. त्यासाठी जमिनीच्या पोटाची अक्षरक्ष: चाळणी करून कूपनलिका व विंधन विहिरी घेतल्या जात आहेत. या कूपनलिका किती खोल घेतल्या जाव्यात, यासाठी भूजल अधिनियम असला तरी तो कागदावरच राहतो त्यामुळे अनेक परिसरात अतिउपसा झाला असल्याने राज्याच्या भूजल प्राधिकरणाने खोल कूपनलिका घेण्यावर बंधने आणली आहेत. राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारे कू पनलिका घेण्यास प्रतिबंध घातला असून, त्यामध्ये बुलडाण्याच्या संग्रामपूर व जळगाव जामोद या दोन तालुक्यतील १३२ गावांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य भूजल प्राधिकरणाने राज्यातील अतिशोषित व शोषित पाणलोट क्षेत्रात सिंचन तसेच औद्योगिक वापरासाठी ६0 मीटरपेक्षा अधिक खोल विंधन विहीर व कूपनलिका खोदण्यास प्रतिबंध घातला आहे. या क्षेत्रात अशा विंधन विहिरी किंवा कूपनलिका खोदल्या, तर भूजल भरण व उपसा यांचे संतुलन राहत नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी अपवादात्मक स्थि तीत मात्र परवानगी दिली जाणार आहे. या निर्णयामध्ये संग्रामपूर व जळगाव जामोद या खारपाण पट्टय़ातील दोन तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. खारपाणपट्टय़ात जमीन चोपणची असल्यामुळे पाणी धरून ठेवण्याची क्षमता आधीच कमी आहे. येथे पिण्याच्या पाण्यासाठी लोकांनी ४00 फुटांपेक्षाही जास्त विंधन विहिरी घेतल्या आहेत. त्यामुळे जमिनीतील उपसा मोठय़ा प्रमाणात वाढला असून, तो थांबला नाही. पुनर्भरण व उपसा यांच्यामध्ये व्यस्त प्रमाण झाले आहे. या १३२ गावांपैकी ६0 टक्के गावे हे तर अतिशोषित स्वरूपात मोडत असल्याने भूजल अधिनियमनाची अंमलबजावणी गांभीर्याने घेणे गरजचे आहे.