शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

दीड हजार शाळांच्या सकाळ सत्राचा मार्ग मोकळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 18:48 IST

बुलडाणा: वाढते तापमान व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १ हजार ४४२  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा: वाढते तापमान व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १ हजार ४४२  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सकाळच्या सत्रासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने ५ मार्चचा मुहूर्त शोधला आहे.   २० मार्चपासून होणारी सकाळच्या सत्राची अंमलबजावणी आता ५ मार्चपासूनच होणार असल्याने विद्यार्थ्यांची उन्हाच्या झळांपासून सुटका झाली आहे. जिल्ह्यात यावर्षी दुष्काळ असून पाणीटंचाईच्या झळा अनेक गावांना बसत आहेत. त्यामुळे अनेक शाळांमध्ये पिण्यास पाणी उपलब्ध नाही. परिणामी, शाळेत येणाºया मुलांना पाणी पिण्यासाठी घरी जावे लागते. त्याचबरोबर तापमानातही वाढ होत आहे. एकीकडे जिल्हा परिषद शाळेची झालेली दुरवस्था त्यात अनेक खोल्या पत्राच्या, त्यामुळे विद्यार्थ्यांना वाढत्या तापमानात या पत्राच्या खोलीत बसून शिक्षण घेणे अवघड आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा १ मार्चपासून सकाळच्या सत्रात घेण्यात याव्या, यासाठी शिक्षक संघटनांसह लोकप्रतिनिधींनी शिक्षण विभागाकडे पत्र दिले होते. परंतू  शिक्षण विभागाकडून सकाळच्या सत्रासाठी २० मार्चलाच प्राधान्य दिल्या जात होते. यासंदर्भात १ मार्च रोजी ‘लोकमत’ने ‘विद्यार्थ्यांना २० दिवस सोसावा लागणार उकाडा!’ असे वृत्त प्रकाशित करताच जिल्हा परिषद शिक्षण विभागाने या वृत्ताची दखल घेत सकाळच्या सत्रात शाळा भरविण्याचा मार्ग मोकळा केला. १ मार्च रोजी जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने शिक्षण समितीची सभा घेण्यात आली. या सभेत जिल्हा परिषद शाळा ५ मार्चपासून सकाळच्या सत्रात भरविण्याबाबत निर्णय घेण्यात आला. शिक्षण समितीचे सदस्य आशिष रहाटे यांच्यासह समितीने जिल्हा परिषद शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचा ठराव मांडला. त्यावर सर्वांचे एकमत झाल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभागाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.  पण् तासिका पूर्ण होणार का?सकाळच्या सत्रात शाळा भरविल्यास तासिका कमी होतील. परिणामी, विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होणार नाही. अशा काही कारणास्तव  १ मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा भरविण्यासाठी शिक्षण विभागाकडून आतापर्यंत नकार दिल्या जात होता; त्यामुळे शिक्षण विभागाने २० मार्च ही तारिख दिली होती. परंतू आता १५ दिवस आधीपासूनच सकाळच्या सत्रात शाळा भरणार असल्याने तासिका पूर्ण होतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

 वेळ निश्चित नाही!जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ५ मार्चपासून सकाळच्या सत्रात घेण्याचा निर्णय १ मार्च रोजी दुपारी ४ वाजता घेण्यात आला. परंतू सकाळच्या सत्रातील वेळ निश्चित होणे बाकी आहे. यामध्ये सकाळी ७ ते दुपारी १२ किंवा सकाळी ७.३० ते दुपारी १२.३० असा वेळ निश्चित करण्यात येऊ शकतो. 

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा २० मार्चच्या ऐवजी आता ५ मार्चपासून सकाळच्या सत्रात भरविण्यात येणार आहेत. यामध्ये सर्व तासिका पूर्ण होतील व अभ्यासक्रमामध्ये कुठलाही अथळळा येणार नाही, असे नियोजन करण्यात येत आहे. - श्रीराम पानझाडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा. 

 पाणीटंचाई व वाढती उष्णता यामुळे सकाळच्या सत्रात शाळा भरविणे अत्यंत आवश्यक होते. आज शिक्षण समितीने सकाळच्या सत्रात शाळा भरविण्याचा ठराव घेतला. त्याचबरोबर शिक्षकांच्या समस्यांवरही चर्चा करण्यात आली. - आशिष रहाटे, शिक्षण समिती सदस्य, जिल्हा परिषद बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSchoolशाळा