शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
2
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
5
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
6
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
7
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
8
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
9
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
10
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
11
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
12
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
13
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
14
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
15
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
16
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
17
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
18
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
19
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
20
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'

‘कृषी स्वावलंबन’ योजनेवरील स्थगिती हटवल्याने दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 11:46 AM

Buldhana News योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने शासनाकडे १९ कोटी रुपयांची मागणी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : मागासवर्गीय अल्पभूधारक शेतक-यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सुरू केलेली सिंचन विहीर व इतर शेती घटकांच्या मदतीसाठीची डाॅ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेला शासनाने दिलेली स्थगिती हटवण्यात आली आहे.  योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने शासनाकडे १९ कोटी रुपयांची मागणी केली आहे. निधी प्राप्त झाल्यानंतरच निवड प्रक्रिया महाडिबीटीद्वारे प्राप्त अर्जानुसार ऑनलाइन केली जाणार आहे. शेतीचे उत्पन्न वाढवायचे असेल, तर पाणी हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. यामुळे शेतात विहीर असल्यास शेतकऱ्यांचा उत्पन्नाचा मार्ग सुकर होतो; पण मागासवर्गीय अल्पभूधारक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने अनेक शेतकऱ्यांना विहीर खोदणे शक्य नाही. अशा गरीब शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने विशेष घटक योजनेच्या माध्यमातून शेतात विहीर खोदकाम, त्यानंतर बांधकाम, वीज कनेक्शन, विद्युत पंप संच, ठिबक-तुषार सिंचनासाठी तीन लाख रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य केले जाते. याशिवाय शेततळे, विहिरीमधील बोअरसाठीसुद्धा या योजनेतून अर्थसाहाय्य केले जाते.  कृषी आयुक्तालयाने २३ नोव्हेंबरच्या पत्रानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जि.प.च्या कृषी विकास अधिकाऱ्यांना पत्र पाठवून सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात या योजनेसाठी निधी देऊन लाभार्थी निवड प्रक्रिया व अंमलबजावणी स्थगित केली होती. ती स्थगिती आता उठवण्यात आली. त्यानुसार लाभार्थी निवड केली जाईल. तसेच निधी प्राप्त झाल्यानंतर घटकनिहाय लाभ देण्यासाठी लक्ष्यांकही निश्चित केला जाणार आहे. त्यासाठी शासनाकडे १९ कोटी रुपये निधीची मागणी करण्यात आली आहे.   

शासनाने लाभार्थींचे अर्ज आधीच ऑनलाइन घेतले आहेत. त्यामध्ये प्राप्त अर्जानुसार लाभाचा घटकनिहाय लक्ष्यांक निश्चित केला जाईल. शासनाच्या निर्देशानुसार निवड प्रक्रिया व लाभ दिला जाईल. -अनिसा महाबळे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाgovernment schemeसरकारी योजना