शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
2
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
3
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
4
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
5
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
6
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
7
दर्यापुरात टोळक्याचा धुमाकूळ; अमरावती मार्गावर चालत्या वाहनांवर दगडफेक
8
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
9
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
10
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
11
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
12
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
13
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
14
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
15
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
16
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
17
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
18
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
19
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
20
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 

सध्याचे सरकार असंवेदनशील - माणिकराव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 12:40 AM

काँग्रेसने राज्यभरात  जनआक्रोष आंदोलन सुरू केले असून, अमरावती येथे सात  नोव्हेंबर रोजी जनआक्रोश मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती विधानसभेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी येथे दिली.

ठळक मुद्देसात नोव्हेंबर रोजी अमरावतीत येथे काँग्रेसचा जनआक्रोश  मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सध्याचे सरकार हे असंवेदनशील असून, शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांना दिलासादायक असे काम या सरकारने  गेल्या तीन वर्षांत केलेले नाही. त्याविरोधात काँग्रेसने राज्यभरात  जनआक्रोष आंदोलन सुरू केले असून, अमरावती येथे सात  नोव्हेंबर रोजी जनआक्रोश मेळावा आयोजित करण्यात  आल्याची माहिती विधानसभेचे उपसभापती माणिकराव ठाकरे  यांनी येथे दिली.काँग्रेस कार्यालयात आयोजित  पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  यावेळी जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष तथा आ. राहुल बोंद्रे,  मेळाव्याचे समन्वयक श्याम उमाळकर, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, संजय राठोड,जि.प. सदस्य अँड. जयश्री शेळके,  माजी जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे, शैलेश सावजी, लक्ष्मणराव  घुमरे उपस्थित होते. कर्जमाफीची घोषणा करून पाच महिने झाले,  तरी प्रत्यक्षात शेतकर्‍यांना कुठलाही दिलासा नाही. अधिवेशना पर्यंत शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देण्यास आम्ही भाग पाडू,  असे ठाकरे यावेळी म्हणाले. कीटकनाशकामुळे शेतकर्‍यांचा मृ त्यू झाल्याप्रकरणी मूळ कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे,  यासह अन्य मागण्यांसाठी हा जनआक्रोश मोर्चा असल्याचे ते  म्हणाले. सोबतच संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांवरही कारवाई  करण्यात यावी, अशी  मागणी असल्याचे ते म्हणाले. वर्तमानात  समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.  वादग्रस्त राणी पद्मावती चित्रपटात वास्तव चित्रण असावे, जन तेच्या भावनांचा विचार करता वादग्रस्त सीन काढून टाकावे,  असेही ते म्हणाले. 

अधिवेशनावर काँग्रेसची दिंडी अधिवेशनादरम्यान काँग्रेस मराठवाडा, विदर्भ आणि खान्देश मार्गे  अधिवेशनावर दिंडी काढणार आहे. २६ किंवा २७  नोव्हेंबरदरम्यान या दिंडीस प्रारंभ होणार असल्याचे संकेत  माणिकराव ठाकरे यांनी दिले. याची अद्याप अधिकृत घोषणा  झाली नसली, तरी प्रदेश काँग्रेसतर्फे ती लवकरच करण्यात येणार  असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेस