शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

येळगाव धरणात महिनाभर पुरेल एवढाच जलसाठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 15:14 IST

बुलडाणा : येळगाव धरणात जेमतेम महिनाभर पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. मान्सून वेळेवर दाखल झाला नाही तर बुलडाणा शहराला तीव्र पाणीटंचाई भेडसावण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : येळगाव धरणात जेमतेम महिनाभर पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. मान्सून वेळेवर दाखल झाला नाही तर बुलडाणा शहराला तीव्र पाणीटंचाई भेडसावण्याची शक्यता आहे.बुलडाणा शहरासह परिसरातील गावाला येळगाव धरणावरुन पाणीपुरवठा केला जातो. धरणाची क्षमता १२.४० दलघमी आहे. येळगाव धरणामुळे आजूबाजूचा परिसर सुजलाम सुफलाम झाला आहे. ऐन दुष्काळातही बुलडाणेकरांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागलेल्या नाहीत. मात्र सध्या धरणात अत्यंत कमी जलसाठा शिल्लक राहिला आहे. उपलब्ध साठ्यातून महिनाभर नागरिकांना पाणी पुरे शकते. मात्र त्यानंतर अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे. बुलडाणेकरांना दरडोई १०० लीटर याप्रमाणे दररोज ७० लाख लीटर पाणी लागते. परिसरातील गावांनाही येळगाव धरणातूनच पाणीपुरवठा होतो. येळगाव धरणातून प्रतिदिन ९० लाख लीटर पाण्याची उचल होते. सध्या उपलब्ध जलसाठा ३० जूनपर्यंत पुरेल, अशी माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली.दुष्काळामुळे जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पातील जलसाठा कमालीचा घटला आहे. अनेक प्रकल्प कोरडे पडले असून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. प्रकल्पातील जलसाठा केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. सिंचनासाठी प्रकल्पाच्या पाण्याचा वापर करु नये असे शेतकऱ्यांना सांगण्यात आले आहे. तरीही काही ठिकाणी मोटारपंपाद्वारे पाणी उपसा सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. भीषण पाणीटंचाई असतांनाही अवैध पाणी उपसा करणे गंभीर बाब असून संबंधितांवर कडक कारवाईचे संकेत आहेत. सध्या उपलब्ध असलेला जलसाठा हा मृतसाठा आहे. यावर्षी मान्सून वेळेवर दाखल झाल्यास चिंता करण्याचे कारण नाही. परंतू मान्सून लांबला तर बुलडाणेकरांच्या चिंता वाढणार आहेत.(प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाwater scarcityपाणी टंचाईDamधरण