शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

कर्जमाफीचे मेसेज प्राप्त; पण बँकांना आदेश नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 4:43 PM

शेतकरी बँकेत कर्जाच्या प्रतीक्षेत सिंदखेडराजा : तालुक्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे मेसेज मोबाईलवर प्राप्त होऊनही त्यांची कर्जमाफी न झाल्याने शेकडो शेतकºयांचे कर्ज प्रकरण बँकेत पडून आहे. बँकांना ज्या शेतकऱ्यांची यादी प्राप्त झाली त्यांनाच कर्ज पुरवठा होत असल्याने शेकडो शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पीक कर्जाबाबतचे शासनाचे निश्चित धोरण काय? याबाबत ...

ठळक मुद्देकर्जदार शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने कर्जमाफीचे मेसेज प्राप्त झाले तर काहींना आजही कर्जमाफीचे मेसेज प्राप्त झाले नाही.राताळी, गोरेगाव, साखरखेर्डा, उमनगाव येथील शेतकऱ्यांचे कर्ज पुनर्गठणच्या नावाखाली मागील वर्षी व्याजासह भरून घेण्यात आले.

शेतकरी बँकेत कर्जाच्या प्रतीक्षेत सिंदखेडराजा : तालुक्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे मेसेज मोबाईलवर प्राप्त होऊनही त्यांची कर्जमाफी न झाल्याने शेकडो शेतकºयांचे कर्ज प्रकरण बँकेत पडून आहे. बँकांना ज्या शेतकऱ्यांची यादी प्राप्त झाली त्यांनाच कर्ज पुरवठा होत असल्याने शेकडो शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पीक कर्जाबाबतचे शासनाचे निश्चित धोरण काय? याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. महाराष्ट्र शासनाने अल्पभूधारक आणि १ लाख ५० हजार रुपयांची कर्जमाफी केली होती. थकीत कर्जदार शेतकऱ्यांनी आॅनलाइन अर्जही भरले. थकीत कर्जदार शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने कर्जमाफीचे मेसेज प्राप्त झाले तर काहींना आजही कर्जमाफीचे मेसेज प्राप्त झाले नाही. बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे थकीत कर्जदार गजानन टाले यांनी २०११ मध्ये पीक कर्ज घेतले होते. तेव्हापासून ते थकित होते त्यांनी पिक कर्ज माफीचा अर्ज आॅनलाइन भरला होता. त्यांना कर्जमाफी झाल्याचा मेसेज प्राप्त झाला. त्यांनी पीक कर्जासाठी बँकेत अर्ज दाखल केला. परंतु गजानन टाले यांना बँकेचे शाखा व्यवस्थापक चव्हाण यांनी सांगितले की, तुम्हाला आलेला मेसेज हा चुकीचा असून तुमची शासनाने कर्जमाफी केली नाही. त्याबाबत बँकेला कोणतीही यादी प्राप्त झाली नाही. असेच प्रकार अनेक शेतकऱ्यांसोबत होत आहेत. जिल्हा को.आॅप. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी २०१७ मध्ये मोहाडी, शिंदी, राताळी, गोरेगाव, साखरखेर्डा, उमनगाव येथील शेतकऱ्यांचे कर्ज पुनर्गठणच्या नावाखाली मागील वर्षी व्याजासह भरून घेण्यात आले. त्यांना कागदोपत्री नवीन कर्ज वाटप झाल्याचे दाखविण्यात आले. त्या शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. महाराष्ट्र शासनाने सरसकट कर्जमाफीची घोषणा करूनही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. स्टेट बँकेत काही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची यादी लावली असून त्या शेतकºयांना कर्ज पुरवठा होत असला तरी काही तांत्रिक बाबी बँक कर्मचाºयांच्या लक्षात येत नसल्याने त्या शेतकऱ्यांचा कर्जपुरवठा थांबविला आहे. त्यामुळे येथील शेतकरी अडचणीत सापडला आहे. कर्ज हवे असल्यास वारसदारांचे ना-हरकत आणा स्टेट बँकेतून कर्ज हवे असेल तर सात-बारावर जेवढ्या वारसदारांची नावे असतील त्या वारसदारांचे १०० रुपयांच्या बाँडपेपरवर नाहरकत नोटरी करून आणा, असा आदेशच बँकेने काढला असून अनेक शेतकºयांना तहसील कार्यालयात जाऊन नोटरी करून आणावी लागत आहे. त्यामुळे आर्थिक भार शेतकºयांना सोसावा लागत आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाSindkhed Rajaसिंदखेड राजाFarmerशेतकरीbankबँक