शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

येळगाव धरणात महिनाभर पुरेल एवढाच जलसाठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 15:14 IST

बुलडाणा : येळगाव धरणात जेमतेम महिनाभर पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. मान्सून वेळेवर दाखल झाला नाही तर बुलडाणा शहराला तीव्र पाणीटंचाई भेडसावण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : येळगाव धरणात जेमतेम महिनाभर पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. मान्सून वेळेवर दाखल झाला नाही तर बुलडाणा शहराला तीव्र पाणीटंचाई भेडसावण्याची शक्यता आहे.बुलडाणा शहरासह परिसरातील गावाला येळगाव धरणावरुन पाणीपुरवठा केला जातो. धरणाची क्षमता १२.४० दलघमी आहे. येळगाव धरणामुळे आजूबाजूचा परिसर सुजलाम सुफलाम झाला आहे. ऐन दुष्काळातही बुलडाणेकरांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागलेल्या नाहीत. मात्र सध्या धरणात अत्यंत कमी जलसाठा शिल्लक राहिला आहे. उपलब्ध साठ्यातून महिनाभर नागरिकांना पाणी पुरे शकते. मात्र त्यानंतर अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे. बुलडाणेकरांना दरडोई १०० लीटर याप्रमाणे दररोज ७० लाख लीटर पाणी लागते. परिसरातील गावांनाही येळगाव धरणातूनच पाणीपुरवठा होतो. येळगाव धरणातून प्रतिदिन ९० लाख लीटर पाण्याची उचल होते. सध्या उपलब्ध जलसाठा ३० जूनपर्यंत पुरेल, अशी माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली.दुष्काळामुळे जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पातील जलसाठा कमालीचा घटला आहे. अनेक प्रकल्प कोरडे पडले असून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. प्रकल्पातील जलसाठा केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. सिंचनासाठी प्रकल्पाच्या पाण्याचा वापर करु नये असे शेतकऱ्यांना सांगण्यात आले आहे. तरीही काही ठिकाणी मोटारपंपाद्वारे पाणी उपसा सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. भीषण पाणीटंचाई असतांनाही अवैध पाणी उपसा करणे गंभीर बाब असून संबंधितांवर कडक कारवाईचे संकेत आहेत. सध्या उपलब्ध असलेला जलसाठा हा मृतसाठा आहे. यावर्षी मान्सून वेळेवर दाखल झाल्यास चिंता करण्याचे कारण नाही. परंतू मान्सून लांबला तर बुलडाणेकरांच्या चिंता वाढणार आहेत.(प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाwater scarcityपाणी टंचाईDamधरण