शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

 जलकुंभ बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 12:23 PM

बेलाड व दसरखेड येथील जलकुंभ कोसळल्याची घटना घडल्याने जलकुंभाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

- योगेश फरपट लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर: ग्रामिण भागातील जनतेला पिण्याचे मुबलक व शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे यासाठी प्रत्येक गावात स्वतंत्र जलकुंभाची निर्मिती करण्यात येत आहे. मात्र जलकुंभाच्या गुणवत्तेकडे कथितस्तरावरील अर्थकारणातून दुर्लक्ष केल्या जात असल्याची ओरड आहे. गेल्या चार वर्षात जिल्ह्यातील एकट्या मलकापूर तालुक्यात बेलाड व दसरखेड येथील जलकुंभ कोसळल्याची घटना घडल्याने जलकुंभाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.केंद्र सरकारने राज्य सरकारे आणि पंचायत राजसंस्था यांच्या भागीदारीत ग्रामीण पायाभूत सुविधा विकासासाठी २००५ मध्ये १ लाख ७६ हजार कोटी रुपयांची महत्त्वाकांक्षी भारत निर्माण&योजना पाच वर्षांसाठी लागू केली होती.त्याअंतर्गत २००५ ते २००९ या काळात ग्रामिण भागात रस्ते, टेलिफोन सेवा, जलसिंचन, पेयजल पुरवठा, घरे, विद्यूतीकरण आदी कामे करण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने पेयजल पुरवठा कार्यक्रमाअंतर्गत पिण्याच्या पाण्याची सोय नसलेल्या ५५ हजार ६७ वस्त्यांना पेयजल सुविधा उपलब्ध करून देणे, पूर्वी सोय असलेल्या पण कालांतराने सोय नष्ट झालेल्या ३ लाख ३१ हजार वस्त्यांना पेयजलची सोय करून देणे आणि पाण्याचा दर्जा घसरलेल्या २ लाख १७ हजार वस्त्यांना शुद्ध पेय जल उपलब्ध करून देणे यावर भर देण्यात आला. बुलडाणा जिल्ह्यातही याच काळात २१ ठिकाणी जलकुंभ तयार करण्यात आले. या जलकुंभाची निर्मिती करण्यासाठी स्थानिक पातळीवर समिती नेमण्यात आली. जिल्हा परिषदेच्या ग्रामिण पाणी पुरवठा विभागासह गटविकास अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात जलकुंभाचे बांधकाम करण्यात आले. याच उपक्रमाअंतर्गत बेलाड व दसरखेड येथेही जलकुंभ उभारण्यात आले होते. २१ जलकुंभापैकी मलकापूर तालुक्यातील दोन ठिकाणचे जलकुंभ चार वर्षाच्या आत कोसळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. हे बांधकाम सुरु असताना समितीने नेमकी कोणती देखरेख केली याबाबतही ग्रामस्थ कुचबूच करीत आहेत. शिवाय शिवसेनेने बांधकामात भ्रष्टाचार करणाºयाविरुद्ध कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमकी आता कोणावर कारवाई होते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

जलकुंभाच्या आॅडीटवर प्रश्नचिन्ह!जिल्हा परिषदेच्या ग्रामिण पाणी पुरवठा विभागाकडे जिल्ह्यातील सर्व जलकुंभाची देखरेख व नियंत्रणाची जबाबदारी आहे. दरम्यानच्या काळात दरवर्षी जलकुंभाचे आॅडीटही होते. शिवाय जलकुंभ ग्रामपंचायतकडे बांधकाम पुर्ण झाल्यानंतर हस्तांतरीत केला जातो. तेव्हा सुस्थितीत जलकुंभ आहे असा शेराही ग्रामिण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता देतात. मग मलकापूर तालुक्यातील जलकुंभ ताब्यात घेतांना शहानिशा केली नाही काय? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.सुबोध सावजींच्या तक्रारीकडे दुर्लक्षमाजी मंत्री सुबोध सावजी यांनी जिल्हयातील विविध ठिकाणच्या पाणी पुरवठा योजनांच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आंदोलनही केले होते. मात्र त्यांच्या तक्रारीची कोणतीही दखल जिल्हा प्रशासनाने घेतली नाही हे विशेष. यामुळे जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही जलकुंभाच्या बांधकामात हात ओले झाल्याची चर्चा सुरु आहे. माजी मंत्र्यांच्या आंदोलनाची दखल जर प्रशासनाकडून घेतली जात नसेल तर ही गंभीर बाब असल्याचा आरोपही दसरखेड येथील नागरिकांनी केला आहे.

बुलडाणा जिल्हयात काही वर्षापूर्वी भारत निर्माण योजनेअंतर्गत ग्रामिण भागात जलकुंभ तयार करण्यात आले होते. स्थानिक समितीकडे देखरेखची जबाबदारी होती. समितीने नेमके काय केले हे सांगता येणार नाही. पण दसरखेड येथील घटना गंभीर आहे. आम्ही चौकशी सुरु केली आहे. पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता विलासराव चव्हाण चौकशी करीत आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर निश्चित कारवाई करू.- प्रशांत घोडे, कार्यकारी अभियंता,ग्रामिण पाणी पुरवठा विभाग, जि.प.बुलडाणा

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावMalkapurमलकापूर