शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

नऊ हजारांवर जोडण्या प्रलंबित!

By admin | Updated: June 8, 2017 02:29 IST

पावसाळा आला तरी कृषी पंपांची वीज जोडणी नाही

संदीप गावंडे। लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : विदर्भ व मराठवाड्यातील कृषी पंपांचा वीज कनेक्शनचा अनुशेष भरून काढण्यासाठी शासनाने विशेष पॅकेज जाहीर केले आहे; मात्र बुलडाणा जिल्ह्यातील नऊ हजारांवर जोडण्या प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांना कितीही पोल लागले तरी पैसे भरण्याचे काम नाही. फक्त प्रती एचपी प्रमाणे डिमांड नोट भरावयाची आहे, असे असले तरी बऱ्याच शेतकऱ्यांना एक वर्षापेक्षाही जास्त काळ उलटूनही अद्यापपर्यंत वीज कनेक्शन मिळालेले नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी असून, आता पावसाळा आला तरी कनेक्शन न मिळाल्याने या वर्षात तरी कनेक्शन मिळेल की नाही, शंकाच आहे.बुलडाणा जिल्ह्यात वीज वितरणचे तीन उपविभाग असून, मलकापूर उपविभागातील प्रलंबित कृषीपंपाच्या जोडण्यांची संख्या पुढीलप्रमाणे मलकापूर ४९०, नांदुरा ८१०, मोताळा ८७०, जळगाव जामोद ६२०., खामगाव उपविभाग - खामगाव ग्रामीण ७६१, शहर ८०, लोणार ७५२, मेहकर १२७०, संग्रामपूर ४७१, शेगाव २६५, बुलडाणा उपविभाग - बुलडाणा ४१२, चिखली १०३०, देऊळगाव राजा ५३०, सिंदखेडराजा ७८५, धाड २६० असे जिल्हाभरात जवळपास नऊ हजारापेक्षा जास्त कृषी पंपांचे वीज जोडण्या प्रलंबित असून, आता पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने जोडण्या प्रलंबित कशाप्रकारे करण्यात येणार आहेत, हे अनाकलनीय आहे. विदर्भातील शेती बहुतांशी कोरडवाहू आहे. असे असले तरी बरेच शेतकरी शासकीय योजनांमधून किंवा स्वखर्चाने विहिरी व कूपनलिका करून आपली शेती बागायती करण्याचा प्रयत्न करतात; परंतु मोठ्या आशेने विहिरी खोदल्यावर किंवा कूपनलिका केल्यावर त्यावर कृषी पंपासाठी लागणाऱ्या वीज कनेक्शनसाठी शेतकरी वर्गाला तब्बल वर्ष-वर्ष वाट पहावी लागत असल्याने त्याच्या आशेवर पाणी फिरते व विहीर खोदूनही बागायत होत नसल्याने आपण गुन्हा केला की काय, अशी भावना तयार होते. विहीर किंवा कूपनलिकेकरिता कृषी पंपासाठी आवश्यक वीज पुरवठ्यासाठी वीज वितरण कार्यालयाकडे अर्ज करून डिमांड नोट भरल्यावर शेतकऱ्यास एक महिन्याच्या कालावधीत वीज कनेक्शन देणे आवश्यक आहे. असे असतानाही बऱ्याच शेतकऱ्यांना डिमांड नोट भरून वर्ष उलटले असले, तरी अद्यापही वीज पुरवठा मिळाला नसल्याने शेतकरी निराश झाले आहेत. कार्यालयात विचारणा केली असता, तुमचे काम ठेकेदाराला दिले आहे, तेच करतील; अशी उत्तरे मिळतात. त्यामुळे नाइलाजास्तव शेतकरी वीज कनेक्शनची वाट पाहण्यापलीकडे काही करू शकत नाही. वीज वितरण कार्यालय काही मोजक्याच मर्जीच्या ठेकेदारांना काम देत असल्याने या ठेकेदारांकडे कामाचा लोड जास्त होतो. त्या प्रमाणात मनुष्यबळ किंवा साधन सामग्री त्यांचेजवळ नसते त्यामुळे कनेक्शन मिळण्यास उशीर होतो. शेतकऱ्यांनी ग्राहक मंचात दाद मागावीडिमांड नोट भरल्यानंतर एक महिन्यात वीज कनेक्शन देणे अनिवार्य असूनही वर्ष उलटूनही शेतकऱ्यांना कनेक्शन मिळत नाही. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते. याविरूध्द शेतकऱ्यास ग्राहक मंचात दाद मागता येते. परंतु अज्ञानामुळे शेतकरी काहीच न करता वीज कनेक्शनची केवळ वाट पाहत बसतो.विद्युत पोलकरिता पैशांची गरज नाहीकृषीपंपासाठी प्रती एच.पी. ५०० रूपये डिमांड नोट भरावी लागते. म्हणजेच तीन एचपी मोटारसाठी १५०० रूपये तर पाच एचपी मोटारसाठी २५०० रूपये. तसेच विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना वीज कनेक्शनसाठी विशेष पॅकेज जाहीर झाले असल्याने कितीही पोल विहिरीपर्यंत लागत असले तरी शेतकऱ्यास पैसे देण्याची गरज नाही. असे असले तरी ठेकेदार प्रती पोल पैशाची मागणी करतात.